Wednesday, April 22, 2015

शालेय जीवनातली संस्कार शिदोरी!

आज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही, पण ५०-५५ वर्षापूर्वी आमचे गाव तारकर्ली म्हणजे एखाद्या खेडय़ाप्रमाणे खूपच अविकसित होते. 
aathvan copyआज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही, पण ५०-५५ वर्षापूर्वी आमचे गाव तारकर्ली म्हणजे एखाद्या खेडय़ाप्रमाणे खूपच अविकसित होते. मालवणला जाण्या-येण्यास एस.टी. बस सुरू व्हायची होती. गावात रस्ते, वीज यांसारख्या आवश्यक गोष्टीही नव्हत्या. वृत्तपत्रे मिळत नव्हती. अख्ख्या गावात एक-दोन जणांच्या घरी रेडिओ होते, पण तेही खूपदा बंदच असतं, कारण एकदा रेडिओ बिघडला की तो दुरुस्त करणारा जवळपास कुणी नव्हता.
मूल आजारी असेल तर गावात डॉक्टर नसल्याने मुलाला उचलून सहा कि.मी. दूर मालवणला घेऊन जाण्याची धमक तेव्हा आमच्या आयांमध्ये होती. दुसरा इलाजच नव्हता. मुंबईला असलेल्या मुलाचे पत्र येई तेव्हा त्यांची खुशाली कळत होती, त्यामुळे त्या काळी अशी माणसे पोस्टमनची वाट देवासारखी पाहत असत. कुणी चाकरमानी गावी येई तेव्हा मुंबईच्या गमतीजमती ऐकायला त्याच्याकडे गर्दी जमायची.
कमी अधिक प्रमाणात त्या काळी सर्व गावांची स्थिती अशीच होती. इतर कोणत्याही सोयी-सुविधा नसल्या तरी सरकारी मत्स्योद्योग विद्या मंदिर-तारकर्ली ही पहिली ते सातवीपर्यंतची सरकारी शाळा मात्र आमच्या गावी होती. प्रत्येक वर्गाला वेगळा शिक्षक होता. या आमच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग काथ्याच्या चटईवर तर पाचवी ते सातवीचे बेंच वर बसत.
आम्ही चौथीत असताना म्हणजे १९६९-७० साली एके दिवशी आमच्या वर्गातील सारी मुले दप्तर घेऊन वर्गाबाहेर बसली. आमच्या वर्गात जे दोन-चार जाणते म्हणजे प्रत्येक वर्गात दोन-दोन वेळा बसून चौथीपर्यंत आले होते, त्यांनी आम्हा सर्वाना वर्गाबाहेर बसवले होते. त्यांना वर्गाबाहेर बसण्याचे कारण विचारलं तेव्हा समजले, आपल्याला वर्गात बसण्यासाठी बेंच हवेत.
साडेदहा वाजता आमचे वर्गशिक्षक कोळंबकर मास्तर हे वर्गात आले तर वर्ग रिकामा आणि मुले वर्गाबाहेर बसलेली असे अपूर्व दृश्य पाहिले. मास्तरांनी आमच्याजवळ येऊन आम्ही बाहेर बसण्याचे कारण विचारले. आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मुले ऐकेनात. मग त्यांनी ही बातमी मुख्याध्यापकांना सांगितली. मुख्याध्यापक होते साधले मास्तर; प्रेमळ पण कडक शिस्तीचे. दांडगाई करणारी मुलेही ते येताच शांत होत असत.
साधले मास्तरांनी वर्गाबाहेर बसण्याचे कारण विचारले. एक-दोन मोठय़ा मुलांनी खाली नजर ठेवूनच कारण सांगितले. मुख्याध्यापक समजावत म्हणाले, ‘अरे शाळेचे काही नियम असतात, तुम्हाला पुढच्या वर्षी बेंच मिळणार बसायला. माझे ऐका वर्गात बसा.’ तरीही कुणी उठेना. उलट एक जण म्हणाला, ‘बेंच दिल्याशिवाय आम्ही वर्गात बसणार नाही. परांजपे मास्तरांच्या सुतारकामाच्या वर्गात इतके बेंच धुळ खात पडलेत, ते द्या आम्हाला बसायला.’ मग मास्तरांचा नाईलाज झाला. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘मुले आणि बेंच किती आहेत ते पाहतो व पुरण्यासारखे असतील तर शनिवारी वर्गात लावतो.
आता वर्गात बसा.’ मुख्याध्यापकांकडून असे आश्वासन मिळाल्यावर आम्ही एक एक करत वर्गात जाऊन बसलो. वास्तविक मुख्याध्यापकांनी आम्हाला इतके समजावून न सांगता वर्गाबाहेर उठा-बशा काढण्याची, ओणवे राहण्याची किंवा पालकांना बोलावून शिक्षा दिली असती तरीही ते योग्य ठरले असते. इतकेच नव्हे तर त्या काळी विद्यार्थ्यांना मार दिला तरी पालक विचारत नसत, पण आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिक्षा दिली नाही, तर सोमवारपासून आम्ही चौथीतच बेंचवर बसू लागलो. माझ्याप्रमाणे दोन-तीन विद्यार्थी बेंचवरून हात पुरत नाही म्हणून उभे राहून लिहीत असू.
१९७३ साली सातवीत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात आम्ही मुलांनी ‘जिंकू किंवा मरू.. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू’ हे स्फूर्तिगीत सादर करायचे ठरवले होते. सरावही झाला होता. स्नेहसंमेलनाच्या दिवशी म्हणजे रात्री आमचे गीत सादर होण्यापूर्वी कुणीतरी सांगितले, सगळे मास्तर, बाई आणि शिपाई नानकटाई खाताहेत कॉफीबरोबर. झाले, हे समजल्यावर आमचा ‘इगो’ दुखावला. आम्ही सातवीत म्हणजे शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थी. शिवाय आमचे शेवटचे वर्ष तरी आम्हाला न देता हे कसे खातात? कुणाच्या तरी डोक्यात आलं, चला कार्यक्रमावर बहिष्कार आणि तसा निरोप शिपायांना दिल्यावर शिक्षकांची धावपळ झाली.
त्यांनी आम्हाला समजावलं, पण कुणी तयार होईना. शेवटी शिक्षक म्हणाले, ‘आता सर्वाना पुरतील इतक्या नानकटाई नाहीत, शिवाय गावात मिळणारही नाहीत. तुम्ही कार्यक्रम करा, उद्या रजा आहे, परवा पूर्ण वर्गाला नानकटाई आणि कॉफी देऊ.’ शिक्षकांकडून अशी कबुली मिळाल्यावर मग आमचे गाणे झाले आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण वर्गाला कॉफीसोबत नानकटाईही मिळाली. आज त्या नानकटाईची चव ना कुकीजमध्ये ना कशातच.
आमच्या गावात सातवीच्या पुढे शाळा नसल्याने आम्ही आठवीपासून मालवणला जात असू. कॉलेजला बंक सगळेच मारतात. शाळेला दांडय़ाही खूप जणांनी खूप वेळा मारल्या असतील; पण आम्ही हायस्कूलमध्ये असताना फक्त एकदाच मारलेल्या दांडीने आम्हा सर्वाना (मास बंक होता) रडू आणले व अद्दल घडवली. गावी दिवसभराची (पूर्णवेळ) शाळा असल्याने आम्ही जेवण करून सकाळी साडेआठ वाजता घर सोडायचो. तारकर्ली ते मालवण सहा कि.मी. अंतर मस्त समुद्रकिनाऱ्यावरून चालत जावे लागे. आता एसटी सुरू झाली होती, पण पासाला पैसे नव्हते. आमच्या गावाच्या सीमेवरील ‘रांज’ पार करूनच आम्हाला पुढे जावे लागे.
एरवी कुणाच्या खिजगणतीत नसणारी, संथ वाहणारी रांज पावसाळ्यात भीषण रौद्र होत असे. डोंगर दऱ्यातून वाहत येऊन जे पाणी समुद्राला मिळते त्या पाण्याच्या प्रवाहाला आमच्याकडे ‘रांज’ असे म्हणतात. पावसाळ्यात नवीन माणूस रांज पार करायला जाईल तर तो गटांगळ्या खात समुद्रात गेलाच म्हणून समजा. पायाखालील वाळू झपाटय़ाने खचते, सरकते. वरून पाण्याचा लोंढा त्यात नवख्या किंवा कमी ताकदीच्या माणसाचा टिकावच लागून देत नाही. अशावेळी आम्हा शाळकरी मुलांना गावातील तरुण, तगडी, अनुभवी माणसे दप्तरासह उचलून घेऊन रांज पार करून देत. पुढच्या बाजूस रांजीवर त्यावेळी लाकडी साकव बांधलेला असे पण आम्ही जात नसू. तो लांबचा मार्ग होता. पाचेक कि.मी. चालल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर दांडी गावी श्रीदांडेश्वराच्या मंदिरात आम्ही सर्व एकत्र जमून मग पुढे हायस्कूलला जात असू.
याच दांडेश्वर मंदिरात एकेदिवशी दहावी-अकरावीच्या विद्यार्थ्यांनी सर्वाना सांगितले, ‘उद्या रोजच्याप्रमाणे सर्वानी येथेच जमायचे. मालवण शहरात जायचे पण हायस्कूलमध्ये न जाता दुपापर्यंत मालवण फिरून घरी जायचे.
घरी सांगू अर्ध्या दिवसाने शाळा सोडली म्हणून.’ या गोष्टीला आम्ही आठवीवाल्यांनी थोडा विरोध केला; पण आमचं काही चाललं नाही, पण आमच्यापैकी एक विद्यार्थी दुस-या शाळेत शिकत होता. तो तयार झाला नाही, तेव्हा त्याची शाळा वेगळी आहे म्हणून त्याला या योजनेतून मोकळं केलं.
दुस-या दिवशी मालवणला जाऊनही कुणीही शाळेत न जाता उगीचच मालवण फिरत राहिलो. दुपापर्यंत फिरून कंटाळा आला मग दुपारी घरी गेलो. तिकडे आमच्या हायस्कूलमध्ये प्रत्येक वर्गातील कोणत्याच तुकडीत आठवी ते अकरावीचा एकही विद्यार्थी उपस्थित नाही, हे पाहून तारकर्लीला काहीतरी गंभीर घटना घडली असावी, हे शिक्षकाच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित मुख्याध्यापकांना खबर दिली व मुख्याध्यापकांनी शिपायाला मालवणातील दुस-या हायस्कूलमध्ये कुणी तारकर्लीचा विद्यार्थी आला आहे का, हे पाहण्यास पाठवले. आमच्या दुर्दैवाने तिथे आठवीच्या वर्गात आमच्या योजनेतून बाद झालेला विद्यार्थी हजर होता. त्याने सांगितले की, सर्व जण माझ्याचबरोबर मालवणला आलेत. खोतसरांना हे समजल्यावर त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी शिक्षकांना काही सूचना दिल्या.
दुस-या दिवशी आम्ही साळसूदपणे काही घडलेच नाही अशा आविर्भावात आपापल्या वर्गात बसलो. हजेरी झाल्यानंतर प्रत्येक वर्गशिक्षकाने आम्हा तारकर्लीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक खोतसरांना भेटण्यास सांगितले. त्या दिवशी खोतसरांच्या केबिनबाहेर आठवी ते अकरावीत असणाऱ्या फक्त तारकर्लीच्या विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. केबिनमध्ये जाण्यास कुणीच तयार नव्हते. शेवटी मोठय़ा मुलांनी आम्हाला केबिनमध्ये ढकलून ते आमच्या मागून आले. नेहमी गंभीर दिसणारे खोतसर आज खूप कठोर वाटत होते. न विचारता त्यांच्या कार्यालयात पन्नास-साठ मुले पाहून ते ओरडले ‘काय आहे?’ सरांनी आपणास भेटण्यास सांगितल्याचे सांगताच, काल कुणीच कसं शाळेत आले नाही म्हणून विचारले. आम्ही ठरल्याप्रमाणे ‘रांजीला पूर होता म्हणून येता आले नाही’ असे उत्तर दिले. त्यावर सरांनी दुस-या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दाखला देऊन बरेच सुनावले. सर्वाची चांगलीच हजेरी घेतली आणि प्रत्येकाने आपल्या पालकांना घेऊन यानंतरच वर्गात बसण्यास फर्मावले.
सर्व जण शाळेबाहेर पडलो. काय करावे तेच कळत नव्हते. मी आणि माझा मित्र सुनील कुबल दोघे एस.टी.साठी बस स्टँडकडे निघालो. माझ्या छातीची धडधड पुढील चित्र डोळ्यांसमोर दिसत असल्याने वाढत होती, पण सुनील शांत होता, कारण त्याची आई कधी त्याला मारत नसे, पण माझी पाठ लाल होणार हे मला माहीत होते. आमच्या समोरून सुनीलचे दोन शेजारी मनू आणि शंभू धुरत येत होते. त्यांनी आमचा अवतार व उलटमार्गी येत असलेले पाहून प्रश्न केला, ‘काय रे, फिरताय खयं, शाळा नाय?’ आम्ही त्यांना सर्व प्रकार सांगितला व सुनीलने त्यांना आमचे भाऊ म्हणून खोतसरांना भेटण्याची विनंती केली. त्यांनी ते मानलं नाहीच, उलट म्हणाले, ‘शाळा चुकवन बाजार फिरतास, जावा आता आपापल्या औशींका घेवत शाळेत.’ सुनीलचे बाबा मुंबईत तर माझे वडील हयात नसल्याने आमच्या दोघांच्याही आईलाच शाळेत यावे लागणार होते, म्हणून आम्ही धुरत बंधूंच्या पाया पडलो, विनवण्या केल्या तेव्हा ते खोतसरांना भेटण्यास तयार झाले. सर्वप्रथम आमचे दोघांचे भाऊ (गावभाऊ) शाळेत आले आणि कसे तरी त्या प्रसंगातून सुटलो.
सायंकाळी घरी आल्यावर मी भीत-भीतच सर्व घटना आईला सांगितली व मार खाण्याची मनाची तयारी केली. आईने मोठ्ठे डोळे करून माझ्याकडे रागाने पाहताच मी रडू लागलो. तिने मला जवळ घेतले आणि म्हणाली, ‘असे कुणी सांगितले म्हणून चुकीची, मनाला न पटणारी गोष्ट आपण कुणाला घाबरून करता कामा नये, हे यापुढे लक्षात ठेव. तू मला ही गोष्ट परवाच सांगायला हवी होतीस, आईशी खोटं बोलण्याची चूक केलीस, जा आता देवाला नमस्कार कर आणि त्यांची माफी माग, पुन्हा असं कधी वागणार नाही सांग.’
आज इतक्या वर्षानंतरही हे सगळे प्रसंग मला काल-परवा घडल्यासारखे लख्ख आठवतात. मन बालपणीच्या अतिरम्य काळात हरवून जाते. तेव्हाचे शिक्षक प्रेमळ, मुलांच्या मनाचा विचार करणारे होते, म्हणूनच प्रसंगी चोप देत, पण पालक कधी त्यांना विचारत नसत. शिक्षकांवर त्यांचा विश्वास होता. मुलांना शिक्षकांबद्दल आदर होता, शिक्षणाचा बाजार झाला नव्हता. विद्यार्थीदशेत केलेल्या चुका वेळीच लक्षात आणून दिल्याने तशा चुका पुढील आयुष्यात झाल्या नाहीत. जीवनात शिस्त आली. आमच्या मतांना तेव्हा शिक्षकांनी न टाळल्याने, आम्हीही आमच्या मुलांची मते विचारात घेतो. ती दुर्लक्षित करीत नाही, त्यामुळे मुलांशी सुसंवाद राहतो. शालेय जीवनात मिळालेली ही संस्कार शिदोरी आयुष्यभर पुरणारी ठरली आहे.

