Sunday, June 22, 2014

सौ . हेमलताताई  पिचड (आमदार सौभाग्यवती )अकोले अकोले, ता . २० :कोणत्याही समारंभाला गेले की निवेदक माझा परिचय करून देतात या आदिवासी विकास मंत्री नामदार मधुकररावजी पिचड यांच्या सुविध  पत्नी. सौ हेमलता मधुकररावजी पिचड आणि त्या नंतरराजूर गावाच्या पहिल्या महिला सरपंच, राजूर गावाच्या दारूबंदीच्या प्रणेत्या  वगैरे वगैर. हा परिचय ऐकताना कोठेतरी अपूर्णता वाटत असते एक अनामिक हुरहूर मनात दातात असते कारण राजकीय पद, चेहरा, आर्थिक स्थिती यावरून आपण मनसे ओळखतो पण प्रत्येक माणसांची आपल्या मनातील ओळख म्हणजे त्याचे विचार असतात.
माझे माहेर मुरबाडचे, माझे लग्न १९७० साली झाले. त्यावेळी साहेब पंचायत समितीचे सभापती होते. १९७२ चा भीषण दुष्काळ मला चांगला 
आठवतो. दुष्काळी परिस्थिती, या भागातील रस्ते पाझर तलाव यांची कामे आणि आदिवासी भाग या सर्व गोष्टींचा साहेबांनी खूप दूरदृष्टी विचार करून या परिस्थितीचा तालुक्यातील कामासाठी उपयोग करून घेतला सोने हा सर्व धातूंमधील श्रेष्ठ धातू पण कसोटी लावल्यावर त्याला वेगळी झळाळी येते त्यावेळी नेमके तसे झाले. साहेबांची काम करण्याची पद्धत त्यांचा दांडगा लोकसंपर्क तळागाळातील माणसांची वेदना ओळखून त्यावर उपाय शोधण्याची खुबी आणि अविश्रांत काम करण्याची क्षमता या सर्वांमुळे त्यांनी ते पद कौशल्याने हाताळले. त्यावेळेच्या त्यांच्या कामामुळे त्यांच्या नेतृत्वातील विलक्षण ताकतीची प्रशाशनावरील मजबूत पकडीची संपूर्ण  तालुक्याला कल्पना आली. आजच्या मंत्री पदाचा भक्कम पाया माझ्या मते त्या दुष्काळी परिस्थिती हाताळताना घातला गेला आहे. पंचायत समितीचे सभापती आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष या निरनिराळ्या भूमिका साहेबांनी तेवढ्याच ताकतीने सांभाळल्या. साहेब केवळ तालुक्याचे नेते नाहीत तर ते महाराष्ट्राचे नेते त्यामुळे त्यांच्याकडे कामासाठी येणारे नेते, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, सामान्य माणसे यांची कायम गर्दी त्यात घरची संपूर्ण  जबाबदारी माझ्यावर . मुलांचे शिक्षण, संगोपन, घर चालवणे, घरी येणाऱ्या जाणाऱ्या नेत्या कार्यकर्त्यांचे आतिथ्य या गोष्टींची जबाबदारी माझी. त्यात विशेष म्हणजे माझा पिंड राजकीय नाही. माझे माहेर तसे जुन्या वळणाचे. एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारे लहानपणापासून भावंडांची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझ्या वाटेला आलेली भूमिका मी यशस्वीपने पार पडली पण हे सर्व करताना माझ्या लक्षात आलेकी समाज सेवेची आवड असलेल्या व्यक्तीच या जबाबदार्या पार पडू शकतात. माझ्या आयुष्यातील अविस्मरनिय  प्रसंग म्हणजे मला विश्वयोगी प.पु. स्वामी गगनगिरी महाराजांचा लाभलेला अनुग्रह. त्यांची कृपा आहे म्हणु नच माझा प्रवास इथपर्यंत झाला आहे. मी जे काही चांगले करते असे तुम्हाला वाटते त्या सर्व गोष्टी प.पु. गगनगिरी बाबा माझ्या हातून करून घेतात अशी माझी निस्सीम श्रद्धा आहे .  