Thursday, February 13, 2025

करवंद

 अकोले , ता . १८:कोकिळेची कुहुकुहुऽऽ जेथे सुरू असते. त्या ठिकाणी तुमचे सहज लक्ष जाईल. येथेच तोरणांचे माणिक-मोती तुमच्यासाठीच वाट पाहत असतील. तोरणे म्हणजे साखरेच्या पाकातले रसगुल्लेच..सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये एव्हाना रानमेव्याच्या खजिन्याची ताटे भरू लागली आहेत. त्याच्या दरबारात जायचे असेल तर ‘मी’ पणा सोडायला हवा. काटय़ांचा आणि दगडांचा रोष मानून चालणार नाही. कुठची फांदी तुम्हाला अडवेल हे सांगता येणार नाही. तिला थेट सामोरे गेलात तर परिणाम भयानक होतील. त्या फांदीची हळुवार समजूत काढावी अथवा तलवार चालविल्याप्रमाणे हातातील शस्त्र चालवावे म्हणजे वाट मोकळी होईल. पण पाऊल जपून, कारण हे जंगल त्यांचं असतं, येथे फिरणाऱ्या प्राण्यांचा त्यावर हक्क असतो. आपण पाहुणे असतो, काही क्षणाचे! पावलापावलावर याचे भान ठेवून भल्या पहाटे सुटावे जंगलात

काटेरी फांद्यांवर पाचूंप्रमाणे हे पांढ-या द्राक्षांचे घोस लगडलेले असतात. ही फळे चवीला फारच छान असतात. परंतु, ती मिळविताना काटय़ांचा विचार करावा लागतो. तोरणांच्या जाळय़ांप्रमाणेच हिरवे, पिवळे वाटाणेच काही झाडांवर पैंजन अडकवल्याप्रमाणे लोंबकळत असतात. हिला आटकन म्हणतात. तीही याच कुळाचारातली. फक्त चव आंबट-गोड..
सह्याद्री पार करायचा तर करवंदांना अव्हेरून चालणार नाही. माघ महिन्यापासूनच त्यांची लगबग सुरू होते. आता परिपक्व झालेली करवंदे रंग बदलू लागली आहेत. आंबट-गोड करवंदांचा आस्वाद पुढील पंधरा दिवसांपासून सुरू होईल. डोंगरची काळी मैना तिला का म्हणतात हे डोंगरात फिरत-फिरत रानातल्याच एखाद्या पानाचा खोला करून (पानाचा द्रोण) त्यात ती घ्यावीत आणि मनाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा.
आता या करवंदांचा हिरवा साज पाहायला मिळतो. खिरमटीच्या थाळीत केव्हा-केव्हा यांच्याही उभ्या-आडव्या भेशी पडतात. असं म्हणतातहिरडय़ांमधून येणारे रक्त करंवदं खाताच चटकन बरेही होते.  आताशी भ्रमंती करायची तर भूक क्षमविण्याचा प्रश्नच नाही. सह्याद्रीच्या भ्रमंतीत मीठ, मसाला, चवीपुरते गूळ घेतले म्हणजे झाले. बाकी काही नको. आपली जीभ भली की आपण.. खायचे किती आणि कसे हेच समजत नाही. सोबत फोटो akl १८p १,२ कोकीळ  व करवंदे म्हणजेच डोंगरची काळी मैना 

Monday, January 27, 2025

संपणार का फरफट माझ्या डामसेवाडीची....?

 संपणार का फरफट माझ्या डामसेवाडीची....?


आदिवासीन्नी सुविधान्ची मागणी करावी की नाही हा प्रश्न तरी आम्ही विचारावा की नाही? 


माझे मूळ गाव अकोले तालुक्यातील शेणित हे आहे. त्यामुळे या गावचा इतिहास, भूगोल यांच्याशी माझी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे येथील प्रत्येक घटना ही माझ्या अस्मितेचा भाग आहे असे मला वाटते. इतकी जाणीव तर आपण आपल्या मातीची ठेवली पाहिजे हे संस्कार आहेत आपल्याच महाराष्ट्र भूमीचे....!


एकीकडे विकासाचे अपचन व्हावे इतका निधी खर्च केला जात आहे, तर दुसरीकडे अकोले तालुक्यातील संघर्षमय ऐतिहासिक वारसा असणारी डामसेवाडी आज उपेक्षित का? असा प्रश्न माझ्या मनाला पडला आणि त्याविषयी आपण लिहिलेच पाहिजे म्हणून थोडासा प्रयत्न केला....