हिरवी शाल.. निळाई विशाल..

हेएक आडगाव जरी असलं तरी त्याला निसर्गाची अजोड साथ मिळालीय. विविधरंगी फुला-पानांनी नटलेल्या या गावानं निसर्गाची शाल पांघरली आहे, असंच पाहाताक्षणी वाटतं. वेत्ये गावाला अथांग असा सागरी किनारा लाभलेला आहे. इथल्या शांत, निसर्गरम्य वातावरण म्हणजे शहरी वातावरणाला, ताणतणावाला कंटाळलेल्यांसाठी तणावमुक्तीचं नैसर्गिक औषधच आहे.
kokan
कोकण म्हणजे निसर्गाचं दान.. कोकण म्हणजे हिरवाई.. परमेश्वरानं कोकणात ओंजळ भरभरून रिती केल्याचा प्रत्यय इथलं निसर्गसौंदर्य न्याहाळताना नक्कीच येतो. निसर्गाच्या या कृपादृष्टीनं कोकणचं सौंदर्य अधिकच खुललंय.. कोकणला लाभलेली ७२० किलोमीटरची किनारपट्टी हा त्यातलाच एक सौंदर्यदुवा!
स्वच्छ, मनमोहक आणि रमणीय समुद्रकिनारे ही कोकणची खासियतच! त्यातले काही जगजाहीर आहेत तर निसर्गाच्या कोंदणात लपलेले अस्पर्श.. वेत्येचा विशाल समुद्रकिनारा हा त्यापैकीच एक! पर्यटक आणि निसर्गप्रेमींच्या नजरेपासून दूर राहिलेला हा समुद्रकिनारा कुठल्याही प्रसिद्ध चौपाटीइतकाच, किंबहुना त्यापेक्षा अधिक रमणीय आहे.
कोकणातलं श्रीदेवी महाकालीच्या वास्तव्याने पुनित झालेलं गाव म्हणजे, आडिवरे! धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून हे गाव प्रकाशझोतात आलंय. आडिवरेला संपन्न अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. ब्रिटिश काळात या ठिकाणी मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे या गावाचं नाव ‘अट्टेवरी’ असं ठेवण्यात आलं होतं.
कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन गावाला ‘आडिवरे’ असं नाव पडलं. नंतर हेच नाव महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचलं, ते महाकाली देवीच्या महात्म्यामुळे. श्री देवी महाकाली ही अनेकांची कुलदेवता असून, नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. त्यामुळे या ठिकाणी दूरदूरहून भक्त दर्शनाला येतात.
आडिवरे हे बारा वाडयांचं गाव आहे. खरं तर, या देवीचं वास्तव्य आडिवरे गावातील वाडापेठ या ठिकाणी आहे. मात्र, महाकालीसंदर्भाने वाडापेठऐवजी आडिवरे हेच नाव अधिक जोडलं गेलं आणि त्यामुळे प्रसिद्धीला आलं. या वाडापेठपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर वसलेलं आहे वेत्ये!
रत्नागिरीहून जाताना वाडापेठच्या मोठय़ा वळणाला लागूनच वेत्येला जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावरून जाताना ‘कालिकावाडी’ म्हणून एक भाग आहे. इथे श्री देवी कालिकामातेचं  सुंदर मंदिर आहे. हे मंदिर फारसं प्रकाशझोतात आलेलं नसलं तरी ‘नवसाला पावणारी देवी’ अशीच या देवीची महती आहे.
वेत्ये गावात भंडारी समाजाची मोठी वस्ती आहे. या गावाला श्रीदेवी महाकालीचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. या गावातील जाधव यांचा पूर्वज मासेमारीसाठी समुद्रात गेला असता त्याने मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळय़ात देवीचे पाषाण अडकले. त्याने ते पाषाण गावात आणून गावक-यांना दाखविले.
हळूहळू ही माहिती सर्वत्र पसरताच पाषाण कोठे बसवायचे यावर विचारविनिमय करण्यात आला. चर्चेअंती वाडापेठला देवीची स्थापना करण्यात आली. ही देवी वेत्येमधून आली म्हणून या गावाला देवीचं माहेरघर म्हटलं जातं. आजही वेत्ये या गावाची ओळख अशीच आहे.
आजही देवीला कौल लावल्यानंतर तिने माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास वेत्ये गावात तिच्या आगमनाचा उत्साह संचारतो. तिच्या आगमनाची चाहुल लागली की, संपूर्ण गाव तिच्या स्वागताच्या तयारीला लागतं. गावचे चाकरमानीदेखील तितक्याच लगबगीने गावात दाखल होतात.
सटीसामाशी येणा-या माहेरवाशिणीची जशी डोळय़ात तेल घालून वाट पाहिली जाते तशीच वाट येथील ग्रामस्थ या दिवसाची वाट पाहताना दिसतात.
मच्छीमारी आणि शेती हाच वेत्ये ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय आहे. हे एक आडगाव जरी असलं तरी त्याला निसर्गाची अजोड साथ मिळालीय. विविधरंगी फुला-पानांनी नटलेल्या या गावानं निसर्गाची शाल पांघरली आहे, असंच पाहाताक्षणी वाटतं. वेत्ये गावाला अथांग असा सागरी किनारा लाभलेला आहे.
इथल्या शांत, निसर्गरम्य वातावरणामुळे किना-यावर आलेल्या माणसाचं मन प्रसन्न होतं. तसं पाहिलं तर वेत्ये गाव रुढार्थाने पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालेलं नाही. किंबहुना पर्यटनस्थळी असणारी कुठलीही आकर्षणं इथे नाहीत. परंतु, निसर्गाने आपल्या विविध रंगांची मात्र इथे मुक्त हस्ते उधळण केली आहे. वेत्ये गाव पाहिलं की गारव्याचा भास होतो. हिरवाईनं मन अक्षरश: चिंबून जातं.
शहरी वातावरणाला, ताणतणावाला कंटाळलेल्यांसाठी तर हे तणावमुक्तीचं नैसर्गिक औषधच आहे. इथला शांत, मनाला भुरळ पाडणारा समुद्र पाहिल्यानंतर मनाचा थकवा केव्हाच निघून जातो. नजरेसमोर पसरलेला अथांग समुद्र..  एका बाजूला असणारी उंचच उंच टेकडी..
समुद्र आणि गाव यांमध्ये हिरवी रेषा ओढणारं सुरूबन.. हे सगळं पाहिल्यानंतर निसर्गाच्या कुंचल्याचा हा छोटासा, पण अप्रतिम देखावा चित्रबद्ध करण्याची इच्छा झाल्यावाचून राहत नाही. विशेष म्हणजे एकदा इथे आलं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं.
याच ठिकाणी थंब देव म्हणून महापुरुषाचं ठिकाण आहे. वर्षातून एकदा इथे सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. गावात एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं तळंदेखील आहे.
अनेक बाबतीत सरस असूनही वेत्ये गाव इतर पर्यटनक्षेत्रांप्रमाणे पाहिजे तसं नावारूपाला आलं नाही. या गावाकडे सातत्याने झालेलं लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणांना लाभलेला समुद्रकिनारा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाला. पण वेत्ये मात्र त्याला आजही अपवाद ठरलंय. एवढंच कशाला, या गावाचा विकास पाहिजे तसा आजही झालेला नाही. गावात पुरेशी बाजारपेठ देखील नाही.
गावात ये-जा करणा-या दोन बसेसवर वाहतुकीची सगळी मदार आहे. गावची रस्त्याची गरजही पुरेशी भागलेली नाही. या गावच्या सुविधा झाल्या. पण ज्यामुळे गावाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असं गावाच्या सौंदर्यात भर घालणारं सुरूबन आता हळूहळू नष्ट होऊ लागलंय. तिकडे कुणाचंही लक्ष नाहीय. पर्यटन यादीत समावेश होऊनही हे गाव मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे. विकासासाठी मिळालेला निधी इथे खर्चच पडलेला नाही.
असं असलं तरी, आता या गावाची वेगळी ओळख पुढे येऊ लागलीय. गावात असलेल्या समुद्रकिना-याचा फायदा घेऊन राजापूर शिपयार्ड प्रकल्प इथे उभारला जातोय. या प्रकल्पामुळे इथलं राहणीमान थोडंफार सुधारताना दिसतंय. पूर्वीच्या कौलारू घरांवर आता सिमेंटचा थर पडू लागला.
अनेकांच्या दारात वाहनंसुद्धा आहेत. ही जादू आहे इथे येऊ घातलेल्या प्रकल्पांची. या प्रकल्पामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांची परिस्थिती निश्चित सुधारेल. नुसता इतक्यानेच गावचा विकास होणार नाही. प्रकल्पाबरोबरच या गावाला पर्यटनाची जोड मिळाल्यास वेत्ये हा समृद्ध गाव होण्यास वेळ