मला राजकीय वारसा नाही परंतु सामाजिक जाणिवेचे बाळकडू घरातून मिळाले लग्न झाल्यानंतर नामदार पिचड साहेबांच्या मार्गदर्शनाने मी १९७२ ला तारामती दुध संकलन केंद्राची राजूर येथे स्थापन केली. इंदिराजी महिला मंडळ,काढले तर दिल्लीला स्वर्गीय इंदिरा गांधी यांना भेटायला गेले . पहिल्यापासून व्यसनं मुक्ती व्हावी त्यामुळे समाजाचे दारिद्र्य जावे , महिलांना सबला बनावे तर बाल्गोपालाना शिक्षण मिळावे हि माझी भावना त्याला साहेबांनी भरीव साथ केली जिलहा परिषदेच्या मदतीने परिसरात १२ बालवाड्या सुरु केल्या. परिसरात महिला मंडळे  स्थापन करून त्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त शिबिरे घेतली स्वछतेचे धडे गिरवले. त्या नंतर मला मुलांचे शिक्षण,संगोपन यातून वेळ मिळेल तशी धार्मिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊ लागले १९८० साली पिचड साहेब आमदार झाले कै. वसंतदादा पाटील यांनी यांच्यातील क्षमता हेरून त्यांना राज्यमन्त्रीपद दिले त्या नंतर कॅबिनेट मंत्री, विरोधीपक्ष नेते , राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष झाले नामदार शरद पवार साहेब यांचे आज ते अत्यंत विश्वासू आहेत. यातच सर्व काही आले
कोणतीही पत्नी असो सामान्य माणसांची किवा मंत्र्यांची तिच्या मनातले विचार, तिचे घर, परिवार, तिचा परिसर, तिचा गाव विकासाच्या वाटेवर नेण्याचे आसतात. मी राजूर मध्ये धार्मिक सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेऊ लागले महिलामध्ये मिसळल्याने त्यांच्या प्रश्नाची जाणीव  अधिक तीव्र झाली. परिसरातील आदिवासी महिलांची दारूमुळे होणारी होरपळ पाहून मी अंतर्मुख झाले त्यांच्याच मदतीने व्यसनमुक्तीची शिबिरे आयोजित करताकरताच दारूबंदीची चळवळ हाती घेतली यात साहेबांबरोबरच माझा धाकटा मुलगा वैभवभाऊचीही  साथ होती ऑक्टोबर २००५ मध्ये राजूरच्या ऐतिहासिक ग्रामकसभेने ठराव पारीक  झाला. साहेबांचा भक्कम पाठिंबा व आशीर्वाद होत. त्या दिवशी इतरांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे भाग्य मला लाभले म्हणून खूप बरे वाटले. पण काही दिवसातच इतर गावाचे दारूमुळे होणारे हाल पाहून  वाईट वाटले २०११ साली मी तालुक्यातील १४१ ग्रामपंच्य्तीचे दारू बंदीचे ठराव आर आर पाटीलां पर्यंत पोहोचले गावातील अतिक्रमणे काढली गावाने २०११ च्या निवडणुकीत मला बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिले. साहेबांनी माझ्या या कामाला पाठिंबा दिला मी राजूर सारख्या गावाची ७९ वर्षाच्या १ ली महिला सरपंच. आणि तीही बिनविरोध झाले. काहींनी टीका केली मंत्र्याच्या पत्नीला सरपंच पदासारखे क्षुल्लक पद शोभत नाही वगैरे वगैरे माझ्या मते पद कोणतेही असो त्यातून समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द पाहिजे त्या परिस्थितीने मला झुंझायाला शिकविले मी सुद्धा मागे वळून पहिले नाही पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धयोजनेत सहभाग घेतला ४० हजार झाडे लावली संत गाडगे बाबा ग्राम स्वछता अभियानात भाग घेतला माझ्या गावाला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. दरम्यानच्या काळात मलाही वृक्ष मित्र आदर्श सरपंच असे ४ - ५ पुरस्कार मिळाले लोकांनी तोंडभरून कौतुक केले मला पुरस्कारांमध्ये आनंद नाही लोकांचे प्रश्न सोडविण्यात मला समाधान आहे यावर्षीराजूर गाव निर्मल करण्याचा संकल्प सोडलाय . ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक,अधिकारी,कर्मचारी,पत्रकार,ग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य मिलते. नामदार पिचड साहेबांसारखा खंदा पाठीराखा आहे. वैभव पिचड यांची मोलाची साथ आहे . त्यामुळे कितीही अडचणी येवो गाव निर्मल होणारच . प्रत्येक यशस्वी पुरुष्याच्या मागे एक स्त्री उभी आहे असे म्हणतात . समतेच्या युगात प्रत्येक यशस्वी स्त्री च्या मागे तिचा पती किती खंबीरपणे उभा असतो हेही समाजाने कृपया लक्षात घ्यावे .