शेणित येथील डामसेवाडी ही अकोले तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि संघर्षशील वाडी आहे, जी आदिवासी अस्मितेचे प्रतीक मानले जाते.( ज्याला इतिहास माहीत आहे, तो हे मान्य केल्याशिवाय राहत नाही) या वाडीने पेशवे, ब्रिटिश आणि इतर सत्ता व्यवस्थांशी संघर्ष करत आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी झुंज दिलेली आहे. आजही डामसेवाडीचा इतिहास महानायक राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडासाठी ओळखला जातो. या भूमीने आदिवासींच्या आत्मसन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी उभ्या केलेल्या संघर्षांला जिवंत ठेवण्याचे काम करून अकोले तालुक्यातील आदिवासिंवर उपकार केलेले आहेत असे मला वाटते. परंतु दुर्दैवाने याचे भान आजच्या प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेला नाही असेच म्हणावे लागेल. 


महानायक राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या बंडाला आवश्यक असणारी रसद या वाडीतील लोकांनी जीवावर उदार होऊन पुरवली. त्यातून प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक गावांतून लोकं पुढे आली व त्यांनी महानायक राघोजी भांगरे यांच्या लढ्याला बळ दिले. यातून प्रेरणा घेऊन अनेक आदिवासी क्रांतिकारक निर्माण झाले.


बाडगीची माची ते डामसेवाडी हा परिसर आदिवासी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना जागृत ठेवण्याचे काम करत आहे. परंतु दुर्दैवाने आपण आपल्याच या ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व असणाऱ्या या वाडीला न्याय देण्यात कमी पडत आहोत. 


डामसेवाडीतील समाज बांधवांनी ब्रिटिशांच्या  जंगलसंपत्तीच्या शोषणाविरोधात शेणित येथे सन 1930 साली उभारलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्याचेच फलीत म्हणून ब्रिटिशांच्या फोरेस्ट ऍक्टमध्ये आदिवासीन्ना विशेष सवलती देण्यात आल्या. 

जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठीचा हा आदिवासींचा लढा हा राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याचा महत्त्वाचा भाग होता.


डामसेवाडीने अनेक संघर्षांचा सामना करून आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि नैसर्गिक अस्तित्वाचे संरक्षण केले आहे याचे भान येथील प्रशासकीय व राजकीय यंत्रणेने ठेवणे आवश्यक आहे. 


इतिहासाच्या दुर्लक्षित पानांत डामसेवाडीचा उल्लेख असतानाही आज उपेक्षित आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना या वाडीला विकासाच्या प्राथमिक सुविधाही मिळालेल्या नाहीत. असे असताना आम्ही कोणत्या विकासाचा बडेजाव मिरवत आहोत असा मला प्रश्न पडतो. 


डामसेवाडीतील प्रमुख समस्या: 


1. पिण्याच्या पाण्याची कमतरता

डामसेवाडीत शुद्ध पाण्याचा अभाव आहे. महिलांना आणि वृद्धांना पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागते. पावसाळ्यात धो धो कोसळणारा वारा व अंगाला झोम्बणारी थंडी, त्यात सोसाट्याचा वारा असताना दुरवरून डोक्यावर हंड्यात पाणी वाहून आणावे लागते. प्रत्येक घराला पिण्याचे स्वच्छ पाणी ही नरेंद्र मोदी यांची घोषणा अजूनही कागदावरच आहे की काय असे या वाडीत आल्यावर दिसून येते. 


2. रस्त्यांची दुरवस्था : 

शेणीत येथील डामसेवाडीपर्यंत जाणारा रस्ता उखडलेला आहे. अपुरा रस्ता विकास व संपर्क साधनांची कमतरता ही गावातील मोठी समस्या आहे. 


3. गटार व्यवस्थेचा अभाव

डामसेवाडीत गटारांची कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.


4. वृद्धांसाठी केंद्राचा अभाव : 

डामसेवाडीत वृद्धांसाठी कोणतेही विरंगुळा केंद्र नाही. त्यांना वेळ घालवण्यासाठी आणि आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. का आदिवासी भागातील वृद्धान्ना सन्मानाणे जगण्याचा अधिकार नाही का? 


5. आरोग्य सुविधा अपुऱ्या

डामसेवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध नाही. कोणतीही आरोग्य समस्या उद्भवली तर लोकांना शेणित गावात जावे लागते. चांगला व पुरेसा रस्ता नसल्याने रात्रीच्या वेळी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. 


सरकारकडे मागण्या : 

डामसेवाडीच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथील लोकं पुढील मागण्या करत आहेत, पण दुर्दैवाने आपले सरकार त्याकडे लक्ष्य देत नाही....


1. पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना : 

गावात पाणीपुरवठा योजना राबवली जावी आणि जलसंधारण प्रकल्प उभारले जावेत.


2. रस्त्यांचा विकास : 

शेणीत येथून डामसेवाडीपर्यंतचा रस्ता पक्का आणि सुलभ करावा.


3. गटार व्यवस्थापन सुधारणा : 

गटारांचे योग्य व्यवस्थापन करून गावातील स्वच्छता राखली जावी.


4. विरंगुळा केंद्रांची निर्मिती : 

वृद्ध आणि महिलांसाठी विरंगुळा केंद्र व लहान मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.


5. आरोग्य सुविधा निर्माण : 

डामसेवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून वैद्यकीय सेवा पोहोचवावी. फिरते वैद्यकीय पथक नेमणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वृद्ध, गरोदर माता व महिला यांच्या आरोग्याची वेळीच काळजी घेता येईल. 


6. शिक्षणाचा दर्जा उंचावणे : 

गावात उच्च दर्जाचे शिक्षक, प्रयोगशाळा आणि वाचनालय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.


जागतिक पातळीवर सरकार आपल्या विकासाची जाहिरात करत असताना अकोले तालुक्यातील डामसेवाडीतील लोकांना सरकारकडून दुर्लक्षित का केले जात आहे? हा अगदी साधा प्रश्न माझ्या मनात येतोय...


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, डामसेवाडीला मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकार आता तरी पावले उचलणार का? 


आदिवासींच्या संघर्षाचा इतिहास जागतिक आदिवासी दिनाला डोक्यावर घेऊन मिरवणारे आपण त्यांचा वर्तमान का विसरतो? 


डामसेवाडी हा फक्त इतिहासाचा एक भाग नाही, तर आजही संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. डामसेवाडीतील लोकांचा प्रश्न हा फक्त त्यांचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. सरकारने आणि प्रशासनाने या वाडीच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. डामसेवाडीतील लोक माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यांना न्याय मिळवून देणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारीच नाही, तर नैतिक कर्तव्यही आहे. ही नैतिकता जोपासण्याची जबाबदारी कोणाची? 


- एक शेणितकर 


( फोटो : नामदेव डामसे यांनी सोशल मीडियातून पोस्ट केलेले आहेत) 


#डामसेवाडी #आदिवासीसंघर्ष #न्यायाचीप्रतिक्षा 

#अकोलेविधानसभा



Friday, January 17, 2025

बापू जन्म दिवस

 अकोले,ता.१७:  अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ३७ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून व श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे त्यांनी शाळाबाह्य होऊ नये ही  मनात  उर्मी असणारे शांताराम बापू काळे  यांचा ५९वा वाढदिवस  आज ५ऑगष्ट २०२४ रोजी आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच राजूर येथिल  लक्ष्मण काळे गुरुजी व गंगुबाई यांचे ते चिरंजीव ५बहिणी ३भाऊ असे त्यांचे कुटुंब वडील शिक्षक त्यांना तोटका पगार त्यामुळे इयत्ता सातवी पासून बापू रोजगाराच्या शोधात कधी दुष्काळी कामावर तर कधी बाजारहाट ,यात्रा,मध्ये किराणा मालाची विक्री तर कधी फोटो स्टुडियो मध्ये काम त्यांनी कामाची कधी लाज बाळगली नाही सतत काम व शिक्षण घेत त्यांनी सायकलवर वृत्तपत्र विक्रीचे काम केले त्यातून शिक्षण घेतले तर विमा विकास अधिकारी उत्तम जगधने यांनी त्यांची जिद्द व चिकाटी पाहून त्यांना विमा प्रतिनिधी केले त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर वृत्तपत्र विक्री करताना पत्रकारिता देखील त्यांनी सुरू केल्याने विमा व्यवसायातून आर्थिक प्रश्न मार्गी लागले तर पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी चे संस्कार रुजवत त्यांचा अविरत पणे प्रवास सुरु झाला तो आजपर्यंत न थकता पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक ,दूध उत्पादक,बेरोजगारी, अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला  प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी पदावर तर काही व्यवसायात प्रवीण आहेत  श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी १९९२ ला मुलींचे विधालय सुरु केले तर इंग्रजी शाळा , उच्च माध्यमिक विधालय , हरीशचंद्र गडाच्या पायथ्यशी मवेशी या गावात विधालय सुरु करून तेथील विधार्थी राज्य व देश पातळीवर चमकविले ३६ कर्मचारी त्याच्या संस्थेत काम करीत असून अनेक अडचणी, खोटे आरोप  व संकटे आजही अंगावर घेत त्याचा प्रवास सुरु आहे . माजी मंत्री मधुकर पिचड हे त्याच्या कामाचे नेहमी कौतुक करतात .  कुणावरही व कोणताही प्रसंग असू ते मदतीला धावून जातात हा त्याचा स्थायी स्वभाव आहे  ठाकरवाडी येथील आदिवासी गतिमंद महिला बिट्टी,तिचा दोन वर्षांचा मुलगा यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकून त्यांच्या जगण्याचे सार्थक केले तर बांगर वाडी येथील वृद्ध महिलेस सरकारी पेन्शन सुरू केली,कौठवाडी येथील वनिता भांगरे हिची शिक्षणासाठी पायपीट हे वृत्त प्रसिद्ध करून महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येऊन हे कुटुंब सावरले  आज वनिताचे वडील परबत आई  भामाबाई यांना सरकारी पेन्शन सुरू असून कुटुंबाला घरकुल मिळाले आहे .तर वनिताला मोफत नर्सिंग साठी प्रवेश मिळाला आहे .हे सर्व बापू मुळे झाले हे विशेष  बापू  तर हे एक वादळ आहे . या वादळाला क्षमविण्याचे काम म्हणजे शांत करण्याचे काम आमच्या वहिनी  सौ . मंजुषाताई काळे करतात त्या प्राचार्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात सेवेत असून त्याने गरीब आदिवासी मुलींना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाचे कवाडे उघडून दिली आहेत  बापूना  गेली ३२ वर्षे खंबीरपणे साथ देणाऱ्या व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून समर्पित जीवन जगणाऱ्या या उभयंतास  नगर जिल्हा तेली समाजच्या वतीने  वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ...  त्याचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख समाधानाचे जावो ... अनिल काळे