Monday, April 20, 2015

अकोले , ता . २०"अलंग, मदन व कुलंग भटकंती
हिरवी धुंदी लेवून न्हाली डोंगरातील वाट, गडदुर्गांच्या भटकंतीतून अनुभवा सह्याद्रीचा थाट !!!
कोणत्या ठिकाणाचे भाग्य केव्हा उजळेल, हे सांगता येत नाही. कधी कोणाचा कुठे जाण्याचा बेत आखला जाईल याचाहि ट्रेकर्सच्या बाबतीत काही नेम नसतो.. चार चाकी नसलं तरी दुचाकी वाहनातून छोट्या-मोठ्या सहलींना जाणं खूप जणांना अप्रूप वाटतं. पण नेहमीच्या ठिकाणांपेक्षा जरा वेगळे आणि इतरांना अपरिचित ठिकाणी जाणे काही जातिवंत भटक्यांना नेहमीच खुणावत असतं. यातून विशाल नाईकवाडी, सुरेश भालेराव, विठ्ठल गोरे व मी राजू ठोकळ असा चौघांचा अचानक बेत ठरला आणि सह्याद्रीतील अकोले तालुक्याच्या कुशीतील दुर्गत्रिकुट अलंग, मदन व कुलंग (AMK) सर करण्याचा निर्णय झाला. गडांवर जाणे फारच जिकीरीचे काम आहे असे ऐकले असल्याने सोबत गाईड म्हणून एकनाथ खडके यांना घाटघर (ता.अकोले) येथून सोबत घेतले. सोबत ट्रेकिंगसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य, तीन दिवस पुरेल इतके खाद्य पदार्थ आठवणीने घेतले होते.
दुपारच्या उन्हात आम्ही अलंग गडाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. रस्त्याने सह्याद्रीच्या कुशीतील विविध वृक्ष नजरेस पडत होते. चालण्याचा वेग काही नाविन्यपूर्ण वृक्षांजवळ कमी होत होता. पण अधिक वेळ थांबणे उचित ठरणारे नसल्याने आम्ही तसेच आमचा चालण्याचा वेग वाढवत होतो. काही अंतर चालल्यानंतर पाठीवरील बि-हाड जरा जड वाटायला लागले होते. परंतु सर्वच गरजेच्या वस्तू असल्याने तो भार आम्ही गडाच्या माथ्याकडे पाहत सहन करत होतो. मध्येच गाईड परिसरातील वृक्ष, प्राणी, गावे आदींची माहिती करून देत होतो. सर्व माहिती आम्ही मनात साठवत व काही निरीक्षण करत सह्याद्रीच्या प्रेमात रमत-गमत चालत होतो. सूर्य जसजसा मावळतीकडे सरकत होता तसतसे आम्ही अधिक वेगाने आमची पावले गडाच्या दिशेने टाकत होतो. कारण अलंग गडावर जाण्यासाठी एक सहा-सात फुटांचा कातळकडा (Rock patch) आम्हाला पार करायचा होता. शेवटी आम्ही काहीसा अंधारातच परंतु अधिक सावधगिरीने हा टप्पा पार केला. यात विशालचा अधिक कस लागला. परंतु काहीसा धीर दिल्याने त्यानेही हा टप्पा अलगद पार केला. हा टप्पा पार करत असताना रात्रीच्या स्वयंपाकासाठी वाळलेली लाकडे गोळा करत आम्ही पुढे सरकू लागलो. वाटेत एक दरवाजा लागला परंतु अंधार अधिक असल्याने आम्हाला येथे अधिक निरीक्षण करण्यास संधी मिळाली नाही. येथून पुढचा प्रवास आम्हाला अधिक सावधरीतीने पार करायचा होता कारण उजव्या बाजूला नजर पोहोचणार नाही इतके गगनभेदी कातळकडे तर डाव्या बाजूला हृदयाची स्पंदने धडधड करायला लावणारी खोल दरी होती आणि त्यात सोबतीला अंधार होता. चालताना चुकून पायाखालचा दगड जर सरकला तर तोल जावून दरीत कोसळण्याची भीती यामुळे काहीसे सावध आम्हीं एकमेकाला सुचना करत पुढे सरकत होतो. हातातील विजेरीच्या साहाय्याने आजूबाजूला काही किल्ल्याचे अवशेष आहेत का याचाही शोध मात्र आमच्या नजरेला स्वस्थ बसू देत नव्हता. काही अंतर पार केल्यानंतर दगडातील काही कोरीव गुहा अंधारातच न्याहाळत आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी रात्री काहीशा उशिराने आम्ही गडावरील एका गुहेत मुक्कामासाठी पोहचलो. पाठीवरील ओझे हलके झाल्याने त्या काळ्याकुट्ट अंधारात आम्ही गुहेची रचना, कोरीव काम, गुहेतील पाण्याची सोय आदींचे निरीक्षण केले. गडावरील हि सर्वात मोठी राहण्यासाठी योग्य असणारी गुहा आहे.
दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. किल्ले भटकंती करताना सूर्योदय पाहणे हा आमचा खास छंद असल्याने आम्ही त्याचा मनसोक्त आनंद घेतला. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. यातील काही टाक्यांमध्ये बाराही महिने पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे. मंदिराजवळ एक शिलालेख आपणास दिसतो. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसत असल्याने मनात एक वेगळा आनंद आम्ही साठवत होतो. पूर्वेला कळसूबाई, औंढाचा किल्ला, पट्टाकिल्ला, बितनगड, उत्तरेला हरिहर ,त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका , रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर वातावरण स्वच्छ असल्याने सहज नजरेत पडत होता. किल्ल्याचा माथा फिरून झाल्यानंतर मदन किल्ल्याकडे जायचे असल्याने आम्ही परत मुक्कामाच्या ठिकाणी येवून आमचे साहित्य आवरले....पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या व पुढील प्रवासास सुरुवात केली.
अलंग गडावरील सपाटीची वाट संपल्यानंतर उताराची आणि काहीशी अवघड कातळात कोरलेल्या पाय-यांची वाट लागली. समोरच खाली खोल दरी दिसत असल्याने एक-एक पायरी उतरणे जरा अवघड वाटत होते. पाठीवर ब्याग असल्याने उतरताना मागे लागून पुढे तोल जाण्याचा धोका अधिक होता. त्यामुळे प्रत्येकजण अगदी जीव मुठीत धरून खाली उतरत होता. आम्ही या पाय-या उतरून एका लहान गुहेपर्यंत आलो. येथून पुढे जाण्याचा मार्ग दिसत नव्हता. येथून पुढच्या पाय-या इंग्रजांनी सुरुंग लावून तोडल्या असल्याचे एकनाथ खडके यांनी सांगितले आणि एकच तिडीक आमच्या मस्तकात गेली. परंतु मनातील आग सावरत आम्ही ५० फुटांचे प्रस्तरारोहण करण्यास सज्ज झालो होतो. गाईडने रोप व त्यासाठी आवश्यक असणारी इतर सर्व तयारी पूर्ण केली होती. तसेच काही सूचनाही आम्हाला देत होता. काहींची प्रस्तरारोहणाची पहिलीच वेळ असल्याने अगोदर कोण जाणार याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच विशाल नाईकवाडी सर्वात प्रथम खाली आला. त्याचा प्रवास बघून इतरांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे सुरक्षितपणे सर्वांनी तो कातळकडा पार केला. या पुढे कातळात काही पाय-या लागल्या. त्यांची रचना स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यानंतरच्या गुहेत काही जणांच्या राहण्याची सोय होवू शकेल इतकी जागा दिसली.
अलंगगडाची उतरण संपल्यानंतर गडाच्या मध्यावधी भागातून अगदीच उंच कातळकड्यांच्या जवळून मदन गडाचा रस्ता आम्ही कारवीच्या झाडांमधून शोधत पुढे सरकत होतो. रस्त्यात अनेक कडे कोसळलेले अन काही कोसळण्याच्या अवस्थेत दिसले.....मन अगदीच धस्स होत होते. सह्याद्रीचा हा अनमोल खजिना असा उपेक्षित असल्याने मनावरचे दडपण अधिक वाढत होते. काही अंतर पार केल्यानंतर मदन गडावर जाणा-या कातळातील पाय-यांनी लक्ष वेधले. मग मनात चलबिचल सुरु झाली कधी एकदाचा त्या पाय-या स्वताच्या हातांनी स्पर्श करतो....स्वताच्या श्वासाने पाय-यांचा सुगंध अनुभवतो.....स्वताच्या मनाने येथील इतिहास जाणतो.
अगदीच समोर दिसणारा मदन गड पण प्रत्यक्ष पोहचण्यास आमची काही प्रमाणात दमछाक होत होती. कातळातील सुबक पाय-या वादळ, वारा, ऊन, पाऊस झेलत आजही प्राचीन इतिहासाची साक्ष देतात. या पाय-या पाहून झालेला आनंद मनात साठवत पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा इंग्रजांनी अगदीच कुत्सितपणे सुरुंग लावून पाय-या उडवून दिल्याने तयार झालेला सुमारे ५० फुटांचा कातळकडा नजरेस पडला. मदन गडाच्या माथ्यावर जायचे असेल तर या कड्यावर प्रस्तरारोहण करावे लागते. त्याशिवाय गडावर जाणारी दुसरी वाट नाही. येथील प्रस्तरारोहण केल्यानंतर आम्ही गडाच्या माथ्यावर कातळातील काही पाय-या चढून पोहचलो आणि जणू काही स्वर्गात आल्याचा अत्यानंद झाला. गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी शिल्लक राहत असावे असे वाटते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसत होता. मदनगडावरून अलंग, कुलंग, छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई, डांग्या सुळका, हरिहर, त्रिबंकगड हे किल्ले आम्हा सर्वांचे लक्ष्य वेधत होते. दूर अंतरावरून दिसणारे मदनगडावरील नेढ मात्र गडावरून दिसत नव्हते. गडावर अधिक वेळ न वाया घालवता आम्ही गडावरील टाक्यांतील पाणी पिऊन परतीच्या प्रवासाला लागलो. मदनगडाचा अवघड कातळकडा व दगडी पाय-या उतरल्यानंतर आम्ही कुलंग गडाच्या दिशेने आमचा प्रवास सुरु केला.
दुपारचा आकाशात तळपणारा आणि दोन दिवस पाठीवरील ओझे घेवून चालत असल्याने येथून पुढचा कडेकपारीतून जाणारा रस्ता पार करत असताना अधिक जिकीरीचे वाटत होते. त्यात वाट घसरणारी असल्याने अधिक सावधगिरी बाळगावी लागत होती. मदन ते कुलंग असे अंतर खूप होते आणि आमच्याकडे वेळ कमी होता. सूर्यास्त होण्याच्या अगोदर आम्हाला कुलंग गडाच्या माथ्यावर पोहोचणे आवश्यक आहे अशा सुचना गाईडने दिल्या होत्या. त्यामुळे अधिक इतरत्र कुठे न थांबता आम्ही सभोवतालचा निसर्ग न्याहाळत अंतर पार करत होतो. शेवटी सूर्य मावळतीकडे कलला होता. सभोवताली अंधार पसरला होता आणि आम्ही कुलंग गडाच्या पाय-या चढायला सुरुवात केली होती. या गडावर कातळात कोरलेल्या पाय-यांची संख्या इतर दोघांच्या तुलनेत अधिक आहे. त्यात या पाय-या चढत असताना अगदीच कड्याच्या काठालगत पाय ठेवून जावे लागत असल्याने खूप मोठी खबरदारी प्रत्येकाला घ्यावी लागत होती. पुढे आल्यानंतर गडावरील दुस-या क्रमांकाचा दरवाजा आजही चांगल्या अवस्थ्येत असल्याने मनाला खूप बरे वाटले. काळाकुट्ट अंधार पडायच्या आत आम्ही गडावरील पाण्याच्या टाक्यांजवळ पोहचलो. टाक्यांतील पाणी पिऊन सर्व थकवा कुठे गायब झाला आणि मन कसे प्रसन्न झाले हे क्षणार्धात आम्हाला कळले नाही. या प्रसन्न मनाने आम्ही गडावरील गुहेत मुक्कामासाठी पोहचलो. गडावर कातळकड्यांमध्ये दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य असल्याने आम्ही निवांतपणे तेथे विसावलो.
सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा सर्वजण कुलंग गडावरून सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. सूर्याच्या दर्शनाने संपूर्ण भटकंती सफल झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होते. यानंतर सर्वांनी गडावरील अवशेष पाहाण्यास सुरुवात केली. कुलंगचा दुसर्‍या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे. गुहे जवळ थोडे पुढे पाण्याची २-३ टाकी आहेत. यातील पहिल्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. ही टाकी बर्‍यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटले. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर गेलो. इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन झाले. कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी आल्यानंतर पाण्याचे प्राचीन काळातील नियोजन किती उत्कृष्ट होते याची जाणीव झाली. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. कुलंगवरील एका घळीपाशी आल्यानंतर घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळाला. या घळीत वरील बाजूने येणार्‍या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसला. या बांधार्‍याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली आहेत. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्‍यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडण्याची व्यवस्था केलेली आहे. दुर्दैवाने हे गोमुख तुटलेले दिसल्याने माझ्या मनाला खोलवर तडा गेला. कुलंग गडावरून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होत होते. दूरवर कळसूबाईचे शिखर आकाशाला गवसणी घालताना दिसत होते. पश्चिमेकडे रतनगड व बाजूचा खुट्याचा सुळका पाहून तीन दिवसांत सह्याद्री आम्हास प्रसन्न झाल्याचा आनंद होत होता.
अलंग, मदन व कुलंगच्या भटकंतीत आम्हाला सह्याद्रीच्या अनोख्या रूपाचे दर्शन झाले. तसेच बऱ्याचश्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आपणच सह्याद्रीची योग्य ती निगा राखली तर येणाऱ्या काळातही इतरांना त्याचे हे रूप अनुभवता येईल. सह्याद्रीने आपल्याला भरभरून दिलेले आहेच पण आता मात्र त्याचं काहीतरी देणं लागतो ही भावना लक्षात घेण्यासारखी आहे. आपापल्या परीने आपण जमेल तेवढं सह्याद्रीला आणि येथील निसर्गसौंदर्याला जपायला हवं....का कोण जाणे तुम्हाली बघून इतरही प्रेरित होतील आणि परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

Friday, April 17, 2015

(no subject)

 अकोले , ता . १८:कोकिळेची कुहुकुहुऽऽ जेथे सुरू असते. त्या ठिकाणी तुमचे सहज लक्ष जाईल. येथेच तोरणांचे माणिक-मोती तुमच्यासाठीच वाट पाहत असतील. तोरणे म्हणजे साखरेच्या पाकातले रसगुल्लेच..सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये एव्हाना रानमेव्याच्या खजिन्याची ताटे भरू लागली आहेत. त्याच्या दरबारात जायचे असेल तर ‘मी’ पणा सोडायला हवा. काटय़ांचा आणि दगडांचा रोष मानून चालणार नाही. कुठची फांदी तुम्हाला अडवेल हे सांगता येणार नाही. तिला थेट सामोरे गेलात तर परिणाम भयानक होतील. त्या फांदीची हळुवार समजूत काढावी अथवा तलवार चालविल्याप्रमाणे हातातील शस्त्र चालवावे म्हणजे वाट मोकळी होईल. पण पाऊल जपून, कारण हे जंगल त्यांचं असतं, येथे फिरणाऱ्या प्राण्यांचा त्यावर हक्क असतो. आपण पाहुणे असतो, काही क्षणाचे! पावलापावलावर याचे भान ठेवून भल्या पहाटे सुटावे जंगलात
काटेरी फांद्यांवर पाचूंप्रमाणे हे पांढ-या द्राक्षांचे घोस लगडलेले असतात. ही फळे चवीला फारच छान असतात. परंतु, ती मिळविताना काटय़ांचा विचार करावा लागतो. तोरणांच्या जाळय़ांप्रमाणेच हिरवे, पिवळे वाटाणेच काही झाडांवर पैंजन अडकवल्याप्रमाणे लोंबकळत असतात. हिला आटकन म्हणतात. तीही याच कुळाचारातली. फक्त चव आंबट-गोड..
सह्याद्री पार करायचा तर करवंदांना अव्हेरून चालणार नाही. माघ महिन्यापासूनच त्यांची लगबग सुरू होते. आता परिपक्व झालेली करवंदे रंग बदलू लागली आहेत. आंबट-गोड करवंदांचा आस्वाद पुढील पंधरा दिवसांपासून सुरू होईल. डोंगरची काळी मैना तिला का म्हणतात हे डोंगरात फिरत-फिरत रानातल्याच एखाद्या पानाचा खोला करून (पानाचा द्रोण) त्यात ती घ्यावीत आणि मनाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा.
आता या करवंदांचा हिरवा साज पाहायला मिळतो. खिरमटीच्या थाळीत केव्हा-केव्हा यांच्याही उभ्या-आडव्या भेशी पडतात. असं म्हणतातहिरडय़ांमधून येणारे रक्त करंवदं खाताच चटकन बरेही होते.  आताशी भ्रमंती करायची तर भूक क्षमविण्याचा प्रश्नच नाही. सह्याद्रीच्या भ्रमंतीत मीठ, मसाला, चवीपुरते गूळ घेतले म्हणजे झाले. बाकी काही नको. आपली जीभ भली की आपण.. खायचे किती आणि कसे हेच समजत नाही. सोबत फोटो akl १८p १,२ कोकीळ  व करवंदे म्हणजेच डोंगरची काळी मैना  
5 Attachments
Preview attachment akl18p1.jpg
Preview attachment akl18p2.jpg
Preview attachment akl18p3.jpg
Preview attachment akl18n1.txt