            राजकीय क्षेत्रातील व्यक्ती बर्याच कामांमुळे दिवसभर बाहेर असतात . त्यांच्या घरातील व्यक्तींना कधी कधी महत्वाच्या प्रसंगी त्यांची अनुपस्तिथि प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे त्या घरातील भावनांची आंदोलने अनेकदा मी  आयकले आहे. माझ्या सुदायवाने असा एकही प्रसंग माझ्या आयुष्यात आले नाही. नामदार पिचड साहेबांचा उरक प्रचंड आहे . तरुणालाही लाजवील अशी कामे करण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यात आहे. एवढे कामे असूनही ते प्रत्येक सणावाराला घरी असतात. एवढे भाग्य माझ्या वाटेला आल्याबद्दल देवाची व समाजाची मी ऋणी अहे. परमपूज्य गगनगिरी महाराजांचे कृपा आशीर्वाद पाठीशी अहेत.
                     एखाद्या सभेला आम्ही उभयता हजार असलो तर साहेब त्यांच्या प्रास्ताविकात माझा अतिशय चांगुलपणाने उल्लेख करतात. मी आजारी पडले तर ते वेळो वेळी काळजी घेतात. जवळ नसले तरी फोन वरून मला व डॉक्टरांना सूचना ठरलेल्या असतात. वैभव भाऊ बद्दल तर काय लिहू ? त्याच्यात सुद्धा विलक्षण क्षमता आहे. कार्यकर्त्यांचे अगदी तपशीलवार माहिती तो ठेवतो . तालुक्यातील अनेक गावे ,त्यातील कार्यकर्ते त्यांचे स्वभाव ,त्याला खडा न खडा  माहिती. लोकांना वैभव भाऊ बद्दल फारशी माहिती नाही. साहेबांच्या कर्तुत्वाने दिपून गेल्यामुळे भाऊंचे महत्व सहसा लक्षात येत नाही. परंतु एकाच वेळी दुधसंघ ,जिल्हा बँक,जिल्हा परिषद,यांचे प्रश्न तो ज्या सहजतेने सोडवतो त्यावरून त्याच्यातील नेतृत्व गुण मी मात्र ओळखले आहेत. परंतु योग्य वेळ आल्यानंतर सर्वांच्या ते लक्षात यॆइलही . तात्पर्य माझी ओळख हि केवळ माझ्या एका व्यक्तीची नाही . कुटुंबातील सर्वांची वेग वेगळी पदे असूनही जनसेवेच्या एका धाग्याने ती जोडलेली आहेत. तो धागा अखंड विणून ,गाव बंधीलकेनी  राहून समाजऋण फेडण्याचा हा अल्पसह प्रयत्न १)राजूर येथील कॉनक्रिटि करण कामाचे उद्घाटन होते साहेब येणार होते , साहेब आले मीही त्या कार्यक्रमाला होते ज्यावेळी श्रीफळ वाढवायचे तेव्हा साहेब म्हणाले मी नाही गावच्या सरपंच प्रथम नागरिक आहेत त्या श्रीफळ वाढवतील मला दिलेला हा सन्मान मी आयुष्यभर विसरू शकणार नाही .   २)साहेबान  समोर भाष ण करा यला मी घाबरते परंतु साहेबांनी सुत्रसंचलन करणारे भास्कर येलमामे यांनी माझ्या अगोदर सौ . पिचड ताई बोलतील असे सांगितले मी खूप घाबरले तरी माझ्यात आत्मविश्वास वाढला नि १५ मिनिट बोलले घरी आल्यावर साहेबांनी तू चं बोलली असे सांगितल्यावर मला झोपच आली नाही . ३ )अकोले तालुक्यात दारूबंदीचे आंदोलन सुरु झाले गावात महिला व तरुण माझ्या कडे आले व निवेदनावर सही करा असे म्हटल्यावर मी सही केली परंतु मनात भीती होती साहेब काय म्हणतील परंतु साहेबाना भीत भीत मी हि गोष्ट कानावर घातली साहेबांनी चागले काम आहे आदिवासी भागात दारू बंदी व्हावी हि माझीही इछ्या असल्याचे म्हणताच मी जोमाने कामाला लागले व ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा यशस्वी