Saturday, August 22, 2015

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ हे केंद्र शासनाचे अभियान आहे.  या अभियानाबाबत पुणे येथे  20 व 21

ऑगस्‍ट रोजी दोन दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. राज्‍यातील ज्‍या जिल्‍ह्यात शून्‍य ते

सहा वर्षे वयोगटातील दर हजारी पुरुष बालकांमागे मुलींच्‍या जन्‍माची संख्‍या घटलेली आहे, त्‍या

जिल्‍ह्यातील अभियानाशी संबंधित अधिकारी कार्यशाळेस उपस्‍थित होते.

  मुलींचा घटता जन्‍मदर ही एक फार मोठी चिंतेची बाब आहे. भारतीय संस्‍कृतीच्‍या महान परंपरेचा

दाखला देत असतांना, स्‍त्री शक्‍तीचे पूजन केलेजात असल्‍याचे गौरवाने सांगतअसतांना मुलींचीगर्भातच

हत्‍या करण्‍याचे, जन्‍म झाला असल्‍यास मारुन टाकण्‍याचे अघोरी प्रकार होत होते. हरियाणा, पंजाब या

प्रगत राज्‍यातच नव्‍हे तर मातृसत्‍ताक संस्‍कृती असणा-या ईशान्‍येकडील नागालॅण्‍ड, मेघालयामध्‍येही

मुलींच्‍या जन्‍माचेप्रमाण घटलेले लक्षात आले आहे. सामाजिक समतोल कायम राखण्‍यासाठी मुला-मुलींच्‍या

जन्‍माचे प्रमाण सारखे असणे गरजेचेआहे. यावर केंद्र शासन आणि राज्‍य शासन व्‍यापक प्रमाणावर

कायद्यांचीअंमलबजावणी आणि जनजागृती या माध्‍यमातून कार्य करत आहे.

 ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ ही  केंद्र शासन पुरस्‍कृत योजना आहे. ही योजना एक व्‍यापक अभियान

म्‍हणून राबविण्‍यासाठी पुणे येथे यशवंतराव चव्‍हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्‍ये  (यशदा) दोन दिवशीय

कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. नवी दिल्‍लीच्‍या नॅशनल इन्‍स्‍टीट्यूट ऑफ पब्‍लीक कोऑपरेशन

एण्‍ड चाईल्‍ड डेव्‍हलपमेंटच्‍या  (निपसीड) तज्ञांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले. 2001आणि 2011 च्‍या

जनगणनेनुसार महाराष्‍ट्र राज्‍यातील ज्‍या जिल्‍ह्यात शून्‍य ते सहा वर्षे वयोगटातील दर हजारी पुरुष

बालकामागे मुलींच्‍या जन्‍माची संख्‍या घटलेली आहे, त्‍या जिल्‍ह्यातील अभियानाशी संबंधित अधिकारी

कार्यशाळेस उपस्‍थित होते.  राज्‍यातील अहमदनगर, बीड, जळगाव, कोल्‍हापूर, सांगली,औरंगाबाद,

उस्‍मानाबाद, जालना, वाशिम व बुलढाणाया दहा जिल्‍ह्यांचाया अभियानात समावेश करण्‍यात आला आहे.

कार्यशाळेत  निपसीडचे संचालक डॉ. दिनेश पॉल, डॉ. रितापटनाईक, सहसंचालक डॉ. तेजिंदरकौर, मीनाक्षी

राठौर आणि इतरांनी ‘बेटीबचाओ,बेटीपढाओ’ अभियानाच्‍या संबंधित सर्व पैलूंवर प्रकाशटाकण्‍याचाप्रयत्‍न

   देशाचेपंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी 22 जानेवारी, 2015 रोजी हरियाणा राज्‍यातील पानीपत येथूनया

अभियानाचा शुभारंभकेला. पानीपत येथील तीनही युद्धे भारतीय इतिहासामध्‍ये महत्‍त्‍वाची ठरली आहेत.

‘मुलींचाघटता जन्‍मदर’ हे ही एक प्रकारचे सामाजिक युध्‍द असून ते जिंकण्‍यासाठी पानीपतहे

ठिकाणनिवडण्‍यात आले.  कार्यशाळेतील विषय हे व्‍यापक होते. महाराष्‍ट्रातील मुलींच्‍या जन्‍माचे घटते

प्रमाण, बालकांचे लैंगिक  शोषण विरोधी कायदा, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान तंत्र प्रतिबंधक

कायदा,शिक्षणाचा हक्‍क कायदा, मुलींबाबतचा सामाजिक आणि वर्तणुकीय दृष्‍टिकोन, सर्व शिक्षा

अभियानांतर्गत मुलींच्‍या शिक्षणाची स्‍थिती, बेटीबचाओ-बेटी पढाओ अभियानाच्‍या

यशस्‍वीतेसाठीमाध्‍यमांची भूमिका, प्रचार व प्रसिध्‍दी नियोजन या सारख्‍या विषयांवर सखोलचर्चा आणि

मार्गदर्शन झाले.