अकोले , ता . १८:कोकिळेची कुहुकुहुऽऽ जेथे सुरू असते. त्या ठिकाणी तुमचे सहज लक्ष जाईल. येथेच तोरणांचे माणिक-मोती तुमच्यासाठीच वाट पाहत असतील. तोरणे म्हणजे साखरेच्या पाकातले रसगुल्लेच..सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये एव्हाना रानमेव्याच्या खजिन्याची ताटे भरू लागली आहेत. त्याच्या दरबारात जायचे असेल तर ‘मी’ पणा सोडायला हवा. काटय़ांचा आणि दगडांचा रोष मानून चालणार नाही. कुठची फांदी तुम्हाला अडवेल हे सांगता येणार नाही. तिला थेट सामोरे गेलात तर परिणाम भयानक होतील. त्या फांदीची हळुवार समजूत काढावी अथवा तलवार चालविल्याप्रमाणे हातातील शस्त्र चालवावे म्हणजे वाट मोकळी होईल. पण पाऊल जपून, कारण हे जंगल त्यांचं असतं, येथे फिरणाऱ्या प्राण्यांचा त्यावर हक्क असतो. आपण पाहुणे असतो, काही क्षणाचे! पावलापावलावर याचे भान ठेवून भल्या पहाटे सुटावे जंगलात
काटेरी फांद्यांवर पाचूंप्रमाणे हे पांढ-या द्राक्षांचे घोस लगडलेले असतात. ही फळे चवीला फारच छान असतात. परंतु, ती मिळविताना काटय़ांचा विचार करावा लागतो. तोरणांच्या जाळय़ांप्रमाणेच हिरवे, पिवळे वाटाणेच काही झाडांवर पैंजन अडकवल्याप्रमाणे लोंबकळत असतात. हिला आटकन म्हणतात. तीही याच कुळाचारातली. फक्त चव आंबट-गोड..
सह्याद्री पार करायचा तर करवंदांना अव्हेरून चालणार नाही. माघ महिन्यापासूनच त्यांची लगबग सुरू होते. आता परिपक्व झालेली करवंदे रंग बदलू लागली आहेत. आंबट-गोड करवंदांचा आस्वाद पुढील पंधरा दिवसांपासून सुरू होईल. डोंगरची काळी मैना तिला का म्हणतात हे डोंगरात फिरत-फिरत रानातल्याच एखाद्या पानाचा खोला करून (पानाचा द्रोण) त्यात ती घ्यावीत आणि मनाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा.
आता या करवंदांचा हिरवा साज पाहायला मिळतो. खिरमटीच्या थाळीत केव्हा-केव्हा यांच्याही उभ्या-आडव्या भेशी पडतात. असं म्हणतातहिरडय़ांमधून येणारे रक्त करंवदं खाताच चटकन बरेही होते.  आताशी भ्रमंती करायची तर भूक क्षमविण्याचा प्रश्नच नाही. सह्याद्रीच्या भ्रमंतीत मीठ, मसाला, चवीपुरते गूळ घेतले म्हणजे झाले. बाकी काही नको. आपली जीभ भली की आपण.. खायचे किती आणि कसे हेच समजत नाही. सोबत फोटो akl १८p १,२ कोकीळ  व करवंदे म्हणजेच डोंगरची काळी मैना 

शालेय जीवनातली संस्कार शिदोरी!

आज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही, पण ५०-५५ वर्षापूर्वी आमचे गाव तारकर्ली म्हणजे एखाद्या खेडय़ाप्रमाणे खूपच अविकसित होते. 
aathvan copyआज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही, पण ५०-५५ वर्षापूर्वी आमचे गाव तारकर्ली म्हणजे एखाद्या खेडय़ाप्रमाणे खूपच अविकसित होते. मालवणला जाण्या-येण्यास एस.टी. बस सुरू व्हायची होती. गावात रस्ते, वीज यांसारख्या आवश्यक गोष्टीही नव्हत्या. वृत्तपत्रे मिळत नव्हती. अख्ख्या गावात एक-दोन जणांच्या घरी रेडिओ होते, पण तेही खूपदा बंदच असतं, कारण एकदा रेडिओ बिघडला की तो दुरुस्त करणारा जवळपास कुणी नव्हता.
मूल आजारी असेल तर गावात डॉक्टर नसल्याने मुलाला उचलून सहा कि.मी. दूर मालवणला घेऊन जाण्याची धमक तेव्हा आमच्या आयांमध्ये होती. दुसरा इलाजच नव्हता. मुंबईला असलेल्या मुलाचे पत्र येई तेव्हा त्यांची खुशाली कळत होती, त्यामुळे त्या काळी अशी माणसे पोस्टमनची वाट देवासारखी पाहत असत. कुणी चाकरमानी गावी येई तेव्हा मुंबईच्या गमतीजमती ऐकायला त्याच्याकडे गर्दी जमायची.
कमी अधिक प्रमाणात त्या काळी सर्व गावांची स्थिती अशीच होती. इतर कोणत्याही सोयी-सुविधा नसल्या तरी सरकारी मत्स्योद्योग विद्या मंदिर-तारकर्ली ही पहिली ते सातवीपर्यंतची सरकारी शाळा मात्र आमच्या गावी होती. प्रत्येक वर्गाला वेगळा शिक्षक होता. या आमच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग काथ्याच्या चटईवर तर पाचवी ते सातवीचे बेंच वर बसत.
आम्ही चौथीत असताना म्हणजे १९६९-७० साली एके दिवशी आमच्या वर्गातील सारी मुले दप्तर घेऊन वर्गाबाहेर बसली. आमच्या वर्गात जे दोन-चार जाणते म्हणजे प्रत्येक वर्गात दोन-दोन वेळा बसून चौथीपर्यंत आले होते, त्यांनी आम्हा सर्वाना वर्गाबाहेर बसवले होते. त्यांना वर्गाबाहेर बसण्याचे कारण विचारलं तेव्हा समजले, आपल्याला वर्गात बसण्यासाठी बेंच हवेत.
साडेदहा वाजता आमचे वर्गशिक्षक कोळंबकर मास्तर हे वर्गात आले तर वर्ग रिकामा आणि मुले वर्गाबाहेर बसलेली असे अपूर्व दृश्य पाहिले. मास्तरांनी आमच्याजवळ येऊन आम्ही बाहेर बसण्याचे कारण विचारले. आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मुले ऐकेनात. मग त्यांनी ही बातमी मुख्याध्यापकांना सांगितली. मुख्याध्यापक होते साधले मास्तर; प्रेमळ पण कडक शिस्तीचे. दांडगाई करणारी मुलेही ते येताच शांत होत असत.
साधले मास्तरांनी वर्गाबाहेर बसण्याचे कारण विचारले. एक-दोन मोठय़ा मुलांनी खाली नजर ठेवूनच कारण सांगितले. मुख्याध्यापक समजावत म्हणाले, ‘अरे शाळेचे काही नियम असतात, तुम्हाला पुढच्या वर्षी बेंच मिळणार बसायला. माझे ऐका वर्गात बसा.’ तरीही कुणी उठेना. उलट एक जण म्हणाला, ‘बेंच दिल्याशिवाय आम्ही वर्गात बसणार नाही. परांजपे मास्तरांच्या सुतारकामाच्या वर्गात इतके बेंच धुळ खात पडलेत, ते द्या आम्हाला बसायला.’ मग मास्तरांचा नाईलाज झाला. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘मुले आणि बेंच किती आहेत ते पाहतो व पुरण्यासारखे असतील तर शनिवारी वर्गात लावतो.
आता वर्गात बसा.’ मुख्याध्यापकांकडून असे आश्वासन मिळाल्यावर आम्ही एक एक करत वर्गात जाऊन बसलो. वास्तविक मुख्याध्यापकांनी आम्हाला इतके समजावून न सांगता वर्गाबाहेर उठा-बशा काढण्याची, ओणवे राहण्याची किंवा पालकांना बोलावून शिक्षा दिली असती तरीही ते योग्य ठरले असते. इतकेच नव्हे तर त्या काळी विद्यार्थ्यांना मार दिला तरी पालक विचारत नसत, पण आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिक्षा दिली नाही, तर सोमवारपासून आम्ही चौथीतच बेंचवर बसू लागलो. माझ्याप्रमाणे दोन-तीन विद्यार्थी बेंचवरून हात पुरत नाही म्हणून उभे राहून लिहीत असू.
१९७३ साली सातवीत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात आम्ही मुलांनी ‘जिंकू किंवा मरू.. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू’ हे स्फूर्तिगीत सादर करायचे ठरवले होते. सरावही झाला होता. स्नेहसंमेलनाच्या दिवशी म्हणजे रात्री आमचे गीत सादर होण्यापूर्वी कुणीतरी सांगितले, सगळे मास्तर, बाई आणि शिपाई नानकटाई खाताहेत कॉफीबरोबर. झाले, हे समजल्यावर आमचा ‘इगो’ दुखावला. आम्ही सातवीत म्हणजे शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थी. शिवाय आमचे शेवटचे वर्ष तरी आम्हाला न देता हे कसे खातात? कुणाच्या तरी डोक्यात आलं, चला कार्यक्रमावर बहिष्कार आणि तसा निरोप शिपायांना दिल्यावर शिक्षकांची धावपळ झाली.
त्यांनी आम्हाला समजावलं, पण कुणी तयार होईना. शेवटी शिक्षक म्हणाले, ‘आता सर्वाना पुरतील इतक्या नानकटाई नाहीत, शिवाय गावात मिळणारही नाहीत. तुम्ही कार्यक्रम करा, उद्या रजा आहे, परवा पूर्ण वर्गाला नानकटाई आणि कॉफी देऊ.’ शिक्षकांकडून अशी कबुली मिळाल्यावर मग आमचे गाणे झाले आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण वर्गाला कॉफीसोबत नानकटाईही मिळाली. आज त्या नानकटाईची चव ना कुकीजमध्ये ना कशातच.
आमच्या गावात सातवीच्या पुढे शाळा नसल्याने आम्ही आठवीपासून मालवणला जात असू. कॉलेजला बंक सगळेच मारतात. शाळेला दांडय़ाही खूप जणांनी खूप वेळा मारल्या असतील; पण आम्ही हायस्कूलमध्ये असताना फक्त एकदाच मारलेल्या दांडीने आम्हा सर्वाना (मास बंक होता) रडू आणले व अद्दल घडवली. गावी दिवसभराची (पूर्णवेळ) शाळा असल्याने आम्ही जेवण करून सकाळी साडेआठ वाजता घर सोडायचो. तारकर्ली ते मालवण सहा कि.मी. अंतर मस्त समुद्रकिनाऱ्यावरून चालत जावे लागे. आता एसटी सुरू झाली होती, पण पासाला पैसे नव्हते. आमच्या गावाच्या सीमेवरील ‘रांज’ पार करूनच आम्हाला पुढे जावे लागे.
एरवी कुणाच्या खिजगणतीत नसणारी, संथ वाहणारी रांज पावसाळ्यात भीषण रौद्र होत असे. डोंगर दऱ्यातून वाहत येऊन जे पाणी समुद्राला मिळते त्या पाण्याच्या प्रवाहाला आमच्याकडे ‘रांज’ असे म्हणतात. पावसाळ्यात नवीन माणूस रांज पार करायला जाईल तर तो गटांगळ्या खात समुद्रात गेलाच म्हणून समजा. पायाखालील वाळू झपाटय़ाने खचते, सरकते. वरून पाण्याचा लोंढा त्यात नवख्या किंवा कमी ताकदीच्या माणसाचा टिकावच लागून देत नाही. अशावेळी आम्हा शाळकरी मुलांना गावातील तरुण, तगडी, अनुभवी माणसे दप्तरासह उचलून घेऊन रांज पार करून देत. पुढच्या बाजूस रांजीवर त्यावेळी लाकडी साकव बांधलेला असे पण आम्ही जात नसू. तो लांबचा मार्ग होता. पाचेक कि.मी. चालल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर दांडी गावी श्रीदांडेश्वराच्या मंदिरात आम्ही सर्व एकत्र जमून मग पुढे हायस्कूलला जात असू.
याच दांडेश्वर मंदिरात एकेदिवशी दहावी-अकरावीच्या विद्यार्थ्यांनी सर्वाना सांगितले, ‘उद्या रोजच्याप्रमाणे सर्वानी येथेच जमायचे. मालवण शहरात जायचे पण हायस्कूलमध्ये न जाता दुपापर्यंत मालवण फिरून घरी जायचे.
घरी सांगू अर्ध्या दिवसाने शाळा सोडली म्हणून.’ या गोष्टीला आम्ही आठवीवाल्यांनी थोडा विरोध केला; पण आमचं काही चाललं नाही, पण आमच्यापैकी एक विद्यार्थी दुस-या शाळेत शिकत होता. तो तयार झाला नाही, तेव्हा त्याची शाळा वेगळी आहे म्हणून त्याला या योजनेतून मोकळं केलं.
दुस-या दिवशी मालवणला जाऊनही कुणीही शाळेत न जाता उगीचच मालवण फिरत राहिलो. दुपापर्यंत फिरून कंटाळा आला मग दुपारी घरी गेलो. तिकडे आमच्या हायस्कूलमध्ये प्रत्येक वर्गातील कोणत्याच तुकडीत आठवी ते अकरावीचा एकही विद्यार्थी उपस्थित नाही, हे पाहून तारकर्लीला काहीतरी गंभीर घटना घडली असावी, हे शिक्षकाच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित मुख्याध्यापकांना खबर दिली व मुख्याध्यापकांनी शिपायाला मालवणातील दुस-या हायस्कूलमध्ये कुणी तारकर्लीचा विद्यार्थी आला आहे का, हे पाहण्यास पाठवले. आमच्या दुर्दैवाने तिथे आठवीच्या वर्गात आमच्या योजनेतून बाद झालेला विद्यार्थी हजर होता. त्याने सांगितले की, सर्व जण माझ्याचबरोबर मालवणला आलेत. खोतसरांना हे समजल्यावर त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी शिक्षकांना काही सूचना दिल्या.
दुस-या दिवशी आम्ही साळसूदपणे काही घडलेच नाही अशा आविर्भावात आपापल्या वर्गात बसलो. हजेरी झाल्यानंतर प्रत्येक वर्गशिक्षकाने आम्हा तारकर्लीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक खोतसरांना भेटण्यास सांगितले. त्या दिवशी खोतसरांच्या केबिनबाहेर आठवी ते अकरावीत असणाऱ्या फक्त तारकर्लीच्या विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. केबिनमध्ये जाण्यास कुणीच तयार नव्हते. शेवटी मोठय़ा मुलांनी आम्हाला केबिनमध्ये ढकलून ते आमच्या मागून आले. नेहमी गंभीर दिसणारे खोतसर आज खूप कठोर वाटत होते. न विचारता त्यांच्या कार्यालयात पन्नास-साठ मुले पाहून ते ओरडले ‘काय आहे?’ सरांनी आपणास भेटण्यास सांगितल्याचे सांगताच, काल कुणीच कसं शाळेत आले नाही म्हणून विचारले. आम्ही ठरल्याप्रमाणे ‘रांजीला पूर होता म्हणून येता आले नाही’ असे उत्तर दिले. त्यावर सरांनी दुस-या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दाखला देऊन बरेच सुनावले. सर्वाची चांगलीच हजेरी घेतली आणि प्रत्येकाने आपल्या पालकांना घेऊन यानंतरच वर्गात बसण्यास फर्मावले.
सर्व जण शाळेबाहेर पडलो. काय करावे तेच कळत नव्हते. मी आणि माझा मित्र सुनील कुबल दोघे एस.टी.साठी बस स्टँडकडे निघालो. माझ्या छातीची धडधड पुढील चित्र डोळ्यांसमोर दिसत असल्याने वाढत होती, पण सुनील शांत होता, कारण त्याची आई कधी त्याला मारत नसे, पण माझी पाठ लाल होणार हे मला माहीत होते. आमच्या समोरून सुनीलचे दोन शेजारी मनू आणि शंभू धुरत येत होते. त्यांनी आमचा अवतार व उलटमार्गी येत असलेले पाहून प्रश्न केला, ‘काय रे, फिरताय खयं, शाळा नाय?’ आम्ही त्यांना सर्व प्रकार सांगितला व सुनीलने त्यांना आमचे भाऊ म्हणून खोतसरांना भेटण्याची विनंती केली. त्यांनी ते मानलं नाहीच, उलट म्हणाले, ‘शाळा चुकवन बाजार फिरतास, जावा आता आपापल्या औशींका घेवत शाळेत.’ सुनीलचे बाबा मुंबईत तर माझे वडील हयात नसल्याने आमच्या दोघांच्याही आईलाच शाळेत यावे लागणार होते, म्हणून आम्ही धुरत बंधूंच्या पाया पडलो, विनवण्या केल्या तेव्हा ते खोतसरांना भेटण्यास तयार झाले. सर्वप्रथम आमचे दोघांचे भाऊ (गावभाऊ) शाळेत आले आणि कसे तरी त्या प्रसंगातून सुटलो.
सायंकाळी घरी आल्यावर मी भीत-भीतच सर्व घटना आईला सांगितली व मार खाण्याची मनाची तयारी केली. आईने मोठ्ठे डोळे करून माझ्याकडे रागाने पाहताच मी रडू लागलो. तिने मला जवळ घेतले आणि म्हणाली, ‘असे कुणी सांगितले म्हणून चुकीची, मनाला न पटणारी गोष्ट आपण कुणाला घाबरून करता कामा नये, हे यापुढे लक्षात ठेव. तू मला ही गोष्ट परवाच सांगायला हवी होतीस, आईशी खोटं बोलण्याची चूक केलीस, जा आता देवाला नमस्कार कर आणि त्यांची माफी माग, पुन्हा असं कधी वागणार नाही सांग.’
आज इतक्या वर्षानंतरही हे सगळे प्रसंग मला काल-परवा घडल्यासारखे लख्ख आठवतात. मन बालपणीच्या अतिरम्य काळात हरवून जाते. तेव्हाचे शिक्षक प्रेमळ, मुलांच्या मनाचा विचार करणारे होते, म्हणूनच प्रसंगी चोप देत, पण पालक कधी त्यांना विचारत नसत. शिक्षकांवर त्यांचा विश्वास होता. मुलांना शिक्षकांबद्दल आदर होता, शिक्षणाचा बाजार झाला नव्हता. विद्यार्थीदशेत केलेल्या चुका वेळीच लक्षात आणून दिल्याने तशा चुका पुढील आयुष्यात झाल्या नाहीत. जीवनात शिस्त आली. आमच्या मतांना तेव्हा शिक्षकांनी न टाळल्याने, आम्हीही आमच्या मुलांची मते विचारात घेतो. ती दुर्लक्षित करीत नाही, त्यामुळे मुलांशी सुसंवाद राहतो. शालेय जीवनात मिळालेली ही संस्कार शिदोरी आयुष्यभर पुरणारी ठरली आहे.