लढा दिला यावेळी साहेबही ग्रामसभेला उपस्थित होते माझा यशस्वी लढा साहेबांमुळे यशस्वी झाला . ४ )राजूरला न्यायलय व्हावे हि सर्व जनतेची मागणी होती साहेबांनी १९८४ ला जिल्हा न्यायधीश यांना पत्र पाठवून कळविले होते मात्र गेली २ वर्षापासून साहेबांच्या या कामाला यश आले काम साहेबांचे प्रयत्न साहेबांचे मात्र सर्वच श्रेय मला देतात कारण मी साहेबाची पत्नी आहे म्हणून . ५ )प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते मात्र माझ्या बाबत माझ्या सर्व कामाला परमेश्वर व साहेबांची साथ असल्यामुळेच मी सामाजिक क्षेत्रात यशस्वी काम करू शकले ६ )अकोले तालुक्यात झालेली विकास कामे म्हणजे राज्यातील एक पिचड प्या टर्न म्हणून ओळखला जातो . ७ )साहेब चिडले रागवले कि आम्ही सार्वजन काही काळ शांत असतो साहेबांचा राग शांत झाला कि साहेब स्वतःहून बोलावून घेतात तर माझा स्वर्गीय मुलगा जितेंद्र याची छोटी मुलगी राधिका हिच्यावर साहेबांचे खुफ प्रेम असल्याने साहेब रागवले कि राधिका हजर असते त्यामुळे घरातील वातावरण शांत होते . ८)साहेबांकडे राज्याची मोठी जबाबदारी असल्यामुळे होणारे सर्वच कार्यक्रमाना मला मान दिला जातो तालुक्यातील जनता राष्ट्रवादी कार्यकर्ते साहेबांवर करीत असलेले प्रेम पाहून मन भारावून जाते ९ )तालुक्याचा विकास हाच ध्यास असल्याने साहेबांचा दिवस पहाटे ५ वाजेपासून सुरु होतो  तर रात्री १२ वाजेपर्यंत न थकता काम करत असतात त्यामुळे माझे हि कामाची वेळ मी बदलून घेतली आहे . १०)  घरात कुणीही आजारी असल्याचे समजले तर साहेब सर्व कामे सोडून त्याची काळजी घेतात , मात्र त्यांना बरे नसले कि ते सर्व कुटुंबाना जवळ बोलावून गप्प मारतात त्यातच त्यांचा आजार दूर पळून जातो ….सोबत फोटो पाठवीत आहे

Wednesday, June 11, 2014

अकोले ता:११
सागाची शेती व्यापारी तत्वावर करणे आधुनिक युगात क्रमप्राप्त ,तितकेच अपरिहार्य ठरले आहे . पण या शेतीत केलेली गुंतवणूक आणि त्या तुलनेत ( दीर्घ काळानंतर ) सुरु होणारा उत्पन्नाचा काळ पाहता सागशेतीत खरी कसोटी मानसिक आणि आर्थिक गुंतवणुकीचीच  लागते,असे म्हटल्यास वावगे ठरू नये . नगर जिल्ह्यात व्यापारी तत्वावर सागाची शेती करणारा शेतकरी तसा दुर्मिळच . या शेतीत काही लाखांमध्ये केलेली गुंतवणूक शेतकऱ्याला उत्पन्न सुरु झल्यावर किती तरी जास्त पट  फायदा देते, हे खरेच. एक-दोन नव्हे ,तब्बल आठ-दहा वर्ष आपल्या मानसिकतेचे यात कसोटी असते . त्यामुळेच मंग आपल्या भागात सागाची शेती फुल्ली आहे ,हेच आपणा  साठी दुष्प्राप्य ठरणारे उदहरण …
                      या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजूरचे ध्येयवेडे  शेतकरी प्रकाशशेठ सुमतिलाल  शहा यांनी दोन एकर जमिनीत केलेली सागाची शेती मैलाचा दगड ठरावा. राजूरच्या ओसाड माळरानावर,शहा यांनी कोल्हार-घोटी मार्गालगत आपल्या 'स्वप्नातल्या शेतीची ' मुहूर्तमेढ रोवली . सुमारे १५  वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याने चांगलेच बाळसे धरले आहे .
