माणसाने
कुठल्याही क्षेत्रात करियर केले तरी मानवधर्म विसरू नये’ हा विचार मनात
बाळगून त्यांनी समाजकार्यातही स्वत:ला झोकून दिले. अपंगांना कृत्रिम पायाची
मदत, मृत्युशय्येवरील रुग्णांना आर्थिक मदत तसेच गंभीर आजारांनी ग्रासलेल्या
रुग्णांना कोणताही मोबदला न घेता भरीव आर्थिक मदत देत त्यांनी त्यांच्या
दातृत्वाचा झरा कधीही आटू दिला नाही.
केवळ ‘मी आणि माझा’ असा विचार करणार्यांच्या भाऊगर्दीत अशी काही व्यक्तिमत्त्वे उदयास येतात जी सतत इतरांचा विचार करतात. प्रवाहाविरुद्ध पोहतात आणि यशस्वीही होतात... असेच एक उमदे व्यक्तिमत्त्व नितीन साबळे मे. एस. ई. लॉजिस्टिक प्रा. लि.चे संस्थापक. महापालिका शाळेतील शिक्षण हा सध्याच्या समाजासाठी तुच्छतेचा विचार, पण गुरुदेव रवींद्रनाथांनी उभारलेले सृजनशील चैतन्याचे स्फूर्तिमंदिर अर्थात ‘शांतिनिकेतन’ हे महापालिका शाळेतही उभारले जाऊ शकते आणि लेकरांच्या प्रज्ञा, प्रतिभेतून सुंदर नवराष्ट्र उदयास येऊ शकते याचा प्रत्यय नितीन साबळेसारख्या महापालिका विद्यार्थ्यांच्या गगन भरारीतून प्रत्ययास येतो..................................... स्मार्ट तरुणाई कधी कधी...असंही ![]() ‘माझ्या तो डोक्यातच जातो... का कुणास ठाऊक... पण उगीचच त्याच्या दोन ठेवून द्याव्याशा वाटतात...’ पुढच्या सीटवर बसलेल्या त्या दोघांच्या गप्पा. खरं तर लेडीजसाठी स्वतंत्र सीट असताना आणि त्या रिकाम्या असताना या दोघी पुरुषांच्या सीट अडवून बसलेल्या म्हणून माझ्या डोक्यात जात होत्या... त्यामुळे कोणीतरी त्यांच्याही डोक्यात जाणारा बसमध्ये आहे हे ऐकून मला बरं वाटलं... आता पुढे काय होणार... त्या सीनची मला प्रतीक्षा. बस तशी रिकामीच होती, पण दोन स्टेशनानंतर भरून गेली. अन् तो महिलांच्या सीटवर बसला. बसताना त्याने या दोघींकडे वेगळीच नजर टाकली तेव्हा तो तोच हे मी ओळखले. पोरगा बर्या घरचा, दिसायलाही चांगला होता. म्हणजे पहिलेच इम्प्रेशन चांगले होते.......................... आयुर्वेद कोरफड ![]() ज्याच्याकडे बघितल्यावर डोळ्यांना आणि मनाला अगदी प्रसन्न वाटते असे एक रोपटं म्हणजे कोरफड. डोळ्यांचा विषय निघाला म्हणून सांगतो. ज्यांचा कॉम्प्युटरशी खूप संबंध असतो अशांनी संध्याकाळी कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवावा. थंडावा मिळतो. डोळ्यावरचा ताण कमी पडतो व डोळे निरोगी राहतात. हाच कोरफडीचा गर त्वचेवर चोळल्याने कोरडेपणा जाऊन टवटवीतपणा येतो. केस धुतल्यावर केसावर चोळल्यास केस चमकदार दिसतात. हाच गर खोबरेल तेलात उकळवून तेल लावल्यास केसांचं गळणं थांबत............................ महाराष्ट्र मंडळ देवास, महाराष्ट्र समाज ![]() मध्य प्रदेशातल्या जवळ जवळ प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात मराठी माणसं मोठ्या प्रमाणावर राहात आहेत. इंदूर,उज्जैनच्या जवळ असलेलं आणखी एक शहर म्हणजे देवास. देवासला कलेची भूमी म्हटलं जातं. सांस्कृतिक, धार्मिक वातावरण देवासला आहेच. देवासला १९४६ साली महाराष्ट्र समाजाची स्थापना झाली. डॉ. रामचंद्र ओक, सीताराम पुराणिक, बबन भागवत, भालचंद्र सुपेकर, वासुदेव आपटे अशा काही लोकांनी त्याकाळी मराठी लोकांनी एकत्र यावं असं मनाशी घेतलं आणि मंडळ स्थापन केलं. मध्य प्रदेशचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष असलेले अनंत पटवर्धन यांची मोलाची मदत मिळाली, आणि त्या काळात समाजाने खूप उन्नती साधली. मराठी सणवार साजरे होऊ लागले, गणेशोत्सव तर होताच...........................