 देशातील इतर राज्‍यात या अभियानाच्‍या प्रचार आणि प्रसिध्‍दी साठी तसेच लोकसहभाग

मिळविण्‍यासाठी कोणते अभिनव व नावीन्‍यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम राबविले जात आहेत, त्‍याचीही माहिती

यावेळी देण्‍यात आली. अभियानाशी संबंधित माहितीपट दाखवून जनमानस बदलण्‍याची किती आवश्‍यकता

आहे, हेही पटवून देण्‍यात आले.

 मुलगी म्‍हणजे परक्‍याचे धन समजणे, तिला पालक आपल्‍यावरील बोजा समजतात. इतकंच काय

दैनंदिन व्‍यवहारात सहजतेने मुलींना दुय्यम वागणूक दिली जाते. मुलगा म्‍हणजे वंशाचा दिवा ही मानसिकता

किती  चुकीची आहे, हेही सोदाहरण दाखवण्‍यात आले. कंपन्‍यांच्‍या नावाच्‍या पुढे ‘ब्रदर्स’लागलेले आपण

सहजतेने स्‍वीकारतो... पण तुम्‍हाला कधी ‘अमुकतमुक  एण्‍ड सिस्‍टर्स’ असे वाचायला मिळाले का?, आपण

कोणाकडे पाहुणे म्‍हणून जाणार असलो तर मुलासाठी बंदूक अथवातत्‍सम खेळ घेऊन जातो, मुलगी असेलतर

तिच्‍यासाठी बाहुली घेऊनजातो.  बोलतांनाही अगोदर पुरुषवाचक उच्‍चार होणार, जसे बाहुला-बाहुली. हे

सर्व इतक्‍या सहजतेने होते, की त्‍यामध्‍ये काही चूक आहे, हे आमच्‍याही लक्षात येत नाही.

   स्‍त्री भृणहत्‍येबाबतच्‍या सामाजिक संस्‍थांच्‍या जाहिरातींमध्‍ये काही प्रतिमा वापरल्‍या जातात,

त्‍याबाबतही अज्ञान दिसून येते. उदाहरणार्थ गर्भवती महिलेचे उघडे पोट दाखवून त्‍यामध्‍ये धारदार चाकू

खुपसण्‍याचा प्रयत्‍न, भृणाचा आकार आणि त्‍याची मान हाताच्‍या पंज्‍यामध्‍ये गच्‍च आवळलेली

यासारख्‍या प्रतिमांमुळे चुकीचा

संदेश जाण्‍याची भीतीच अधिक असते. काही वेळा पहिली मुलगी किंवा दोन मुलीअसलेल्‍या गर्भवतीमहिलेवर

यंत्रणांचे लक्ष, वगैरे  बातम्‍या  वाचण्‍यात येतात, अशा प्रकारची वक्‍तव्‍ये  चुकीचीआहेत.. संबंधित

महिलेच्‍या

व्‍यक्‍तीगत अधिकारांचेते उल्‍लंघन ठरते.. अनेकदा एखाद्या संस्‍थेकडून उत्‍कृष्‍टतेचे प्रमाणपत्र

मिळविण्‍याचा खटाटोप केला जातो, हा पूर्णपणे प्रसिध्‍दी स्‍टंट आहे. असे प्रमाणपत्र मिळविलेल्‍या किती

अंगणवाड्या,रुग्‍णालयांचा सेवादर्जासुधारलेला आहे, हा प्रश्‍नच पडतो.संबंधित संस्‍थेला पैसा मिळतो,पण

शासकीय यंत्रणांच्‍या दर्जात सातत्‍य राहतेच, असे नाही. अशा अनेक मुद्दयांचा ऊहापोह कार्यशाळेत झाला.

  अहमदनगरचे जिल्‍हाधिकारी अनिलकवडे आणि जळगावच्‍या जिल्‍हाधिकारीरुबलअग्रवाल यांनी

त्‍यांच्‍या जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत असलेल्‍या उपक्रमांची माहिती दिली. स्‍त्री जन्‍माचे स्‍वागत,

महिलांच्‍या ग्रामसभा, कलापथक-पथनाट्य यातून जनजागृती, विविध प्रकारच्‍या स्‍पर्धा, प्रभातफेरींचे

आयोजन यांचाही विशेष उल्‍लेख करण्‍यात आला. अहमदनगरचे जिल्‍हाधिकारीकवडे हे तर प्रत्‍येक बैठकीत,

जाहीर कार्यक्रमात स्‍त्री-पुरुष समानता, वृक्षारोपण, नेत्रदान यासारख्‍या राष्‍ट्रीय उपक्रमांचा आवर्जून उल्‍लेख

करतात. जळगावच्‍या जिल्‍हाधिकारी रुबलअग्रवाल यांनी राष्‍ट्रीय स्‍तरावर गौरवलेल्‍या ‘गुड्डी-गुड्डा’ या

डिजीटल फलकाची माहिती सांगितली. 