Monday, January 6, 2025

पत्रकारिते पुढील आव्हाने

कठीण काळातही तग धरणारी पत्रकारिता. पत्रकारिता हा समाजाचा आधारस्तंभ असून, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा व्यवसाय आहे. सत्य, पारदर्शकता, आणि जबाबदारी यांसाठी पत्रकार अविरत प्रयत्नशील असतात. मात्र, सध्याच्या बदलत्या काळात पत्रकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते—फेक न्यूजचा धोका, राजकीय दबाव, आर्थिक अस्थिरता, आणि शारीरिक सुरक्षा यांसारख्या अडचणींमुळे पत्रकारितेचे कार्य अधिक कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार दिन साजरा करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून पत्रकारांच्या कष्टांना आदर दिला जाईल, त्यांच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण होईल, आणि पत्रकारितेच्या महत्त्वाचा समाजाला पुनःप्रत्यय येईल. हा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण, सत्य शोधण्याच्या त्यांच्या संघर्षाला पाठिंबा, आणि पत्रकारितेच्या नैतिकतेवर भर देण्याची प्रेरणा देतो. पत्रकार दिन हा केवळ साजरा करण्याचा नाही, तर पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न आहे. पत्रकारिता शाबूत राहण्यासाठी पुढील उपाय महत्त्वाचे ठरू शकतात: 1. स्वतंत्रता आणि पारदर्शकता राखा पत्रकारांनी कोणत्याही राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक दबावाखाली न येता सत्य मांडले पाहिजे. 2. सत्यशोधन आणि जबाबदारी योग्य तपासणी करून सत्य मांडण्याचा प्रयत्न करावा. चुकीची माहिती देणे किंवा अपप्रचार पसरवणे टाळले पाहिजे. 3. मीडिया संस्थांची स्वायत्तता मीडिया संस्थांनी सरकार किंवा मोठ्या उद्योगसमूहांच्या प्रभावापासून मुक्त राहिले पाहिजे. 4. प्रशिक्षण आणि कौशल्यविकास पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, आणि तपासणीचे तंत्र शिकले पाहिजे, जेणेकरून त्यांचे काम अधिक परिणामकारक होईल. 5. सुरक्षेची हमी पत्रकारांची शारीरिक आणि मानसिक सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे, विशेषतः ज्या भागांमध्ये त्यांना धमक्या किंवा हिंसाचाराचा सामना करावा लागतो. 6. कायदेशीर संरक्षण आणि समर्थन पत्रकारांना त्यांच्या कामासाठी कायद्याचे संरक्षण मिळायला हवे. तसेच, त्यांच्या विरुद्ध दाखल होणाऱ्या खोट्या प्रकरणांवर त्वरित कारवाई केली पाहिजे. 7. लोकजागृती आणि समर्थन नागरिकांनी सत्य पत्रकारितेचे महत्त्व ओळखले पाहिजे आणि तिला पाठिंबा दिला पाहिजे. 8. नैतिकता आणि मूल्यांचे पालन पत्रकारांनी नैतिकता, निष्पक्षता, आणि प्रामाणिकपणाचे पालन करणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजाचा त्यांच्यावर विश्वास राहील. या सर्व उपायांमुळे पत्रकारिता मजबूत आणि सत्यनिष्ठ राहण्यास मदत होईल. आजची पत्रकारिता अनेक आव्हानांना आणि समस्यांना सामोरी जात आहे, पण तिच्यात काही सकारात्मक बदलही दिसून येत आहेत. खाली पत्रकारितेच्या सध्याच्या स्थितीचे प्रमुख पैलू मांडले आहेत: 1. सकारात्मक बाजू • तंत्रज्ञानाचा प्रभाव: डिजिटल माध्यमांमुळे माहिती वेगाने पोहोचवणे शक्य