Friday, January 17, 2025

बापू जन्म दिवस

 अकोले,ता.१७:  अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ३७ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून व श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे त्यांनी शाळाबाह्य होऊ नये ही  मनात  उर्मी असणारे शांताराम बापू काळे  यांचा ५९वा वाढदिवस  आज ५ऑगष्ट २०२४ रोजी आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच राजूर येथिल  लक्ष्मण काळे गुरुजी व गंगुबाई यांचे ते चिरंजीव ५बहिणी ३भाऊ असे त्यांचे कुटुंब वडील शिक्षक त्यांना तोटका पगार त्यामुळे इयत्ता सातवी पासून बापू रोजगाराच्या शोधात कधी दुष्काळी कामावर तर कधी बाजारहाट ,यात्रा,मध्ये किराणा मालाची विक्री तर कधी फोटो स्टुडियो मध्ये काम त्यांनी कामाची कधी लाज बाळगली नाही सतत काम व शिक्षण घेत त्यांनी सायकलवर वृत्तपत्र विक्रीचे काम केले त्यातून शिक्षण घेतले तर विमा विकास अधिकारी उत्तम जगधने यांनी त्यांची जिद्द व चिकाटी पाहून त्यांना विमा प्रतिनिधी केले त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर वृत्तपत्र विक्री करताना पत्रकारिता देखील त्यांनी सुरू केल्याने विमा व्यवसायातून आर्थिक प्रश्न मार्गी लागले तर पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी चे संस्कार रुजवत त्यांचा अविरत पणे प्रवास सुरु झाला तो आजपर्यंत न थकता पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक ,दूध उत्पादक,बेरोजगारी, अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला  प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी पदावर तर काही व्यवसायात प्रवीण आहेत  श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी १९९२ ला मुलींचे विधालय सुरु केले तर इंग्रजी शाळा , उच्च माध्यमिक विधालय , हरीशचंद्र गडाच्या पायथ्यशी मवेशी या गावात विधालय सुरु करून तेथील विधार्थी राज्य व देश पातळीवर चमकविले ३६ कर्मचारी त्याच्या संस्थेत काम करीत असून अनेक अडचणी, खोटे आरोप  व संकटे आजही अंगावर घेत त्याचा प्रवास सुरु आहे . माजी मंत्री मधुकर पिचड हे त्याच्या कामाचे नेहमी कौतुक करतात .  कुणावरही व कोणताही प्रसंग असू ते मदतीला धावून जातात हा त्याचा स्थायी स्वभाव आहे  ठाकरवाडी येथील आदिवासी गतिमंद महिला बिट्टी,तिचा दोन वर्षांचा मुलगा यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकून त्यांच्या जगण्याचे सार्थक केले तर बांगर वाडी येथील वृद्ध महिलेस सरकारी पेन्शन सुरू केली,कौठवाडी येथील वनिता भांगरे हिची शिक्षणासाठी पायपीट हे वृत्त प्रसिद्ध करून महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येऊन हे कुटुंब सावरले  आज वनिताचे वडील परबत आई  भामाबाई यांना सरकारी पेन्शन सुरू असून कुटुंबाला घरकुल मिळाले आहे .तर वनिताला मोफत नर्सिंग साठी प्रवेश मिळाला आहे .हे सर्व बापू मुळे झाले हे विशेष  बापू  तर हे एक वादळ आहे . या वादळाला क्षमविण्याचे काम म्हणजे शांत करण्याचे काम आमच्या वहिनी  सौ . मंजुषाताई काळे करतात त्या प्राचार्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात सेवेत असून त्याने गरीब आदिवासी मुलींना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाचे कवाडे उघडून दिली आहेत  बापूना  गेली ३२ वर्षे खंबीरपणे साथ देणाऱ्या व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून समर्पित जीवन जगणाऱ्या या उभयंतास  नगर जिल्हा तेली समाजच्या वतीने  वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ...  त्याचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख समाधानाचे जावो ... अनिल काळे

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home