कावळा आणि मैना
पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात ढग दाटून आले होते. काही क्षणातच मुसळधार पाऊस पडेल, असं काहीसं वातावरण झालं होतं.

तितक्यात तिथे एक मैना आली आणि त्याच
झाडाच्या एका फांदीवर जाऊन बसली. सगळ्या कावळ्यांनी अचानक आपण बसलेल्या
झाडावर आलेल्या त्या मैनेला पाहिलं. मैनेला झाडावर बसलेलं पाहताच सगळे
कावळे आपलं भांडण विसरून एकत्र झाले व मैनेवर धावून आले. मैनेला काही कळेना
की, नक्की काय घडतयं.
बिचारी मैना त्यांना म्हणाली, ‘‘आज खूपच
अंधारून आलंय, त्यातच मी माझ्या घरटय़ाचा रस्ता पण विसरले आहे. मला कृपा
करून आज इथे राहू द्या.’’ सगळे कावळे एकसुरात ओरडले, ‘‘नाही, नाही. ही आमची
बसायची जागा आहे. तू इथे राहू शकत नाहीस.’’ मैना म्हणाली, ‘‘झाडं तर
ईश्वरानं सर्वासाठी बनवलेली आहेत.
मी खूप छोटी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे.
मला कृपा करून आजचा दिवस इथे राहू द्या.’’ कावळे म्हणाले, ‘‘आम्हाला
तुझ्यासारखी बहिण नको, तू देवाचं नाव घेतेस ना. मग जा त्या ईश्वराकडे आसरा
मागायला. इथे कशाला तडमडायला आलीस. तू जा, नाहीतर आम्ही तुझ्यावर तुटून पडू
आणि तुझा जीव घेऊ.’’ कावळे हे आपापसात नेहमीच भांहणं करताना आपणास नेहमी
पाहावयास मिळतात. नेहमी कावकाव करत एकमेकांशी भांडणं करताना
सकाळ-संध्याकाळ-रात्र आपल्याला दिसतात.
मात्र दुस-या कोणत्याही पक्ष्याविरूद्ध
मात्र ते एकत्र होऊन लढतात, हेही तेवढेच खरं आहे. मैनेच्याबाबतीतही तसंच
झालं. मैनेला कावळ्यांनी जाण्यास सांगितल्यावर ती बिचारी तिथूनच जवळच
असणा-या एका आंब्याच्या झाडाकडे उडत गेली व तिथे एका फांदीवर बसली. थोडय़ाच
वेळात मोठा पाऊस पडू लागला. पावसाचे मोठमोठे थेंब व त्याच्याबरोबरच गाराही
पडू लागल्या. गारा पडू लागल्यामुळे त्या कावळ्यांना काय करावं आणि कुठे
जावं, हे कळेना.
कारण निंबाच्या झाडावर फारसा आडोसा होत
नाही. त्यांना गारांचा मार बसू लागला. त्यामुळे बाहेरही पडता येईना की,
झाडावरही बसता येईना. बंदूकीतून सोडलेल्या गोळीसारखा गारांचा मारा त्यांना
बसू लागला. इकडे मैना ज्या झाडावर बसली होती, त्या आंब्याच्या झाडाची एक
फांदी तुटून खाली पडली व नसर्गिकपणे तिथे एक आडोसा (खोपा) तयार झाला.
छोटीशी मैना त्या खोप्यात सहजपणे बसू शकत
होती. मैना आत गेली आणि तिला त्या पावसाचा व गारांचा काहीच मार बसला नाही.
रात्रभर मुसळधार पाऊस पडला. सकाळ झाली आणि मैना त्या खोप्यातून बाहेर पडली
आणि तिने जे पाहिले ते आश्चर्यचकित व दु:खद होते. रात्रीच्या गारांच्या
माराने बहुतांश कावळे मृत्युमुखी पडले होते. तिला त्याच् खूप दु:ख झालं.
तिला उडताना पाहून त्यात मरणोन्मुख
असणा-या कावळ्यानं विचारलं की, मैना तू जिवंत कशी? यावर मैनेनं उत्तर दिलं,
‘‘मी ज्या झाडावर बसले होते, तिथे बसून मी ईश्वराची प्रार्थना केली व
त्यानेच मला या संकटातून वाचवलं. दु:खात परमेश्वरच आपली सुटका करू शकतो.
असा माझा ठाम विश्वास आहे.’’
तात्पर्य : ईश्वर संकटातून सुटका करतो किंवा संकट काळात ईश्वर आपल्याला सुबुद्धी देऊन संकटात मार्गही सुचवतो.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home