Saturday, October 3, 2020

टँकर चे गाव ओसाड माळरान जमीन असलेले गाव म्हणून ज्याची ओळख नकाशावर होती ती पुसून त्या नकाशावर पाणीदार व विकासाच्या वाटेवर चालणारे

अकोले (शांताराम काळे )टँकर चे गाव ओसाड  माळरान जमीन असलेले गाव म्हणून ज्याची ओळख नकाशावर होती ती पुसून त्या नकाशावर  पाणीदार व विकासाच्या वाटेवर चालणारे आदर्शवत गाव म्हणून गावातील सरपंच सयाजी अस्वले व त्याच्या टीमने श्रमदान , एकोप्याने एकत्र येत  या गावाला  नव्याने ओळख करून  दिली आहे . नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांग भागातील धारेगाव आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. या धारेगावच्या प्रांगणात व मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या आज्या पर्वताच्या पायथ्याशी कुमशेत हे टुमदार गाव वसले आहे. जलसंधारणाच्या विविध कामांतून गावातील पिण्याच्या पाण्याचा टॅंकर  बंद झाला आहे. शिवारात विविध हंगामांत पिके डोलू लागली आहेत. जोडीला ठिबक सिंचन आहे. पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक असलेल्या या गावातील महिला हस्तकलेतून विविध वस्तू तयार करतात. त्या विक्रीतून संसाराला हातभार लावतात.

नगर जिल्ह्यात अकोले या तालुका ठिकाणापासून सुमारे ५५ किलोमीटरवर कुमशेत हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव येते. रामायणात वाल्मीक ऋषींचा आश्रम असल्याचा उल्लेख आज्या पर्वतासंबंधी आहे. हा पर्वत तसेच वाकडा, सुपली, करंडा आदी डोंगरांच्या मध्यावर गावठा, पाटीलवाडी, बोरीची वाडी, ठाकरवाडी, मुडाची वाडी व नाडेकरवाडी अशा सहा वाड्यांचे मिळून कुमशेत गाव तयार झाले आहे. गावाच्या एका बाजूस धारेगाव कोकणकडा आहे.
दुष्काळापासून मुक्ती
कुमशेतचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ३०२७. ५४ हेक्टर आहे. त्यात वनक्षेत्राचा मोठा वाटा आहे. पावसाळ्यात तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र खडकाळ जमीन असल्याने उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न जाणवतो. सतत टँकर तर रोजगारासाठी दाही दिशा अशा दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव आता परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू लागले आहे. पाणीदार गाव म्हणून आपली ओळख निर्माण करू लागले आहे. विशेष म्हणजे गाव दुष्काळमुक्त होण्यामध्ये व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यामध्ये लोकसहभाग व त्यातही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न होतो आहे.
जलसंधारणातून ठिकठिकाणी अडले पाणी-कुमशेत गावात जरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी गावाला कायमस्वरूपी जानेवारी महिन्यापासूनच टँकरची मागणी करावी लागत होती हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी गावातील सर्व महिला पुरुष एकत्र करून सातत्याने बैठक घेऊन माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या माध्यमातून 
नजीकच्या काळात कुमशेत गावशिवारात कृषी विभागामार्फत सिमेंट काँक्रीटचे सात दगडी बंधारे, लघू पाटबंधारे विभागाकडून पाच तर लोकसहभागातून वनराई बंधारे झाले. त्यातून डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी अडविले. जलयुक्त अभियान कार्यक्रमातून पाणी अडविण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तत्कालीन आमदार वैभव पिचड  यांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी  मिळवण्याचा प्रयत्न केला. बंधाऱ्यांमध्ये मेअखेरपर्यंत पाणी टिकते . त्याचा फायदा म्हणजे गावाला पिण्यासाठी पाणी मिळालेच, शिवाय उन्हाळी पिकेही शेतकरी घेऊ लागला आहे.