कोकणात आजपासून शिमगोत्सवाला प्रारंभ

कोकणात आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात होणार असून, पारंपरिक पद्धतीने सर्वच ठिकाणी होळीचे पूजन केले जाणार आहे. 
HOLIगुहागर- कोकणात आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात होणार असून, पारंपरिक पद्धतीने सर्वच ठिकाणी होळीचे पूजन केले जाणार आहे. सर्वसामान्यांचा आवडता सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते.
सुमारे १५ दिवस चालणा-या या सणात होळी, रंगपंचमी आदी विविध उत्सव साजरे केले जाणार आहेत. येथील विविध गावांमध्ये होळीच्या पहिल्या दिवशी शेवराचे झाड तोडून त्याची होळी उभी केली जाते.
या होळीची पुढील ८ दिवस पूजा, आरती करून पौर्णिमेला पेटवण्यात येते. या उत्सवात होळी पेटवण्यासाठी लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाचा उत्साह दांडगा असतो. आपापसातील भांडण – तंटे मिटवून या सणात ग्रामस्थ एकत्र येत असतात.
होळी पेटवत असताना मारण्यात येणा-या बोंबा किंवा फाका यांच्यामध्ये वैविध्य असते. या उत्सवात विविध गावांमधील खेळे हे देखील प्रमुख आकर्षण असते. या खेळयासोबत गावागावातील फिरणारा संकासूर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वाचे मनोरंजन करतो.
या कालावधीतच उन्हाचा तडाखा वाढत असताना देखील प्रथा, परंपरा जपण्यासाठी गावागावातील खेळे अनवाणी पायाने फिरत असतात. होमात नवीन जोडप्यांनी नारळ टाकून पुढील संसारासाठी आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे.
शिमगोत्सवातील पुढचा टप्पा म्हणजे सहाण भरण्याचा कार्यक्रम. गावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सहाणेवर आणल्या जातात. तेथे ग्रामस्थ त्या देवतांचे दर्शन घेतात. दन, लाट फिरवणे आदी विविध परंपरा यावेळी राबवल्या जातात.

महिलांनी फुलवला ‘सूर्यफुलां’चा मळा

पूर्वीच्या ‘चूल आणि मूल’ या परंपरेला बगल देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करणा-या लांजा तालुक्यातील कोचरी येथील होलदेव महिला बचत गटाने दीड एकर माळरानावर सूर्यफुलाचा मळा फुलवला आहे.
Sunflowerलांजा – पूर्वीच्या ‘चूल आणि मूल’ या परंपरेला बगल देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करणा-या लांजा तालुक्यातील कोचरी येथील होलदेव महिला बचत गटाने दीड एकर माळरानावर सूर्यफुलाचा मळा फुलवला आहे. जिद्द, परिश्रम आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची ईर्षा या त्रिसुत्रीच्या जोरावर या बचत गटाने फुलवलेला सूर्यफुलाचा मळा जणू त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो.
सद्य:स्थितीत बेरोजगारीची समस्या असताना तरुणवर्ग मात्र शेतीपासून दूर जात आहे. शेतीतूनच विविध प्रकारची उत्पादने घेऊन त्याद्वारे अर्थार्जन उपलब्ध करण्याची मानसिकता त्यांची नाही. असे असताना आपण महिला आहोत, आपण काय करणार, अशी निराशा न दाखवता शेती हाच
अर्थव्यवस्थेचा कणा असून, या शेतीतूनच आपण आपला आर्थिक विकासाचा मार्ग साध्य करू शकतो, अशी खूणगाठ मनाशी बांधून लांजा तालुक्यातील कोचरी येथील होलदेव महिला बचत गटाने शेतीतूनच आपल्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.
होलदेव महिला बचत गटाने यापूर्वी हंगामी पिके यामध्ये भाजीपाला लागवडीसारखा प्रयोग करताना त्याद्वारे स्वत:ला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने काहीतरी वेगळे उत्पादन घेण्याचा निर्णय या बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता पांचाळ व सर्व पदाधिकारी,सदस्यांनी घेतला होता. यातून ब-यापैकी आर्थिक उत्पन्न मिळवून देणा-या सूर्यफुलाची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याचे उत्पन्न कसे घ्यावे, बियाणे कोठून आणावे असे प्रश्न होतेच. यावेळी त्यांना कोचरीचे सरपंच चंद्रकांत पांचाळ यांनी मदत केली. कृषी विभागानेही यासाठी सूर्यफुलाची २ किलोची बियाणी पांचाळ यांना उपलब्ध करून दिली.
बियाणी उपलब्ध झाल्यानंतर बचत गटाच्या सर्व महिलांनी येथील दीड एकराच्या माळरानावर कष्टाने सूर्यफुलाचा मळा फुलवला आहे. यासाठी नजीकच्या शेततळय़ातून पाणीपंपाद्वारे या पिकाला पाणीपुरवठा केला जातो. तर येणा-या समस्यांबाबत त्यांना कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. या मळ्यात सध्या अडीच महिन्यांची सूर्यफुले डोलू लागली आहेत. जणू या महिलांनी घेतलेल्या परिश्रमाची ही फुले साक्ष देत आहेत.ं

चाहूल चैत्राची..

ऋतुचक्र नेहमीच प्रभावी आणि आकर्षित करणारे असते. फाल्गुन मास संपण्यापूर्वीच चैत्राची चाहूल लागते. गुढीपाडव्याला चैत्र नक्षत्र सुरू होईल.

hirvalकणकवली- ऋतुचक्र नेहमीच प्रभावी आणि आकर्षित करणारे असते. फाल्गुन मास संपण्यापूर्वीच चैत्राची चाहूल लागते.
गुढीपाडव्याला चैत्र नक्षत्र सुरू होईल. मात्र त्याच्या पाऊलखुणा आजपासून जाणवू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी संपूर्ण पाने गळून निष्पर्ण झालेले वृक्ष नव्या दिमाखात जणू नवा आविर्भाव, नवा पोषाख करून उभे राहिले.
गगनाशी स्पर्धा करणा-या उंच वृक्षांच्या माथ्यावर जणू नवा भरजरी मुकुट परिधान करावा असे जुनाट वृक्ष दिसू लागले.. पोपटी, हिरव्या आणि तांबडय़ा, गुलाबी रंगांची छटा असलेली पालवी फुटू लागली आहे. वाढत्या उन्हाबरोबरच आणि वातावरणातील उष्म्याबरोबरच ही पर्णसंपत्ती वाढू लागली आहे.
निसर्ग हा नव्या कलेने आणि नव्या ढंगाने विविध रंगांची उधळण करत असतो. मृगनक्षत्राला दिसणारे निसर्गाचे रूप वेगळे असते. ग्रीष्मातील निसर्ग वेगळा असतो. ऋतुचक्राच्या या फे-यात चैत्रातील निसर्ग पाहण्याजोगा असतो. फाल्गुन मासात पानगळतीच्या वृक्षांनी जणू आपली वल्करे भूमीवर ठेवून नि:शस्त्र झाल्यासारखा भास होतो.
मात्र हेच वृक्ष त्यानंतर आठ-पंधरा दिवसांतच नवी पालवी धारण करतात. ग्रीष्म ऋतूत आपल्या छायेखाली अनेक जीवांना शीतलता देण्यासाठी जणू ते सज्ज होतात.  या वृक्षांपैकी ‘कोसब’ हा वृक्ष गेल्या आठ दिवसांपासून तांबडय़ा, भगव्या रंगांची पालवी परिधान करू लागला आहे.
संपूर्ण वृक्षावर एकाच वेळी आलेली ही पालवी पाहिल्यानंतर जणू लाल रंगाचा पुष्पबहार वृक्षावर झाला आहे, असे वाटते. कधीही फूल न येणारा कोसब कदाचित कोवळय़ा गुलाबी आणि दाट तांबडय़ा रंगाच्या पालवीनेच स्वत:ला समाधानी मानत असावा. कोसबाप्रमाणेच ‘हेळा’ वृक्षही चैत्राच्या सुरुवातीलाच बहरू लागतो.
उंच आकाशाकडे वाढलेल्या, खोड पांढ-या रंगाचे असलेल्या हेळय़ाला पूर्ण पानगळती असते. पाने गळल्यानंतर निर्जीव वाटणारा हा वृक्ष चैत्राची चाहूल लागताच बहरू लागतो. उंच गेलेल्या फांद्यांच्या शेंडय़ावर पालवी फुटते. ही पालवी जणू राजमुकुटाप्रमाणे भासू लागते. ‘तुरा खोविला कस्तुरी मंजिरीचा’ अशीच जाणीव या वृक्षाकडे पाहिल्यानंतर होते.
चैत्रातल्या या पालवीने नवीन उमेद निर्माण होते. नवा जगण्याचा अर्थ हा ऋतू प्राप्त करून देतो. एक आशा आणि सर्व संपल्यानंतर पुन्हा एकदा पूर्वी इतकेच होते ते वैभव निर्माण करण्याची असलेली ऊर्मी हा ऋतू बहाल करतो. नवा साज आणि नवी आशा हा ऋतू निर्माण करतो.
गमावलेला सर्व आनंद पुन्हा मिळविण्याचा आत्मविश्वास या ऋतूकडून मिळतो. प्रत्येक जीवाला हा ऋतू आनंद देतो. याच पालवीत कीटक आणि वेगवेगळे जीव आपली वाटचाल सुरू करतात. या चैतन्यमयी ऋतूचे आगमन निसर्गालाही हवेसे वाटू लागले आहे.