                     सागाची शेती करण्यापूर्वी  त्यांचा या जमिनीत उडिद ,खुरासणी, टोमॉटो,  ज्वारी हि खरिप पिके घेण्याचा त्यांचा परिपाठ राहत असे परंतु जमिनीतील उभ्या पिकांना होणारा जनावरांचा उपद्रव त्यांना स्वस्त बसू देत नव्हता. त्यातूनच त्यांनी सागाच्या शेतीचे लाख मोलाचे स्वप्न पहिले आणि त्या दिशेने धडाक्यात  प्रयत्नही आरंभिले व वन अधिकारी ए.एन. कदम सत्यानिकेतन संस्थेचे सचिव एम. एल. मुठे , जोशी तसेच कृषी खात्यातील जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या शिदोरी वर प्रकाश भाऊ शहा यांनी सागाच्या शेतीस उपयुक्त माहिती मिळविणे सुरु केले संगमनेर ,शहापूर, नाशिक येथून त्यांनी सागाचे "स्टम्प" प्राप्त केले त्यात कोकणी कलम केलेले  स्टम्प आणून लावले दोन हजार २०० स्टम्प लावले त्यातील दीड एक हजार झाडे जगली सागाची झाडे ३०  फुटांपेक्षा अधिक उंचीची झाली आहेत. १५  वर्षात ही  मजल गाठली आहे. लगेच सागाचे लाकूड विकण्यास त्यांची घाई   नाही. उलट आणखी एवढाच काळ  थांबावयास प्रकाश भाऊ तयार आहेत. तोपर्यंत म्हणजे आणखी काही  वर्षांनी सागाच्या लाकडाला मिळणारा दणदणीत भाव काय आणि किती नफ्याचे  माप त्यांच्या पारड्यात टाकेल,त्यांची कल्पना केलेली बरी! त्यावेळी सागाला भला थोरला भाव  मिळेलच मिळेल . आजची गुंतवणूक ही  भविष्याची , स्वप्नवत वाटणारी परंतु त्याला वास्तवाची कृतार्थ गुरुकिल्ली आहे . प्रकाश भाऊ यांनी हे स्वप्न पहिले आणि  त्यांनी आज मारलेली मजल , हा प्रयोग आणि त्यातील आर्थिक गणिताचा मतितार्थ या दृष्टीने ही  शेती करू पाहणार्यांसाठी नवा उर्जा स्तोत्र नक्कीच ठरावा… चौकट >>>>तीस वर्षाचा उत्पन्नाचा आलेख सागाच्या तयार झाडाचे पाच दहा वर्षे "मार्केटिंग "करायचे ठरविल्यास त्याची किमत सुमारे दीड लाख असेल त्यानंतर१० ते २० वर्षानंतर   ५ते७  लाख रुपये प्राप्ती होण्याची शक्यता असल्याचे वनविभागाचे एस . व्ही साळुंखे , आर . जी सागभोर , व जाणकारांचे मत आहे वन विभाग सागाची लागवड करीत नाही किंबहुना ते परवडणारे नाही राजूर विभागात सागाची लागवड करणारे प्रकाश उर्फ भाऊ हे  शेतकरी आहे . <<<<<<,
                       कोल्हार- घोटी रस्त्यावरून भंडारदरा  कडे जाताना २ एकरांत फुललेली ही  सागाची शेती प्रवासी , पर्यटक आणि शेतकऱ्यांना तिथे मोठ्या मेहनतीने रुजलेल्या लाख मोलाच्या प्रयोगाची महती देते .पूर्वी म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी अकोल्याचा आदिवासी भाग सागाच्या डेरेदार वृक्षराईने नटून , फुलून गेलेला दिसे . परंतु जंगल तोड , वन खात्याची उदासीनता यामुळे या वृक्षराईला जणू ग्रहण लागले आज तर सागाची झाडे  शोधायची या भागात स्पर्धाच लावावी लागेल , अशी स्तीथी आहे. त्यामुळेच राजुर सारख्या ठिकाणी तेही मध्य वस्तीत फुललेली सागाची शेती पहावयास मिळणे कौतुकाची बाब ठरते. सोबत फोटो akl ११ p ९