शिवारात डोलू लागली विविध पिके
पाटीलवाडी, ठाकरवाडी, चोंढी उत्तर ओढा आदी काँक्रीट बंधाऱ्याच्या काठावरील भात खाचरात गहू, हरभरा, भुईमूग, देशी वाल, वांगी, मेथी, पालक अशी पिके डोलू लागली आहेत. कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाच्या वाणाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. नैसर्गिक पाण्याचा ओलावा, त्याला बंधाऱ्यातील २५ ते ३० दशलक्ष घनफूट पाण्याची जोड व ठिबक सिंचन यांचा वापर झाला. त्या आधारे कांदा, बटाटा या पारंपरिक पिकांसह आंबा, आवळा, पेरू, बोरे, मेथी अशी विविधताही शिवारात दिसू लागली आहे.हे सर्व करत असताना गावाला जलयुक्त शिवारचा ३रा क्रमांक मिळाला हे सर्व गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीचे श्रेय आहे त्यामध्ये आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील आणि सर्व ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नाने हे शक्य झाल्याची भावना सरपंच सयाजी अस्वले यांनी सांगितले . गावात वनाधिकार कायद्याची अमलबजावणी करण्यासाठी सरपंच यांनी अभ्यास केला कायदा समजून घेतला त्यासाठी वैजापूर , गडचिरोली , मेंढालेखा , चंद्रपूर , गुजराथ , राजस्थान , दिल्ली , छत्तीसगड , मुंबई या ठिकाणी जाऊन तेथील तज्ज्ञांकडून हा कायदा समजून गावातील गाव बैठक , ग्रामसभा , बचतगट , बैठक , शेतकरी बैठक , जिव्हाळा गट बैठकांच्या माध्यमातून वनाधिकार कायदा गावातील ग्रामस्थांना समजून दिला तसेच लोकपंचायत कार्यशाळेच्या माध्यमातून जाणीवजागृती केल्यानंतर गावाला वनाधिकार कायद्याच्या आधारावर गावाला सामुदायिक क्षेत्र ४६२ हेक्टर  हे गावाच्या मालकीची जमीन म्हणून जिल्हास्तरीय वनहक्क समितीने कुमशेत गावाला याचे प्रमाणपत्र दिलेले असून उर्वरित राहिलेली जमीन मागणीसाठीचा पाठपुरावा चालू असून जोपर्यंत जमीन मिळत नाही तोपर्यंत हा पाठपुरावा चालू राहणार असल्याचे सयाजी अस्वले म्हणाले गावातील वैयक्तिक दावेदारांचे १०७ दावे  २००८ साला  मध्ये तालुकास्तरीय वन हक्क समिती व उपविभागीय समिती यांचेकडून दाखल केले असून त्यापैकी ११ दावेदारांचे  दावे मंजूर झाले आहेत 
शेतकरी समाधानी
कुमशेत शिवारातील बहुतांश उत्पादने सेंद्रियच म्हणावी लागतील. वेगवेगळ्या हंगामात शेती करणे शक्य झाल्याने रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे. . यावर्षी पाऊस अधिक झाल्याने बंधारेदेखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चारसूत्री भात लागवड करून परिसरात मार्गदर्शकाची भूमिकाच गावाने बजावली आहे.
हस्तकला व्यवसायातून संसाराला हातभार
कृषी विभागाने गावातील महिलांना बांबू उद्योग सुरू करून देण्यासाठीही मदत केली आहे. नेहमीच्या कामातून वर्षातून थोडा फुरसतीचा वेळ मिळतो. त्यावेळी ग्रामस्थ हस्तकलेचा व्यवसाय करतात. पावसाची वाट पाहण्याच्या किंवा पीक तयार होण्याच्या काळात ते आपल्याच शेतीस्त्रोतांच्या आधारे वस्तू तयार करण्याकडे वळतात. अशा हंगामी आदिवासी कारागिरांमध्ये सर्वात उल्लेखनीय कारागीर म्हणजे वेताच्या व बांबूच्या टोपल्या आणि तट्टे विणणारे लोक. पूर्वी बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंना अधिक मागणी होती. काही वर्षांपूर्वी या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात घरगुती वापर होत असे. मात्र आताच्या जमान्यातही बांबूपासून हारे, टोपल्या, तट्टे, खुराडे, कणगी आदी घटक बनवून देणारी कुमशेत गावातील आदिवासी कुटुंबीय दोन वर्षे बांबूच्या साहाय्याने बुरूडकाम करीत आहेत. टोपल्या, रोवली, सूप, करंडा आदी वस्तूंचे विणकाम करीत त्यांनी या व्यवसायातून आपल्या संसाराला हातभार लावला आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून कृषी विभाग व वन विभागाने गावात कामे केली. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पाण्याची समस्या दूर झाली अाहे. शेतीशिवार हिरवेगार झाल्याने पर्यटकांचा ओढा इथे वाढू लागला आहे. कुमशेत गाव नजीकच्या काळात पर्यटनासाठी नावारूपास येईल.अशी माहिती सरपंच सयाजी अस्वले यांनी दिली आहे तर कुमशेत गाव हे बांबू प्रशिक्षण केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे 
-
शिवारात पाणी आहे, पण वीज नाही. ती उपलब्ध झाल्यास शेतीसाठी बंधाऱ्यातून पाणी उचलल्यास येथील शेती आठमाही होईल. त्या दृष्टीने पावले टाकीत आहोत.