 या अभियानाच्‍या यशस्‍वीतेसाठी व्‍यूहरचना (स्‍ट्रॅटेजी) ठरवण्‍यात आली आहे. 1) बालिकेच्‍या

समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्‍साहनाकरिता समाजात कायम स्‍वरुपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे. 2)

उत्‍तम गव्‍हर्नस करिता समाजामध्‍ये घसरतचाललेल्‍या बालजन्‍मदर आणि प्रमाणातवाढ करण्‍यासाठी

जनजागृती करणे. 3) ज्‍या जिल्‍ह्यात व शहरात मुलींचा जन्‍मदर कमी झालेला आहे, अशा जिल्‍हा व

शहरांवर अधिक लक्ष केंद्रीत करुनत्‍या ठिकाणी एकात्‍मिक व कृतीशीलआराखडा तयार करणे.4)

सामाजिकबदलाचे प्रमुखघटक म्‍हणून पंचायत राज संस्‍था, शहरी स्‍थानिक समित्‍या, स्‍थानिक स्‍तरावरील

कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे, या कामामध्‍ये स्‍थानिक समुदाय, युवकमंडळे, महिलामंडळे यांचा सहभाग घेणे

5) सेवा देणारी रचना, योजना व कार्यक्रम हे लिंगभेद व बालहक्‍कास कारणीभूत आहेत का याची खात्री करणे

6) जिल्‍हा, तालुका व निम्‍नस्‍तरावर विविधसंस्‍था वसेवादेणारे विभाग यांचा समन्‍वय घडवून आणणे.

या अभियानाच्‍या नियोजन, अंमलबजावणी आणि संनियंत्रण(जिल्‍हा, तालुका व ग्रामपंचायत)या करिता

जिल्‍हा कृती दल कार्यरत असून त्‍याचे अध्‍यक्ष जिल्‍हाधिकारी आहेत. यामध्‍ये इतर विभाग म्‍हणून आरोग्‍य

व कुटुंब कल्‍याण, पंचायतराज, ग्रामविकास आणि  पोलीस विभाग इत्‍यादी यंत्रणा आहेत. तालुकास्‍तरावर

तालुका कृतीदल असून यामध्‍ये उपविभागीय अधिकारीआणि गट विकास अधिकारी प्रमुख आहेत.

ग्रामस्‍तरावरसरपंच आणि ग्रामसेवक यांच्‍या अध्‍यक्षतेखालीगाव पातळीवर समिती  आहे.

जिल्‍हाधिकारी यांच्‍या अधिनस्‍त त्‍यांच्‍या जिल्‍ह्यातील आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण विभाग, महिला व

बालविकास विभाग, सामाजिक न्‍याय विभाग, शिक्षण विभाग, पंचायत राज विभाग,ग्रामविकास,विधी व

न्‍याय विभाग, वैद्यकीयसंघटनांचेप्रतिनिधी,स्‍वयंसेवी संस्‍था यांचा समावेश आहे.

 मुलींच्‍या शिक्षणासाठी शासनाच्‍या विविध योजना आहेत, त्‍यांची व्‍यापक प्रसिध्‍दी झाल्‍यास या

अभियानासगती मिळूशकते. मुलींचे शारीरिक, मानसिक, आर्थिक आरोग्‍य संपन्‍नतेसाठी हे अभियान

महत्‍त्‍वाचे असल्‍याचे विशेषत्‍वाने नमूद करण्‍यात आले. लिंगभेदावर आधारितलिंग निवड प्रथा निर्मूलन

करणे, बालिकेच्‍या जीविताची वसुरक्षिततेचीहमी घेणे किंवा खात्री करणे व बालिकेच्‍या शिक्षणाची खात्री

करणे किंवा हमी घेणे ही या अभियानाची खास त्रिसूत्री आहे. ‘लेकींविषयीचादृष्‍टिकोनबदला, सर्वच काही

बदलेल’ हा एक मोठा संदेश या कार्यशाळेतून मिळाला.

राजेंद्र सरग,

जिल्‍हा माहिती अधिकारी,

अहमदनगर

2001 व 2011 च्‍या जनगणनेनुसार दर हजारी पुरुष बालकांमागे मुलींचा जन्‍मदर

खालीलप्रमाणे आहे

क्रमांक जिल्‍हा सन 2001 च्‍या

जनगणनेनुसार

सन 2011 च्‍या

जनगणनेनुसार

1 बीड 894 807

2 जळगाव 880 842

3 अहमदनगर 884 852

4 बुलढाणा 908 855

5 औरंगाबाद 890 858

6 वाशिम 918 863

7 कोल्‍हापूर 839 863

8 उस्‍मानाबाद 894 867

9 सांगली 851 867

10 जालना 903 870




0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home