आंबोल- महाबळेश्वर हे पर्यटकांच्या पसंतीचे थंड हवेचे ठिकाण सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. त्याउलट संधुदुर्ग जिल्ह्याचे निसर्गरम्य पर्यटन स्थळ आंबोली हे उपेक्षितच राहिले आहे. निसर्गाने भरभरून देऊनही प्रशासनाच्या नियोजनशून्य भूमिकेमुळे तसेच लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच आंबोलीचे पर्यटन धोक्यात आले आहे.
दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक आंबोलीला भेट देतात. जंगल सफरी, पक्षी निरीक्षण, साहसी खेळ यासाठी आंबोलीची निवड केली जाते. मात्र, कायदेशीररित्या साहसी खेळांसाठीचे परवाने येथे उपलब्ध होत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो.
एखादे दुसरे हॉटेल वगळता पर्यटकांना पुरेशा सुविधा प्राप्त नसल्याने अलीकडे पर्यटक आंबोलीत न थांबता गोव्यासारख्या राज्याकडे जाणेच पसंत करतात. यामुळे आंबोलीचे पर्यटन आगामी काळात धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेली दोन वर्षे येथील बस स्थानकात साधा रस्ताही नाही. विशेष म्हणजे आंबोलीसारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी शौचालयाची व्यवस्था नसल्याने पर्यटक या ठिकाणी थांबण्यास टाळतात. पर्यटनस्थळांवरील रस्त्यांचे कामही निकृष्ट झाले आहे. पथदीपांचीही दुरवस्थाच आहे. त्यामुळे पर्यटक आंबोलीत न थांबणेच पसंत करतात.
सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर असलेल्या आंबोली पर्यटनस्थळाच्या विकासासाठी पर्यटन विकास आराखडा करणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यटनतज्ज्ञांबरोबरच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. याबाबत मलबार नेचर कॉन्झव्‍‌र्हेशन क्लबचे अध्यक्ष काका भिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आंबोलीच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक असणा-या अनेक गोष्टींचा उलगडा केला.
मुळात आंबोली पर्यटनस्थळाचा प्रारूप आराखडा तयार करून त्याप्रमाणे पर्यटनस्थळांचा विकास के ल्यास ख-या अर्थाने पर्यटनवृद्धी होऊ शकेल. आंबोली हे पुणे, मुंबई, कोल्हापूर, बेंगलोर अशा भागातून गोव्याकडे जाणा-या पर्यटकांसाठीचे तसेच पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटन सिंधुदुर्गाच्या पर्यटनस्थळांची माहिती देणारे माहिती केंद्र उभारल्यास पर्यटकांसाठी मोठी सोय होऊ शकेल.
यातून काही जणांना रोजगारही उपलब्ध होईल. सिंधुदुर्गातून थेट गोव्यात जाणारे पर्यटक सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांकडे वळतील. आंबोलीतील पर्यटनस्थळांचीही माहिती झाल्याने आंबोली पर्यटनासही मदत होईल. माहिती केंद्राबरोबरच टुरिस्ट गाईडची संकल्पना राबविल्यास पर्यटनवृद्धीबरोबरच त्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होऊ शकेल.
या माहिती केंद्रातून जिल्हयातील पर्यटनस्थळांच्या माहितीबरोबरच येथील कला, संस्कृती, जैवविविधता, खाद्य संस्कृती, येथील जनजीवन याची सचित्र माहिती उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हयातील मनमोहक, निसर्गरम्य पर्यटनस्थळांची, धार्मिक स्थळांची छायाचित्रे उपलब्ध करणेही गरजेचे आहे.
जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्रातील व्यक्तींचे, हॉटेल व्यावसायिकांचे फोन नंबर्स व त्यांची संपूर्ण माहिती आंबोलीतच उपलब्ध झाल्यास पर्यटकांना फार मोठी मदत मिळू शकेल व गोव्यासारख्या परराज्यात जाणारे पर्यटक जिल्ह्यातच थांबल्याने जिल्ह्याच्या पर्यटनवृद्धीस फार मोठी मदत होऊ शकेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

चोहोबाजूंनी प्रतिकूल अवस्थेने घेरलेले असतानाही त्या परिस्थितीवर आकांताने मात करून जगण्याची, प्राण्याची जी दुर्दम्य इच्छा असते तिला ‘जीजिविषुवृत्ती’असे म्हणतात. अशाही अवस्थेत अशा मगरमिठीत, देहाचा चोळामोळा झालेल्या त्या झाडाला, साधा श्वास घेणेही अवघड होऊन जाते. तरीही ते झाड तो जीवघेणा अन्याय आणि आक्रमण मुकेपणाने सहन करीत राहते.
OLYMPUS DIGITAL CAMERAउन्हाच्या वणव्यात स्वत:चे अंग पोळत असतानाही, आश्रयाला आलेल्या पशु-पक्ष्यांना, गुरा-वासरांना आणि माणसांना सुखाची सावली देणा-या वृक्षांना आमच्या संस्कृत कवींनी सत्पुरुष म्हटले आहे.
वृक्षांचे हे जगणे केवळ परोपकारासाठीच असते. आमच्या कोकणी माणसाच्या वाटय़ाला हे वृक्षवैभव जेवढे आलेले आहे, तेवढे इतर भागातील माणसांच्या वाटय़ाला ते क्वचितच आले असेल. विविध जातींच्या आणि आकारांच्या वृक्षांचे कृपाछत्र आमच्या कोकणवर अनादिकाळापासून रंगवली धरून आहे.
कोकणातील अवघ्या वृक्षराजींत अग्रक्रमाने नाव घेतले जाते, ते आंब्या-फणसांचे. त्यातील आंब्याचे झाड आणि फळ सगळय़ा जगाच्या परिचयाचे. आंब्याच्या फळाला फळांचे राजेपण लाभलेले आहे. फणसाच्या वाटय़ाला एवढे मोठेपण मिळाले नसले तरी, त्यांच्यामधील ग-यांचा गोडवा मात्र सर्वाना हवाहवासा वाटतो.
झाडापेडांना भावभावना असतात; सुख-दु:खाच्या जाणिवा असतात, हे शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सिद्ध केलेले आहे. आमचा साधासा कोकणी शेतकरी त्यांच्याही पुढे आहे. येथील वृक्षराजींपैकी बहुतेकांचे स्वभावही त्याला माहीत आहेत.
फणसाचे हळवेपण त्यानेच शोधून काढले आहे. त्याच्यामते फणसाचे झाड साध्या, सरळ आणि अत्यंत हळव्या स्वभावाचे आहे. त्याला भरल्या घरातील, एकमेकांवर प्रेम करणा-या मुलांमाणसांच्या कुटुंबाचा सहवास हवाहवासा वाटतो. अशा घराशेजारच्या परसातील फणस इतरांच्या मानाने लवकर फुला-फळांच्या बहराला येतो.
अंगणाशेजारच्या फणसाच्या झाडाच्या मुळाशी तयार केलेल्या शेणाने सारविलेल्या दगडमातीच्या गोलाकार ओटय़ावर बसून सायंकाळच्या वेळी आपल्या माणसांसोबत गप्पागोष्टी करणे किती सुखकारक असते, हे कोकणी माणसाला पुरेपूर ठाऊक असते. अशावेळी ते झाडही त्यांच्या गप्पागोष्टीत आणि सुख दु:खातही सामील झाल्यासारखे दिसते.
अशा वृक्षवल्लींचे सोईरेपण लाभलेला आमचा कोकणी माणूस, त्यामुळेच की काय, अन्नवस्त्रांची कमतरता असली तरीही आनंदी आणि सुखी दिसतो. तो माणूस हे सगळे तेथील निसर्गाकडून विशेषत: झाडांपेडांकडून आणि त्यातही विशेष अशा सरळ हळव्या स्वभावाच्या कुटुंबवत्सल अशा फणसाच्या झाडाकडून शिकला असावा. अशा या लोभस वृक्षाचे आणि त्याच्या गोड फळाचे वर्णन जुन्या मराठी पंडित कवींनी भरभरून केले आहे. ख्यातनाम कवयित्री इंदिरा संत यांनी फणसाच्या झाडाला, ‘कटिखांद्यावर लेवुनी बाळे’ असा उभारलेला कुटुंबवत्सल लेकुरवाळा म्हटले आहे!
अवघ्या कोकणाशी फणसाचे जन्मजन्मांतरीचे नाते आहे. तो येथील मुलांमाणसांशी, गुरांढोरांशी, पशु-पक्ष्यांशी कौटुंबिक नाते जोडून राहिला आहे. माणसांची ‘जाग’ असलेल्या घरांशेजारी, भरल्या ‘आवाठात’ तो अधिक सुखी आणि तृप्त दिसतो.

Move to Inbox
 
More
 
16 of 3,121
 

(no subject)

शेती करणारी किंवा कृषी व्यवसायाशी संबंधित असणारी अनेक कुटुंबे किंवा ग्रामीण भागात राहणा-या लोकांना वर्षातून त्यांच्या नेहमीच्या कामातून फुरसतीचा वेळ मिळतो.
toplyaशेती करणारी किंवा कृषी व्यवसायाशी संबंधित असणारी अनेक कुटुंबे किंवा ग्रामीण भागात राहणा-या लोकांना वर्षातून त्यांच्या नेहमीच्या कामातून फुरसतीचा वेळ मिळतो. त्यावेळी ते एखादा हस्तकला व्यवसाय करू शकतात.
पावसाची वाट पाहण्याच्या किंवा पीक तयार होण्याच्या काळात ते आपल्या जमिनीतून मिळणा-या गोष्टींपासून कोणतीही वस्तू तयार करण्याकडे सहज वळतात. अशा हंगामी आदिवासी कारागिरांमध्ये सर्वात उल्लेखनीय कारागीर म्हणजे वेताच्या व बांबूच्या टोपल्या आणि तट्टे विणणारे लोक.
पूर्वी बांबूपासून बनविण्यात येणा-या वस्तूंना अधिक मागणी होती. काही वर्षापूर्वी या वस्तूंचा मोठय़ा प्रमाणात घरगुती वापर होत असे. मात्र, आता रेडीमेडच्या जमान्यातही बांबूपासून हारे, टोपल्या, तट्टे, खुराडे, कणगी वस्तू बनवून देणा-या उंब्रज येथील सुधीर माने व जयसिंग जाधव यांचे कुटुंबीय चिपळुणात गेली २० वर्षे बांबूच्या सहाय्याने बुरूडकाम करत आहेत.  टोपल्या, रोवली, सूप, करंडा आदी वस्तूंचे विणकाम त्या करत त्यांनी या व्यवसायातून आपल्या संसाराला हातभार लावला आहे.
सातारा तालुक्यातील उंब्रज येथे सुधीर माने व जयसिंग जाधव यांचे मूळ गाव. हा व्यवसाय पारंपरिक असल्याने लहानपणापासूनच बांबूपासून विविध वस्तू बनविणे हा त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा व्यवसाय. अंकुश माने (उंब्रज), पत्नी शोभा माने, जयसिंग जाधव (कराड-मलकापूर), राजू जाधव (उंब्रज-शिवडी) यांनी एकत्रित येऊन चिपळुणातील शिवनदी येथे हा व्यवसाय सुरू केला.
गावोगावी फिरून या वस्तूंची विक्री करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, सध्या या वस्तूंची जागा स्टेनलेस स्टील, प्लास्टिक पिंप यांनी घेतली असल्याने बांबूपासून बनविण्यात येणा-या वस्तूंची मागणी घटली आहे.
पूर्वी आंबे बाहेरगावी पाठविण्यासाठी टोपल्यांचा वापर होत असे. मात्र सध्या किमती लाकडाची खोकी वापरली जातात. बांबूपासून टोपल्या, सूप, डाले, कोंबडय़ाचे खुराडे, तट्टे आदी वस्तूंची निर्मिती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
टोपल्या ३० रुपये, तट्टे ४०० रुपये, हारे ७० रुपये व खुराडे ४० रुपयांना विकले जात आहे. तर दुसरीकडे प्लास्टिक टिनाची पर्यायी उत्पादने बाजारात आल्यामुळे त्यांच्या उत्पादनांची मागणी घटली असल्याचे ते सांगतात. त्यामुळे बुरूड समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सोनार, कुंभार, नाभिक अशा समाजांप्रमाणेच बुरूड हा आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतलेला आहे.
परिपक्व ओलसर बांबूपासून घरी टोपल्या, हारे, तट्टे, सूप आदी वस्तूंची निर्मिती करून त्यांना आठवडा बाजारात नेऊन विकणे हा यांचा व्यवसाय आहे. याच व्यवसायाच्या जीवावर हा समाज कशीबशी गुजराण करीत आहे. शासनाने या बुरूड समाजाकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे ही बिकट परिस्थिती दरवर्षी उद्भवत आहे. सध्या बांबूचे दरही दुपटीने वाढले आहेत.
८.३५ रुपयांना मिळणारा कमी प्रतिचा बांबू १६.८० रुपये, ९ रुपयांना मिळणारा बांबू १८ रुपये तर ११ रुपयांना मिळणारा बांबू २० रुपये किमतीत मिळत आहे. त्यामुळे बुरूड समाजाला आपल्या उत्पादित वस्तूंचे दर वाढवावे लागत आहेत. पण वाढीव किमतीत ग्राहक त्यांच्या वस्तू खरेदी करीत नाहीत. ग्राहकांची नाराजी असल्याने त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.
दुसरीकडे फायबर, प्लास्टिक, टीन, मेटलच्या सूप, टोपल्या बाजारात आल्या आहेत. या वस्तूंकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. या वस्तू बांबूपासून निर्मित वस्तूंपेक्षा स्वस्त दरात विकल्या जात असल्याने बुरूड समाजाच्या उत्पादनाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. एक कुशल कारागीर असेल तर चार सुपे व एक रोवळी होते.
बांबूच्या अनेक जाती आहेत. यामध्ये कळक, कोंडा, बांबू, मेस, वेत या जातीच्या बांबूचा उपयोग केला जातो. मात्र, सर्वसाधारण कापशी बांबूचा उपयोग अनेक ठिकाणी केला जात असल्याची माहिती श्री. माने त्यांनी यावेळी सांगितली. या वस्तू विकून मिळणा-या पैशातून बचत केली जाते व शेवटी रक्कम वाटून घेतली जाते.
फावल्या वेळेत बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचा व्यवसाय करून संसाराला हातभार लावणारे हे कुटुंब दर महिना दोन हजार रुपयांपर्यंत कमाई करतात. परंतु प्लास्टिकचा वापर वाढल्याने या व्यवसायाला फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्लास्टिक वस्तूंचा वाढता वापर, बांबू मिळण्यातील अडचणींमुळे बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय करणारा बुरूड समाज अनेक समस्यांना तोंड देत आहे.
समाजातील तरुण मंडप व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायांकडे वळले आहेत. या समाजाच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढण्याबरोबरच समाजाचा आर्थिक व शैक्षणिक विकास व्हावा, यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य बुरूड समाज ही संस्था काम करत असली तरीही ग्रामीण भागातील हा समाज विकासापासून वंचित राहिलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र हा समाज विखुरलेला आहे. समाजाचा बांबूपासून वस्तू बनविण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. मात्र, सध्या प्लास्टिकच्या वस्तू वापरण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना धान्य साठविण्याच्या कणग्या, त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या बळद या वस्तू बुरूड तयार करून देत असत.
या वस्तू आता पाहावयासही मिळत नाहीत. शेतकरी आता धातूचे हौद त्यासाठी वापरतात. महिला धान्य पाखडण्याचे सूपही आता प्लास्टिकचे खरेदी करतात. मात्र, ग्रामीण भागात कोंबडय़ांची खुराडी बुरडाने तयार केलेलीच वापरली जात आहेत.
याशिवाय टोमॅटोसाठी लागणा-या करंडय़ांना ब-यापैकी मागणी असते. मात्र, बांबू लागवड ग्रामीण भागात फारशी कोणी आवर्जून करत नाही. त्यामुळे बांबू मिळविण्यासाठी बुरूड समाजातील नागरिकांना शोधाशोध करावी लागत आहे.
अगदी कोकणातून बांबू आणावे लागतात. ज्यांच्याकडे बांबू आहेत, अशा शेतकऱ्यांना बांबूचे आगाऊ पैसे द्यावे लागतात. तसेच जादा पैशांचीही मागणी होते. मात्र, त्या प्रमाणात तयार केलेल्या वस्तूला दर देताना ग्राहक नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे दिवसेंदिवस हा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.
४० टक्के हा समाज पारंपरिक व्यवसाय करीत आहेत तर ६० टक्के इतर क्षेत्रांत कार्यरत असून त्यातील काही बांबूशी निगडित इतर व्यवसाय करीत आहेत. अनेक युवकांनी शिडय़ांसारख्या वस्तू तयार करून देण्याबरोबरच मंडप व्यवसायात तसेच बांधकामासाठी बांबू आणि तत्सम लाकडे पुरविण्याच्या व्यवसायावर भर दिला आहे. समाजातील अनेक मुले आता उच्चशिक्षण घेत आहेत. मात्र, यांची मुले शिक्षणापासून अजूनही वंचित आहेत.
याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. विवाह कार्यात मुलीकडून वर पक्षास रुखवत दिला जातो. त्यामध्ये द्यायची सूप-दुरडी बुरडाने तयार केलेली वापरली जाते. अगदी झोपडीत राहणा-यापासून ते बंगल्यातील उच्चभ्रू व्यक्तीही या सूप दुरडय़ाच खरेदी करतात.
कोणीही प्लास्टिकची खरेदी करत नाही. तसेच विवाह कार्यात देवक पूजतानाही बांबूपासून तयार केलेल्या सुपातच देवक पूजतात. त्यामुळे बुरुडांनी बनविलेल्या या वस्तूंना किती मागणी आहे, असे यावरून दिसून येते.
शासकीय सवलतीमध्ये बुरूड समाजाला बांबू उपलब्ध करून द्यावेत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये बांबू कला प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, मागासवर्गीयांसाठीच्या मोफत घरकुल योजनेमध्ये बुरूड समाजाला प्राधान्यक्रम द्यावा, समाजातील व्यावसायिकांना बीज भांडवल सवलतीच्या व्याज दरात द्यावे, बांबूू मजुरांना अर्थसहाय्य द्यावे, अशा मागण्याही या समाजातून होत आहेत.
बांबूपासून विविध वस्तू बनविणा-या कारागिरांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. ते आजही उपेक्षित जीवन जगत आहेत. या मजुरांना त्यांचा न्यायहक्क मिळवून देण्यासाठी भारतीय बांबू मजदूर संघटनेची स्थापना करण्यात आली. संपूर्ण भारतभर या संघटनेचे काम सुरू आहे.
सध्या कोकणातील बांबू व्यवसाय करणा-या मजुरांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. कोकणातील मागासवर्गीयांबरोबरच मातंग, बुरूड, कैकाडी, कोटाळी, कांडी अशा जमाती व आदिवासी हे काम  करीत आहेत. केवळ वडिलोपार्जित कला नष्ट होऊ नये म्हणून या समाजाच्या लोकांनी हे कौशल्यपूर्ण काम अद्याप सुरू ठेवले आहे.
मात्र, आता प्लास्टिकच्या अतिरेकी वापरामुळे त्यांना हे काम सुरू ठेवणे अवघड जात आहे. त्यामुळे बुरूड कामाचे मोलच हरवत असून मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. बुरूड हा समाज आजही शैक्षणिक प्रवाहापासून दूर आहे.
या समाजात निरक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. समाजातील शिकलेले युवकही बेरोजगार असल्याने त्यांना नाइलाजाने पारंपरिक व्यवसायातच अडकावे लागते. या समाजाच्या विकासासाठी शासनाने महामंडळाची निर्मिती करावी, अशी मागणी बुरूड समाजातून होत आहे.
या माध्यमातून समाजातील तरुणांना बांबूपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण मिळावे, त्या वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, सुशिक्षित युवकांना कर्ज देण्यात यावे अशा मागण्या बुरूड समाज अनेक वर्षापासून करीत आहे. लहरी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला असताना त्याची झळ आता शेती व्यवसायाशी संबंधित असलेल्या बुरूड व्यवसायालाही बसत आहे.
परंतु गेल्या काही वर्षापासून लहरी पावसाचा फटका शेतीला बसत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. साहजिकच त्याचा परिणाम या व्यवसायावरही झाला आहे. याशिवाय काही शेतकरी धान्य साठविण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या बांबूच्या टोपल्या व कणगी धान्याच्या बदल्यात घेतात. हा व्यवसाय पिढीजात आहे.
टोपलीच्या बदल्यात भात देणे असा व्यवहार पूर्वी चालत असे. बांबूपासून शेतीपयोगी वस्तू बनविणा-या बुरूड समाजाला ग्रामीण समाजव्यवस्थेत मानाचे स्थान होते. मात्र बदलत्या काळाबरोबर व्यवहारांचे स्वरूपही बदलले. त्यामुळे बुरुडांनी बनविलेल्या वस्तूंची मागणी आपोआप घटत आहे.