सर्वांच्या मदतीतून गाव बदलतेय
कुमशेतच्या सरपंच सोनाबाई विठ्ठल अस्वले म्हणाल्या की, प्रत्येक उन्हाळ्यात गावाला वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागे. पाण्याच्या टँकरवर सतत अवलंबून राहावे लागे. आता उन्हाळ्यात गावात येणारा पिण्याचा पाण्याचा टँकर बंद झाला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. शेतीलाही पाणी उपलब्ध होऊन रब्बी, उन्हाळी क्षेत्र वाढले आहे. गावातील महिलांचा तनिष्का गट स्थापन केला आहे. त्या आधारे वीस महिलांना एकत्र करून छोटे, मोठे उद्योग करण्याचे काम सुरू अाहे. बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मिळाला. हा गाळ खडकाळ माळरानावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात टाकला. त्यातून पाच हेक्टर क्षेत्र तयार होऊन त्यात पिके डोलू लागली आहेत. आता या जमिनींची पाणीक्षमताही वाढीस लागली आहे. या बंधाऱ्यांना भेट देण्यासाठी पर्यटक येतात. येथे वस्ती करतात. आमचे ग्रामस्थ त्यांना चुलीवरची भाकर तसेच अन्य जेवण देतात. पर्यटकांसाठी हुरडा पार्टीचे आयोजनही करण्यात येते. त्यातून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे पर्यटनाचे केंद्र म्हणून आमच्या गावाची ओळख झाली आहे. सरकारने पर्यटन विकासातून निधी दिल्यास तसेच रस्ते काँक्रीटचे तयार झाले तर पर्यटकांचा ओघ अधिक वाढेल, असेही  सोनाबाईंनी सांगितले.
- सोनाबाई अस्वले, ९४२३१४९१६८
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुमशेत परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. हा परिसर अतिशय निसर्गरम्य असून, पर्यटकांना मोहवून टाकणारा आहे. येथील ग्रामस्थांनी एकोप्याने राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व प्रगतीची वाटचाल सुरू ठेवावी.
