भंडारदरावासियांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या जल्लोषात स्वागत केले .हीगर्दी १जानेवारीलाही टिकून होती
राजूर, ता . २:भंडारदरा येथे थर्टी फस्टच्या रात्री गर्दिचे सर्व
प्रकारचे उच्चांक मोडीत निघाले असुन भंडारद-यापासुन ते सांधनदरीपर्यंतचा
सर्व परिसर मुंबई पुण्याच्या पर्यटकांनी बहरुन गेला होता .२०१८ सालाचे
मुंबईकर व पुणेकरांच्या साक्षिने भंडारदरावासियांनी फटाक्यांची आतषबाजी करत
मोठ्या जल्लोषात स्वागत केले .हीगर्दी १जानेवारीलाही टिकून होती
विक एंडच्या सुट्टीत थर्टी फस्ट आल्यामुळे भंडारद-यात मोठ्या प्रमाणात
गर्दी होण्याची लक्षणे नाताळाची सुट्टी लागल्यापासुनच मिळण्यास सुरुवात
झाली होती . त्यात ३१ तारखेला सकाळी ९ वाजल्यापासुनच पर्यटकांचे जथ्थे
भंडारद-याच्या दिशेने पावलं टाकताना दिसायला लागली होती . शेंडी गावाला
त्यातच आठवड्याचा बाजार आणि त्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबई व
पुण्याची आलेली पाहुण्यांची गर्दी बघुन जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते .
अनेकांनी हेलिकॉप्टरमध्ये हवेत गिरक्या घेत कळसुबाईपासुन ते भंडारदरा धरण,
रतगडाचा गडकोटाची सफर केली . त्यातच भंडारद-याचा अंब्रेला फेसाळताना बघुन
कित्येक पर्यटक त्या अंब्रेलाचे तुषार झेलण्याचा प्रयत्न करत होते. जसजसा
दिवस मावळतीला जात होता तसतसा भंडारदरा जलाशयाच्या आसपासचा परिसर तंबुमय
होत गेला . रिंगरोडवरील प्रत्येक गावच्या अवतीभवती सुरक्षेच्या दृष्टीने
अनेक निसर्गप्रेमी सभोवतालीच कापडी तंबुचा डेरा टाकताना आढळुन आली . रात्री
बारा वाजेपर्यंत अनेक जण तंबुभोवती केलेल्या शेकोटीचा आधार घेत बारीक
आवाजातील साउंड सिस्टमवर थिरकताना आढळुन आली . बारा वाजेच्या सुमारास
कळसुबाई अभयारण्याचा परिसर वगळता भंडारदरा जलाशयाच्या परिसरात फटाक्यांची
रंगीत आतषबाजीने करत कित्येक पर्यटकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले .
जवळजवळ तिन ते साडेतीन हजार परिसरात कापडी टेंट उभारले गेले होते . तर
शेंडी ( भंडारदरा ) परिसरात अनेक मोठमोठ्या हॉटेलसने पांरपारीक नृत्य
सादरीकरणावर भर दिला . तर ब-याच ठिकाणी ही थर्टीफस्टची मंडळी बुफे जेवणावर
ताव मारताना आढळुन आली . भंडारद-यातील तरुणांनी सोशल मिडीयाचा व
नेटवर्किंगचा सहारा घेत पर्यटकांना तंबु निवासाची सोय करुन दिल्यामुळे
त्याच्याही हाताला बेकार राहण्यापेक्षा हाताला यामुळे काम मिळुन आल्याने
त्यांच्या तोंडावर कुठतरी समाधान आढळुन आलं .
भंडारद-यात थर्टी फस्टच्या रात्री झालेली गर्दी बघताना फक्त पावसाळ्यात
भंडारदरा चांगला असं म्हणणा-यांना एक प्रकारची चपराकच बसली असुन आता बाराही
महिने पर्यटक भंडारद-याला भेट देण्यास उस्तुक असतात . ईतर पर्यटन
स्थळांच्या मानाने भंडारदरा आता या निसर्गप्रेमींना सुरक्षित वाटत आहे .
तरी पण भंडारद-याला येणा-या या पर्यटकांनी निसर्गाचा समतोल बिघडणार नाही
याचं कुठतरी भान ठेवणं गरजेचे आहे . त्यांनी बरोबर आणलेले खाद्यपदार्थांचा
कचरा , रिकाम्या पाणी बाटली आजुबाजुला कोठेही न टाकता त्याची विल्हेवाट
लावली तरच भंडारद-याचं सौंदर्य टिकुन राहण्यास मदत होणार आहे .
वनविभागाकडुन रात्रभर डी डी पडवळे यांच्या नेतृत्वाखाली अभयारण्यात
रात्रीची गस्त आढळुन आली तर भंडारदरा धरणावर शाखाधिकारी रांजेंद्र कांबळे
यांनी चोख बंदोबस्त बजावला . राजुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक पी वाय
कादरी यांनी कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही यावर जातीनं लक्ष टाकलं .
त्यामुळे भंडारद-याचा थर्टीफस्ट तरी शांततेत गेल्याने सर्वानी सुटकेचा
श्वास टाकला .
चौकट [ भंडारदरा धरणाच्या आजुबाजुला
अनेक बेरोजगार तरुणांनी कापडी तंबुंचा आधार घेत पर्यटकांची सोय केली होती .
मुंबई पुण्याचा पर्यटक स्वच्छतेसाठी माहीर असला तरी वेळ थर्टीफस्टचीची
असल्याने ईतरत्र थोड्याफार प्रमाणात अस्ताव्यस्त कचरा तयार झाला होता . या
कच-याला आपण च जबाबदार आहोत असं समजुन शेंडीतील दयाराम भांगरे , शुभम काळे ,
अजित भांगरे व किरण भांगरे यांच्या समुहानू संपुर्ण कचरा स्वच्छ केला .]फोटो RJU २प १२
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home