जनरेशन नेक्स्ट
ब्रॅण्डेड हुशारी ![]() माझ्या मैत्रिणीच्या पाच वर्षांच्या मुलाने एका प्रश्नाचं उत्तर एक सेकंदात दिलं. तो प्रश्न होता... आईजवळ असलेला मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे? या प्रश्नाच्या उत्तराबरोबरच त्याने पटापट या मोबाईलने कसा फोटो काढता येतो, कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे. फ्रंटचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे... हे तो धडाधड सांगायला लागला. तुम्ही म्हणाल हे कौतुकास्पद आहे, पण आश्चर्यकारक नक्कीच नाही. आता ही पिढीच शार्प आहे. वगैरे वगैरे... खरंच... ही पिढीच हुशार. या माझ्या बोलण्यावर एका मैत्रिणीने सांगितले... ‘अगं! त्यांच्यासमोर आपण चर्चा करतो, ती ते ऐकत असतात ‘त’ वरून ताकभात ओळखतात त्यांना सगळंच उपलब्ध आहे. जे जे उपलब्ध असते ते बरोबर लक्षात राहतं या नियमाने मी आहे............................ आस पास शॉर्टकट ![]() त्या दिवशी मुंबई पावसाने तुंबली आणि प्रत्येकाची घरी जायची घाई सुरू झाली. प्रत्येक मुंबईकर हा अतिरेकी हल्ल्यांना जितका घाबरतो तितकाच मुसळधार पावसालाही. अर्थात मुंबईकरामधली माणुसकी यातल्या कोणत्याही प्रसंगाला घाबरून शांत बसत नाही, हेही तितकंच खरं! याचा प्रत्यय मला त्या पावसात आला. वेस्टर्न हायवेवर वांद्य्रात माझी गाडी बंद पडली आणि एक टॅक्सीवाले काका माझ्या मदतीला आले. मेकॅनिकशी बोलून मी गाडी सोडून निघालो आणि एकुणात समोरचं ट्रॅफिक पाहून मला काकांनी विचारलं ‘‘शॉर्टकट ले लू क्या?’’ मी त्यांना ‘हो’ म्हणालो...................... गझलाई कुठल्या क्षणी डसलीस गझले... ![]() कुंपणाची हद्द आकाशात नाही मूळ कराडचे असलेले सदानंद बेन्द्रे उत्तम ललित गद्य लिहितात. इंग्रजीवर त्यांची बर्यापैकी हुकुमत आहे. तीनेक वर्षांपूर्वी ‘गझलरंग’ने त्यांना झपाटलं... ते कॉमर्सचे पदवीधर म्हणून फायदेशीर गुंतवणुकीचा सल्ला इतरांना देत असले तरी... आपला जन्म कुठे व्हावा? गरीबाच्या झोपडीत की श्रीमंत राजवाड्यात? या जातीत व्हावा की त्या धर्मात व्हावा ?देशात व्हावा की परदेशात व्हावा? या ग्रहावर व्हावा की दुसर्या आकाशगंगेत व्हावा? यातलं काही म्हणजे काहीच आपल्या हातात नसतं. आणि आयुष्यभर आपलं दु:ख एकच असतं की सालं आपण मिसप्लेस झालो आहोत. नाही तर आपण यँव झालो असतो अन् त्यँव केलं असतं........................................