२०१८ तें २०२० पर्यंत कुमशेत गावात केलेली कामे व राबविण्यात आलेले उपक्रम -*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत गावठा उंबरवाडी या शाळांना सुंदर कंपाऊँ ङ वाल बांधकाम , *उंबरवाडी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम पूर्ण , दलित वस्ती पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम पूर्ण , गावातील वड्या वस्त्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले , धरराव देवाचे मंदिर बांधकाम पूर्ण व जीर्णोद्धार कार्यक्रम , गावातील बंधाऱ्यातील गाळ काढणे व लिकेज काढणे , धरराव मंदिर व कोकणकड्याकडे जाणाऱ्या रोटीचे काम चालू , गावाला सामुदायिक वन हक्काच्या माध्यमातून ४६३ हेक्तर क्षेत्र जमिनीचे जिल्हास्तरीय वन हक्क समितीने गावाच्या मालकीची जमीन प्रमाणपत्र मिळाले . *गावात जातीच्या दाखल्यांचा कॅम्प आयोजित करून ग्रामस्थांना गावातच जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यात आले गावातील एका अंगणवाडीला आदर्श अंगणवाडी पुरस्कार मिळाला तर कुमशेत गावालाही जलयुक्त शिवार पुरस्कार मिळाला आहे , आदर्श गाव करण्यासाठी सरपंच सयाजी अस्वले यांनी अभ्यास सहलीचे नियोजन करून पाटोदा , चंद्रपूर ,गडचिरोली ,येथे जाऊन अभ्यास केला गावात महिला बचत गटाची स्थापना करून त्याद्वारे  लघु उद्योग सुरु करण्यात आले आहे . महिलांना व तरुणांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले , गावात सुधारित बांबूची लागवड २१ शेतकरी ४००० रोपांची वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड पूर्ण झाली सुधारित पद्धतीने चार सूत्री पद्धतीने भट लागवड व पारंपरिक पद्धतीने बियाणांचे संवर्धन करण्यात येते , गावातील शेतकऱ्यांचे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे कला असून पेसा कायद्याची अमलबजावणी स्वतंत्रपणे ग्रामसभा पिण्याच्या पाण्यासाठी गावात तीन ठिकाणी बॉयरवेल मारले असून गावात शेतीला व पिण्याला मुबलक पाणी उपलब्ध असल्याचे दिसून आले . पर्यटन वाढीसाठी गावातील युवकांनी गाईड प्रशिक्षण दिले जात असून पर्यटकांना राहण्याची सुरक्षित व्यवस्था करण्यात येते त्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होतो तर महिला बचतगट पर्यटकांना घरगुती जेवणाचे नियॉन करतात त्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळून दोन पैसे मिळतात .गावातील महिलांना कृषी माळावर प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते तसेच महिला व युवकांना वनौपजावर प्रक्रिया उद्योगाचेही प्रशिक्षण दिले जाते , गाव स्वच्छता अभियान राबवते त्यामुळे गाव शतर टक्के हागणदारी मुक्त करण्यात आले आहे . गावातील सर्व कुटुंबाना गॅस वाटप करण्यात आले आहे , गावातील युवकांना वाचन साठी वाचनालय मदतीच्या माध्यमातून सुरु केले आहे तर एमपीएससी चे पुस्तकेही उपलब्ध करण्यात अली आहेत गावात विविध डॉक्तरांच्या माध्यमातून गावात दर महिन्याला आरोग्य शिबीर  आयोजन  केले जाते तर जिव्हाळा संस्था स्थापन करून गावात सामाजिक कामे केली जातात गावात कोरोना समितीची स्थापना करून त्या माध्यमातून नियोजन करून प्रत्येक कुटुंबाला गोळ्यांचे वाटप मास्क चे वाटप करण्यात येत आहे . गावातील ५५ कुटुंबाचे बंद असलेले रेशनवरील धान्य मिळण्यास सुरुवात झाली असून अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत त्यासाठी मदतही गोळा झाली आहे गावात श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेची सुरळीतपणे अमलबजावणी करून त्यातून वेगवेगळ्या योजनांचा गावातील ग्रामस्थांना लाभ मिळवून दिल्याचे सरपंच सयाजी अस्वले यांनी सांगितले आहे . तर वनविभागामार्फत कुमशेत गावात मोटार ड्रायव्हिंगचे कोर्स महिनाभर चालू करून प्रशिक्षण देऊन लायसन्स देण्यात अली आहेत   गावात पर्यटन वाढविण्यासाठी १९९६ मध्ये गावात युको टुरिझमच्या ट्रेनींग घेऊन त्यानंतर गावातील लोकांना ते समजून सांगण्यात आले तरुणांचे लक्ष्य याकडे केंद्रित होण्यासाठी गावात तीन दिवसाचे सरपंच अस्वले यांनी प्रशिक्षण दिले . व हिमाचल प्रदेश ,सिपती काझा या ठिकाणी चालणारे होमस्टे नावाने चालणारे पर्यटन गावातील तरुणांना दाखविण्यात आले त्याप्रमाणे गावात युको टुरिझम वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत , गावातील अंगणवाडी , प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात अली आहे .  