Shantaram Kale <kaleshantaramlaxman@gmail.com>

Apr 17 (1 day ago)


to shantaram, shantaram

‘शिक्षण हक्क अधिकार कायद्या’नुसार वस्तीशाळांतील निम शिक्षकांना प्रशिक्षित होण्यासाठी दिलेली मुदत ३१ मार्च रोजी संपली असल्याने या शेकडो शिक्षकांच्या सेवा धोक्यात आल्या होत्या, मात्र यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी अखेरची संधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय गुरुवारी घेतला आहे.
यामुळे राज्यातील आदिवासी आणि डोंगरद-यांतील शाळांत विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणा-या शेकडो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी या शिक्षकांच्या सेवा अडचणीत आल्याची बाब शिक्षणमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील वस्तीशाळांत शिक्षकांचे काम करणा-या निम शिक्षकांचे शिक्षण किमान दहावीपर्यंतचे असल्याने त्यांना शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार पदवी आणि इतर शिक्षण व शिक्षकांसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. राज्यात शिक्षण हक्क अधिकार कायदा लागू झाल्यानंतर मागील दोन वर्षापासून राज्यातील असंख्य वस्तीशाळा विद्यार्थ्यांच्या लावण्यात आलेल्या निकषांमुळे बंद
पडल्या आहेत.
यातील शिक्षकांचे इतर शाळांत समायोजन करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे, मात्र या वस्तीशाळांतील शिक्षकांचे समायोजन केल्यानंतर त्यांना शिक्षण विभागाने आखून दिलेला प्रशिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी अखेरची मुदत ३१ मार्चपर्यंत देण्यात आली होती, मात्र शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तब्बल १ हजारहून अधिक शिक्षकांचे प्रशिक्षणच पूर्ण न झाल्याने त्यांच्या सेवा अडचणी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी आजपर्यंत पाठपुरावा करणारे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी बुधवारी शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी मुदत वाढ दिली नाही तर त्यांच्या सेवा संपुष्टात येतील आणि शेकडो शिक्षकांवर बेरोजगारी येईल, ही बाब निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी तातडीने याविषयी आदेश काढण्याची सूचना शिक्षण विभागाला दिली आहे. यात निम शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कालावधी २०१७ पर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचे परिपत्रक लवकरच काढले जाणार असल्याने शेकडो शिक्षकांना दिला

अवेळी होणा-या पावसामुळे वीट व्यावसायिक चिंतातूर बनले आहेत. हा व्यवसाय अवेळी पावसामुळे धोक्यात आला असून, वनविभाग, महसूल विभाग, गौण खनिज बंदी अशा बाबींना वेळोवेळी तोंड द्यावे लागते.
सांस्कृतिक ठेवा असलेला हा वीट व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी वित्तीय संस्थांबरोबरच सहकाराचीही आवश्यकता आहे. आज मोठय़ा प्रमाणात स्त्रियांचे बचतगट कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘पुरुष बचतगट’ स्थापन होऊन त्या माध्यमातून कमी व्याजदराने मिळणारे सरकारी कर्ज उपलब्ध होऊ शकते.
याद्वारे बचतगटांमुळे सहकारही वाढू शकतो. असे झाल्यास वीट व्यवसाय नक्कीच उभारी घेऊ शकेल आणि त्यानंतरच ख-या अर्थाने ‘विठ्ठलाचे पायी वीट झाली भाग्यवंत’ असे म्हणताना वीट व्यावसायिक निश्चितच सुखावतील.

‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ या उक्तीप्रमाणेच परमेश्वर अठ्ठावीस युगे विठ्ठलाच्या रूपाने ज्या विटेवर उभा आहे ती वीट नक्की कशी व कुठे बनते याबाबत सर्वामध्ये कुतूहल असते. कुंभार कलेशी निगडित असलेला हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने उभारी घेऊ शकतो.
मात्र, या व्यवसायाला गरज आहे ती सहकाराची. सुरुवातीला खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने कर्जरूपाने ५० टक्के अनुदान स्वरूपात या व्यवसायासाठी वित्तपुरवठा केला जायचा. पण सद्यस्थितीत तो होत नसल्याने शासनाकडून अनुदानप्राप्त वित्तीय मदत मिळाली तरच नुकसानीत असलेला हा व्यवसाय भविष्यात तग धरू शकेल आणि त्यानंतरच ख-या अर्थाने ‘विठ्ठलाचे पायी वीट झाली भाग्यवंत’ असे म्हणताना वीट व्यावसायिक निश्चितच सुखावतील.
सावंतवाडीतील मळगाव परिसरात वीट व्यवसायास आवश्यक असणारी कुंभारी माती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे पावसाळा हंगामाची शेती उरकल्यावर वीट व्यवसायासाठी सुरुवातीला योग्य जागेची निवड करून या जमिनीची साफसफाई केली जाते.  यानंतर जमिनीचा वरचा थर काढून बाजूला केला जातो. याला ‘बेन’ काढणे म्हणतात. यानंतर योग्य माती प्राप्त झाल्यावर कामगारांकरवी ती एकत्रित केली जाते. त्यानंतर मातीत पाणी मिसळून मातीचा गारा केला जातो.
माती योग्य प्रमाणात कुजल्यावर कुंभार वीट मारण्याचे म्हणजे साच्यातून वीट काढण्याचे काम करतात. यासाठी लाकडी साचा वापरला जातो. एकावेळी एकच वीट याद्वारे निघते. यासाठी वाळूचाही वापर केला जातो. आठ ते दहा दिवस वाळल्यावर वीटा भट्टीसाठी तयार होतात.
वीटभट्टी रचणे हे देखील एक कसब आहे. प्रत्येक थरात व थरातील प्रत्येक ओळीत हवेसाठी पोकळी ठेवावी लागते. भट्टी रचताना त्यात लाकडाचा भुसा, लाकडी पट्टय़ा व तुकडे वापरले जातात. काही भागात यासाठी या हंगामात उपलब्ध होणारे काजूचे बोंड वाळवून भट्टीसाठी वापरले जातात. याला जळाव म्हणतात. त्याची योग्य रचना झाल्यावर भट्टी जाळली जाते. त्यातून आतल्या बाजूलाच ज्वाळा उडतात.
भट्टी पूर्ण थंड झाल्यावर या तयार झालेल्या पक्क्या विटा बाजूला केल्या जातात. यावेळी भट्टीतील आतल्या भागातील विटाच पक्क्या होतात. तर बाहेरील विटा दुस-या भट्टीच्या वेळी पुन्हा रचल्या जातात. या भट्टीसाठी लाकडाचे तुकडे तसेच काजू बोंड वापरतात.
सावंतवाडी तालुक्यात हा व्यवसाय सध्या मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. याच हंगामात घरे, इमारती बांधण्याचे काम चालत असल्याने याकामी विटांचाच वापर जास्त प्रमाणात होत असल्याने विटांना चांगली मागणी आहे. गोव्यातूनही या विटांना चांगली मागणी आहे. तेथे दरही चांगला मिळत असल्याने या भागातील विटा गोवा, कर्नाटक या भागात निर्यात केल्या जातात.
अवेळी होणा-या पावसामुळे वीट व्यावसायिक चिंतातूर बनले आहेत. हा व्यवसाय अवेळी पावसामुळे धोक्यात आला असून, वनविभाग, महसूल विभाग, गौण खनिज बंदी अशा बाबींना वेळोवेळी तोंड द्यावे लागते.
सांस्कृतिक ठेवा असलेला हा वीट व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी वित्तीय संस्थांबरोबरच सहकाराचीही आवश्यकता आहे. आज मोठय़ा प्रमाणात स्त्रियांचे बचतगट कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘पुरुष बचतगट’ स्थापन होऊन त्या माध्यमातून कमी व्याजदराने मिळणारे सरकारी कर्ज उपलब्ध होऊ शकते.

सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये रानमेव्याच्या खजिन्याची ताटे भरू लागली आहेत. त्याच्या दरबारात जायचे असेल तर ‘मी’ पणा सोडायला हवा. काटय़ांचा आणि दगडांचा रोष मानून चालणार नाही. कुठची फांदी तुम्हाला कधी अडवेल हे सांगता यायचे नाही. आडव्या आलेल्या फांदीला पायदळी देत तुडवून जाता कामा नये. त्या फांदीची हळुवार समजूत काढावी अथवा तलवार चालविल्याप्रमाणे हातातील शस्त्र चालवावे म्हणजे वाट मोकळी होईल. पावलापावलावर विविध फळांचे रांजण भरलेले दिसतील. कोकिळेची कुहुकुहुऽऽ जेथे सुरू असते. त्या ठिकाणी तुमचे सहज लक्ष जाईल. येथेच तोरणांचे माणिक-मोती तुमच्यासाठीच असतील. तोरणे म्हणजे साखरेच्या पाकातले रसगुल्लेच.. काटेरी फांद्यांवर पाचूंप्रमाणे हे पांढऱ्या द्राक्षांचे घोस लगडलेले असतात.
lonchaकैरीची खिरमट म्हटली की, भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबट, तिखट, खारट, गोड या सर्व चवी एकाच वेळी जिभेवर रेंगाळतात. डोळे गच्च मिटले जातात आणि दुस-याच क्षणी पुन्हा हात आंब्याच्या फोडीकडे जातो. ही कैऱ्यांची खिरमटं खाण्याची लज्जत याच दिवसातली आणि कैरी जर रायवळ आंब्याची असेल आणि या रायवळमधला खोबऱ्याचा फ्लेवर असेल तर खिरमट खातानाची चव.. अहाहाऽऽ!
चैत्रारंभानंतर सृष्टीचे रूप आणखीनच साजिरे-गोजिरे होते. सह्याद्रीत जेव्हा-जेव्हा भ्रमंती कराल तेव्हा-तेव्हा  मिळणारे अनुभव वेगवेगळे असतात. प्रत्येक ऋतूतला साजही वेगळा असतो. चैत्रात सह्याद्रीतला फेरफटका म्हणजे खायची चंगळ.. थोडसं आहारज्ञान असले आणि कधी कुठचे फळ खायचे याची प्राथमिक माहिती असली म्हणजे घेता येणारा आनंद हा स्वर्गाहूनही रम्य असाच. आपण फक्त पावले सांभाळावीत, निसर्गाचे बुफे पदार्थ तयारच असतात. हव्या त्या चवीत आणि हव्या त्या प्रकारचे! कोणते खावे, कसे खावे हे तुमच्या आवडीनिवडीवर ठरलेले.
सह्याद्री हा रामोशासारखा उभा, आडवा, भक्कम छातीने उभा असलेला. या दिवसात फुलांच्या बहरातून, मधमाशांच्या गुंजनातून तो बराच सावरला आहे. मधाची पोळी आता मोठी-मोठी होत आहेत. असं एखादं पोळं मिळालं तर खाण्यापूर्वी जरा विचार करा! नाहीतर हा मध प्यायल्यावर आपण हवेतच तरंगत आहोत की काय असा भास होतो.
झिंग उतरता उतरत नाही. आणि एकदा का आपण कुठचाही मध घेताना आपल्या शरीराला किती पचेल हे लक्षात घ्यायला हवे. एक मात्र सह्याद्रीत फिरताना गंमत असते.तुमची रपेट सुरू झाली की, घामाच्या धारा मुक्त होतात. आणि तुम्ही जे काही सेवन कराल ते-ते शरीर स्वीकारू लागते.
सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये एव्हाना रानमेव्याच्या खजिन्याची ताटे भरू लागली आहेत. त्याच्या दरबारात जायचे असेल तर ‘मी’ पणा सोडायला हवा.
काटय़ांचा आणि दगडांचा रोष मानून चालणार नाही. कुठची फांदी तुम्हाला अडवेल हे सांगता येणार नाही. तिला थेट सामोरे गेलात तर परिणाम भयानक होतील. त्या फांदीची हळुवार समजूत काढावी अथवा तलवार चालविल्याप्रमाणे हातातील शस्त्र चालवावे म्हणजे वाट मोकळी होईल. पण पाऊल जपून, कारण हे जंगल त्यांचं असतं, येथे फिरणाऱ्या प्राण्यांचा त्यावर हक्क असतो. आपण पाहुणे असतो, काही क्षणाचे! पावलापावलावर याचे भान ठेवून भल्या पहाटे सुटावे जंगलात.
कोकिळेची कुहुकुहुऽऽ जेथे सुरू असते. त्या ठिकाणी तुमचे सहज लक्ष जाईल. येथेच तोरणांचे माणिक-मोती तुमच्यासाठीच वाट पाहत असतील. तोरणे म्हणजे साखरेच्या पाकातले रसगुल्लेच..
काटेरी फांद्यांवर पाचूंप्रमाणे हे पांढ-या द्राक्षांचे घोस लगडलेले असतात. ही फळे चवीला फारच छान असतात. परंतु, ती मिळविताना काटय़ांचा विचार करावा लागतो. तोरणांच्या जाळय़ांप्रमाणेच हिरवे, पिवळे वाटाणेच काही झाडांवर पैंजन अडकवल्याप्रमाणे लोंबकळत असतात. हिला आटकन म्हणतात. तीही याच कुळाचारातली. फक्त चव आंबट-गोड..
सह्याद्री पार करायचा तर करवंदांना अव्हेरून चालणार नाही. माघ महिन्यापासूनच त्यांची लगबग सुरू होते. आता परिपक्व झालेली करवंदे रंग बदलू लागली आहेत. आंबट-गोड करवंदांचा आस्वाद पुढील पंधरा दिवसांपासून सुरू होईल. डोंगरची काळी मैना तिला का म्हणतात हे डोंगरात फिरत-फिरत रानातल्याच एखाद्या पानाचा खोला करून (पानाचा द्रोण) त्यात ती घ्यावीत आणि मनाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा.
आता या करवंदांचा हिरवा साज पाहायला मिळतो. खिरमटीच्या थाळीत केव्हा-केव्हा यांच्याही उभ्या-आडव्या भेशी पडतात. असं म्हणतातहिरडय़ांमधून येणारे रक्त करंवदं खाताच चटकन बरेही होते.  आताशी भ्रमंती करायची तर भूक क्षमविण्याचा प्रश्नच नाही. सह्याद्रीच्या भ्रमंतीत मीठ, मसाला, चवीपुरते गूळ घेतले म्हणजे झाले. बाकी काही नको. आपली जीभ भली की आपण.. खायचे किती आणि कसे हेच समजत नाही.
चांदवड अथवा कुडयाच्या पानावरून ही डिश समोर येते. खिरमट केल्यानंतर जिभेला गोडगोड हवे असते. मग पावले हेळयाच्या झाडाखाली वळतात. सूरमाडाच्या परिसरात तीन पाकळय़ांची पिवळी फुले आणि सुपाऱ्यांचा पसाराच पडलेला असतो.

आरक्षणावरून मतभेद

अनुसूचित जाती आणि जमातींच्या सरकारी कर्मचा-यांना बढतीतही आरक्षण असावे, हे घटना दुरुस्ती विधेयक वादळी ठरणार हे निश्चित होते; परंतु त्यावरून खासदारांत अक्षरश: झोंबाझोंबी होईल असे वाटले नव्हते. 
अनुसूचित जाती आणि जमातींच्या सरकारी कर्मचा-यांना बढतीतही आरक्षण असावे, हे घटना दुरुस्ती विधेयक वादळी ठरणार हे निश्चित होते; परंतु त्यावरून खासदारांत अक्षरश: झोंबाझोंबी होईल असे वाटले नव्हते. बसपाला हे विधेयक हवे आहे, तर सपाचा त्याला विरोध आहे. पण या दोन पक्षांच्या खासदारांनी परस्परांना धक्काबुक्की केली. त्यामुळे संसदेच्या प्रतिष्ठेला मोठाच डाग लागला. आरक्षणामुळे या समाजातील दबलेल्या वर्गाना सुधारलेल्या वर्गाच्या बरोबरीने आणण्यासाठी निश्चितच फायदा होईल; परंतु त्यातही राजकारण घुसले आहे. आरक्षणाचा लाभ घेणा-या दोन वर्गातही मतभेद आहेत. दुर्बल घटकांच्या दृष्टीने हा विषय त्यांच्या उद्धाराचा असल्याने त्यांच्या तो जिव्हाळ्याचा आहे. अनुसूचित जाती-जमातींना नोकरी मिळताना आरक्षण असते, तसे ते बढतीतही असावे, अशी ब-याच वर्षापासून मागणी होत होती. हे आरक्षण नसल्याने सरकारी कार्यालयांत वरिष्ठ पदांवर दलित अधिकारी दिसत नाहीत. त्या अर्थाने विचार केला तर त्यांना असे बढतीतही आरक्षण देण्यास तसा कोणी विरोध करण्याचे कारण नाही. पण असे आरक्षण घटना विरोधी असल्याने त्यांना न्यायालयांची मान्यता मिळत नाही. याशिवाय या विधेयकाच्या वाटचालीत अन्य अडथळेही आहेत. अशा विधेयकास संसदेची मंजुरी आवश्यक असते पण सध्या संसदेचे कामकाजही बंद पाडण्यात येते. शिवाय हे आरक्षण ज्यांच्यासाठी आहे ते मायावती यांचे मतदार असल्याचा समज पसरला आहे. साहजिकच अशा वेळी मुलायम सिंग यांचा समाजवादी पक्ष तरी कसा गप्प बसणार? त्यांनीही शड्ड ठोकून असेच आरक्षण ओबीसींनाही मिळणार असेल तरच आम्ही या विधेयकाला पाठिंबा देऊ, अशी भूमिका घेतली आहे. या प्रश्नावर भाजपची पंचाईत झाली आहे. आरक्षणाला पाठिंबा दिला तर आपले सवर्ण मतदार नाराज होतील व पाठिंबा नाही द्यावा तर दलितांची नाराजी ओढवेल या कात्रीत भाजप सापडला आहे. भाजपला सत्तेवर येण्याची स्वप्ने पडू लागली आहेत, पण त्यासाठी पक्षाला आपला सामाजिक पाया मजबूत करावा लागणार आहे. सध्या मुस्लीम मतदार भाजपच्या जवळ येत नाहीतच, पण दलितही भाजपपासून फटकून राहतात. म्हणून या आरक्षणाला पाठिंबा देऊन दलित समाजाला आपलेसे करावे, असे भाजप नेत्यांना वाटते, पण त्या बदल्यात आरक्षणविरोधी उच्चवर्णीय मतदार विरोधात जाईल ही त्यांची भीती अनाठायी नाही. भाजपच्या या भूमिकेमुळे भाजपप्रणित एनडीएत मतभेद निर्माण झाले आहेत. कारण संयुक्त जनता दलाने या आरक्षणाला केवळ पाठिंबाच दिला आहे, असे नाही, तर आपण बिहारात 17 वर्षापूर्वीच अशा प्रकारचा कायदा केला आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे. एनडीएमध्ये या प्रश्नावर केवळ दुहीच नव्हे तर ‘तिही’ही आहे. अशा आरक्षणाला शिवसेनेचा विरोध आहे. तर संपुआत तसे अलबेल नाही. संपुआतील द्रमुकनेही त्याला विरोध केला आहे. एकंदरीत वरवर साध्या वाटणा-या या प्रश्नाने राजकारण्यांची डोकेदुखीही चांगलीच वाढवली आहे.

महिलांना संरक्षण

गेल्या काही वर्षात आपल्या देशातील महिला नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडत आहेत. पण त्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित आहेतच याची खात्री देता येत नाही.  
गेल्या काही वर्षात आपल्या देशातील महिला नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडत आहेत. पण त्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित आहेतच याची खात्री देता येत नाही. त्यांना काही वेळा प्रत्यक्ष तर काही वेळा अप्रत्यक्षरीत्या केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून त्रासाला सामोरे जावे लागते. अशा वेळी त्या स्त्रिया कसलीही तक्रार करीत नाहीत. कारण आपल्या समाजात स्त्रियांकडे फार दूषित दृष्टिकोनातून पाहिले जाते. आपला छळ होत असल्याची तक्रार तिने केली तर समाज तिलाच दोष देतो. त्यामुळेच त्या अशा त्रासाकडे दुर्लक्ष करतात. पण त्यामुळे त्रास देणाराची भीड चेपली तर हा त्रास वाढण्याचीच शक्यता असते. म्हणूनच आता असा त्रास देणा-यांना कठोर शिक्षा ठोठावणारा कायदा करण्यात आला आहे. हा कायदा लैंगिक छळ विरोधी कायदा 2010 म्हणून ओळखला जातो. त्यातले 2010 साल फार महत्त्वाचे आहे. कारण सरकारने 2010 मध्ये हे विधेयक संसदेत मांडले होते. त्याला 2011 मध्ये लोकसभेने मंजुरी दिली; पण ते राज्यसभेत मंजूर झाले नाही. या विधेयकावर राज्यसभेत फार चिकित्सा करण्यात आली. काही जाणकार सदस्यांनी त्यातले काही दोष आणि उणिवा दाखवून दिल्या. ते दोष काढावेत यासाठी राज्यसभेने ते मंजूर न करता संसदेच्या निवड समितीकडे पाठवले. निवड समितीवर 13 सदस्य होते. काँग्रेसचे अश्विनीकुमार अध्यक्ष असलेल्या या समितीवर माकपाच्या सदस्या वृंदा कारत याही होत्या. या समितीने यानिमित्ताने तिहार तुरुंगात जाऊन तिथल्या महिला कैद्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्यावर पोलिसांकडून अत्याचार केले जात होते. त्यांचे अनुभव ऐकून तर या समितीला हा कायदा अपुराच आहे, याची जाणीव झाली. नंतर या समितीने अनेक महिला संघटना, कामावर जाणा-या महिला आणि समाजसेवकांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली. त्यातून या कायद्यातल्या त्रुटी कमी करता आल्या. त्यानंतरच या विधेयकास राज्यसभेने मंजुरी दिली. मुळात हा कायदा का आला? याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. संयुक्त राष्ट्रसंघाने या कायद्याबाबत आग्रह धरल्यानेच भारत सरकारला हा कायदा करावा लागला. मुळात अशा कायद्याची कल्पना ही 1975मध्ये पुढे आली. त्यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने एक जाहीरनामा प्रसिद्घ करून महिलांवर होणा-या अत्याचारांबाबत प्रतिबंधक कायदा करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही हा कायदा करण्यासाठी आपल्याला 36 वर्षे लागली. यासंबंधीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या दस्तावेजावर सही करण्यासाठीही आपणास 1997 साल उजाडले. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान होते. मात्र, त्यानंतर हा कायदा प्रत्यक्षात यायला मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदाची दुसरी कारकीर्द उजाडावी लागली. असो, विलंबाने का होईना, हा कायदा अस्तित्वात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडणा-या महिलांना एक हक्काचा आधार मिळाला आहे.