युवा साहस
जादुई रस्ता ![]() ![]() हिमालयाचे सारे काही अद्भुतच असते. प्रत्येक वेळी मला त्याच्या अद्भुतपणाची अनुभूती नव्याने मिळत आली आहे. हिमालयातील वातावरण, त्यात क्षणाक्षणाने होणारे बदल, रस्ते, नद्या, माणसं, डोंगर, दर्या, बर्फ... प्रत्येकाचे वेगळेपण टिपता टिपता माझा प्रवास घडत जातो... ‘मॅग्नेटिक हिल’चा रस्ता हेदेखील त्यातलेच एक अद्भुत प्रकरण....................... जीवनगाणे ‘प्लांचेट’ ![]() सध्या मी वाचत असलेल्या ’आठवले तसे’ या पुस्तकात दुर्गाबाई भागवतांनी ’प्लांचेट’ बाबतचे त्यांचे आश्चर्यकारक अनुभव लिहिले आहेत. त्यात प्लांचेट वर आलेल्या त्यांच्या आत्याच्या आत्म्याने दुर्गाबाई लहान असतानाच्या एका प्रसंगाचे वर्णन, जे प्लांचेट करणार्याला माहीत असणे अशक्य होते, ते तंतोतंत केल्याचा उल्लेख आहे. ऐहीक जीवनापालीकडे असलेल्या अनाकलनीय गूढ जगाचा वेध घेण्याचा प्रयत्न मानव पुरातन काळापासून करतो आहे. त्या जगाचा प्रत्यय आल्याचे दावे अनेक जण करत असतात. अनेक जाणत्या थोरामोठयांनी देखील आपल्याला असे अनुभव आल्याचे जागोजागी लिहून ठेवलेले आढळेल. मला स्वत:ला अजून तरी असल्या कुठल्याही पारलौकिक गोष्टीचा रोकडा अनुभव नाही. परंतू मला अनुभव नाही म्हणून एखादी गोष्ट आस्तत्वातच नाही असे मानायला मी तयार नाही.......................... खुसखुशीत तीन मूर्ती ![]() एक जुनी कथा आहे. एका गावात एक स्पर्धा भरवण्यात आली होती. स्पर्धा अशी होती की, गावाच्या कलामंदिरात तीन मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. या तीन मूर्तींपैकी सर्वोत्कृष्ट मूर्ती कोणती हे ओळखायचे होते. एक मूर्ती देवाची, दुसरी राजाची आणि तिसरी गाढवाची. देवाची मूर्ती सोन्याची, राजाची मूर्ती चांदीची आणि गाढवाची मूर्ती मातीची. मोठमोठे विद्वान मूर्तींची पाहणी करायला येत होते. आपापली मतं मतपेटीत टाकत होते. एके दिवशी कलामंदिरात भयंकर गर्दी जमली होती. एक विदुषी, एक विद्वान आणि एक किशोरवयीन पोर सर्वात पुढे मूर्ती पाहत होते. विदुषीने म्हटलं,‘‘राजाची मूर्ती किती सुंदर आहे, चांदीची आहे. काय राजबिंडा दिसतोय!’’ विद्वान तिचे वाक्य कापत म्हणाला, ‘‘छे छे, यापेक्षा देवाची मूर्ती मूर्ती उत्तम. एकतर ती सोन्याची आहे. सोने सर्वात मौल्यवान आणि राजापेक्षा देव श्रेष्ठ.’’ ते पोरगं या दोघांचं बोलणं कुतूहलाने ऐकत होतं. दोघांचेही वाद टोकाला जाऊन पोहोचले....................... खासमखास मिसळचा बोलबाला ![]() ![]() ![]() सगळ्यांच्या पसंतीस उतरणारा पदार्थ म्हणजे मिसळ. मिसळीचे जन्मस्थानाबद्दल जेवढे विविध मतांतरं आहेत तेवढेच मिसळीचे विविध प्रकार आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येक ठिकाणची वैशिष्ट्ये तिथल्या मिसळीत आपल्याला पहायला मिळते. जसे कोल्हापूरची खासियत असलेला तिखटपणा. अस्सल कोल्हापुरी झटक्याची मिसळ मिळण्याचे ठिकाण म्हणून सर्वांच्याच पसंतीचे फडतरे मिसळ. त्यानंतर मंगळवार पेठेतली जगतापांची आहार मिसळ, चव्हाण कुटुंबीयांची परंपरागत कसबा-बावडा येथील बावडा मिसळ, महालक्ष्मी मंदिराजवळची गुजरी येथील चोरघे मिसळ, खासबाग मैदाना जवळची बुचडे ह्यांची खासबाग मिसळ, इ................................. व्हॉट्स ऍप ![]()
- सुरज कालबोंडे, मुंबई
दहावी पास होऊन डॉली ११ वी ला कॉलेजमध्ये गेली.. वडील : जॉली, आधी तू मला बाबा म्हणायचीस आणि आता डॅड का म्हणतेस’’? डॉली : डॅड...ते काय आहे न की बाबा म्हंटल्यावर लिपस्टिक खराब होते.................................. आवाहन फुलोरा म्हणजे तरुणाईचा आरसा तरुणाईचं प्रतिबिंब टिपताना फुलोराने स्वत:लाही बदलले आहे नवा रंग, नवा साज शेवटी फुलोरा सरताज... म्हणून खास नवीन लेखक, नवे स्तंभ............................... |
|

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home