सरपंच - सयाजी अस्वले ९४२१३५०६५६ ,९९२२२५७६६४ 
कुमशेत आर्थिक प्रगतीकडे --- कुमशेत गावातील शेतकरी , तरुण , महिला आपापल्या कुवतीप्रमाणे शेती , व्यवसाय करून सुखी समाधानी झाले आहेत प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्याने पैसा उप्लब्ध्तेतून घरात टीव्ही , फर्निचर , मोटार सायकल , जीप व  शेती आधुनिकतेकडे नेण्यासाठी ट्रकटर,आदी यंत्रसामुग्री आणून शेतीची मशागत  करत आहेत . बांबूचे वनविभाग व स्वमालकीच्या जमिनीवर सुमारे ७ हजार रोपे लावून बांबूचे मोठे बन तयार करण्यात आले आहे त्यातून लोकपंचायत संस्थेने साहित्य, कारागीर कीट पुरवठा मार्गदर्शन करून आज गावातील व परिसरातील तरुणांना व महिलांना काम मिळाले आहे . नाशिक , नगर , संगमनेर , पुणे या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री केली जाते त्यंच्या कलेत असणारी सुबकता पर्यटकांना भावते . त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतात त्यांना राहण्याची जेवणाची व्यवस्था करून नंतर कोबड नाच करून त्य्तुन्ही त्यांना आर्थिक उत्पन्न मिळते . गावात नौ बंधारे असून त्याद्वारे पिण्यास पाणी तर मिळतेच मात्र शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने भात पिकानंतर गहू , हरबरा ,बटाटे , सोयाबीन ,असे डबल पिक हे आदिवासी घेतात , जमिनीचा पोट सुधार्ण्य्साठी गांडूळ खत , शेणखत ,पाला पाचोळा  वापरल्याने त्यांच्या  जमिनीचा पोत  सुधारला असून गतवर्षीपेक्षा उतपादंही वाढले आहे , सेंद्रिय पद्धतीने घेत असलेल्या त्यंच्या , तांदूळ , गहू , वाटणा , व भाजीपाल्याला मोठी मागणी असते बाहेरील शेतकरी त्यंची शेती पाहण्यसाठी भेट देतात . प्रत्येक घरात कोंबड्या , शेळ्या व डांगी जनावरे असून त्य्तुन्ही उत्पन्न मिळते . बाळू बरामते यांचा गायींचा मोठा गोठा असून त्यन्च्य्सोबत ढवळा मुठे , ज्ञानेश्वर अस्वले , बन्सी अस्वले यांचेकडे  ट्रकटर,आहे  वनिता बरामते , च्निधाबाई अस्वले , वनिता बारामते,नवसू मधे, गोविंद धिंदळे, गोविंद मधे, काळू अस्वले , विठ्ठल अस्वले हे ग्रामस्थ सतत गावाच्या विकासासाठी एकत्र येतात माजी सरपंच पोलीस पाटील , सरपंच हे दर आठवड्याला बसून गाव विकासाच्याबाब्त चर्चा करून व गावात आर्थिक बाबीचा विचार करून प्रत्येक ग्रामस्थाला श्सानाच्या विविध योजनाचा लाभ देण्यसाठी धडपडत असतात. कुमशेत चे १० हेक्टर क्षेत्र भिजत असून हे क्षेत्र सिंचनाखाली  २५ हेक्टर पर्यंत नेण्याचा मानस या गावचा आहे . तर महिला बचत गट मार्फत  महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असून , हस्तकला , शेळीपालन , कोंबडी पालन , मत्स्य पालन , साठी नियोजन करून त्या दिशेने पूल उचलली जात आहे . कोरोना मुळे सध्या पर्यटक येत नसले तरी पर्यटक साठी निवास व्यवस्था ,भोजन , बैलगाडी सफर ,कोंबडनाच , टेंट, ट्रेकिग इत्यादी सुविधा देण्यासाठी तरुणांनी आपल्या शेतामध्ये नियोजन केले आहे तर कृषी पर्यटन , इको टुरिझम च्या दिशेने त्यंची पाऊले पडत आहे तर प्रतेकाच्या हाताला काम मिळाल्याने रोजगाराचा प्रश्न सुटला आहे . या सर्व कामासाठी माजी सरपंच , सदस्य , महिला , तरुण , ग्रामस्थ यांचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे सरपंच सयाजी अस्वले यांनी सांगितले

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home