झाले आहे. विविध प्लॅटफॉर्म्सवरून लोकांना सहज माहिती मिळते. • सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित: काही पत्रकार आणि संस्थांकडून पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता, आणि सामाजिक न्यायासारख्या महत्त्वाच्या विषयांवर काम केले जात आहे. • डेटा-जर्नालिझमचा उदय: माहितीची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी डेटा-आधारित पत्रकारिता महत्त्वाची ठरत आहे. 2. नकारात्मक बाजू • पक्षपातीपणा: अनेक प्रसारमाध्यमांवर राजकीय किंवा आर्थिक दबाव असल्यामुळे निष्पक्ष पत्रकारिता कमी होत आहे. • फेक न्यूजचा वाढता धोका: सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्यामुळे सत्य शोधणे कठीण झाले आहे. • टीआरपीचा हव्यास: काही माध्यमं दर्जेदार बातम्यांपेक्षा सनसनाटी आणि मनोरंजनात्मक सामग्रीवर भर देतात. • पत्रकारांच्या सुरक्षिततेचा अभाव: अनेक पत्रकारांना त्यांच्या कामासाठी धमक्या, हिंसा, किंवा न्यायालयीन त्रास सहन करावा लागतो. • ग्रामीण भागाची उपेक्षा: ग्रामीण आणि आदिवासी भागातील समस्या माध्यमांमध्ये तुलनेने कमी मांडल्या जातात. 3. भविष्यातील आव्हाने • स्वतंत्रता टिकवणे: सरकार आणि मोठ्या उद्योगांपासून स्वतंत्र राहणे हे मोठे आव्हान आहे. • सत्यशोधन आणि तपासणी पत्रकारिता: खोट्या बातम्यांशी लढण्यासाठी तपासणी पत्रकारिता महत्त्वाची ठरेल. • तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. 4. परिणाम आणि गरजा • लोकांचा माध्यमांवरील विश्वास परत मिळवण्यासाठी पत्रकारितेला सत्य, पारदर्शकता, आणि जबाबदारीची गरज आहे. • नैतिक पत्रकारिता आणि स्वतंत्र विचार हेच समाजाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकतील. आजची पत्रकारिता तांत्रिकदृष्ट्या प्रगत असली तरी ती अनेक आव्हानांनी ग्रस्त आहे. या आव्हानांवर मात करून पत्रकारितेने पुन्हा विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. तुमचा पत्रकार असल्याचा अभिमान अगदी योग्य आहे, कारण पत्रकारितेचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे आहे. खाली तुम्हाला अभिमान वाटण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत: 1. लोकशाहीचा चौथा स्तंभ • पत्रकारिता ही लोकशाहीचे संरक्षण करणारी महत्त्वाची शक्ती आहे. सत्य, पारदर्शकता, आणि जबाबदारी यांची जाणीव समाजाला करून देणारा तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात. 2. सत्यासाठी लढा • तुम्ही खऱ्या घटनांची, अन्यायाची आणि दुर्लक्षित आवाजांची कहाणी जगासमोर आणण्याचे काम करता. सत्य मांडण्यासाठी घेतलेला हा प्रयत्न खूप मोठा आहे. 3. समाज बदलाचा भाग • तुमच्या बातम्यांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात. भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय, आणि अनैतिक गोष्टींना वाचा फोडून तुम्ही समाज सुधारायला मदत करता. 4. आवाज रहितांना आवाज • वंचित, दुर्लक्षित, आणि आवाज दडपलेल्या लोकांचे प्रश्न जगासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करता. 5. जोखीम पत्करणारी भूमिका • अनेक वेळा पत्रकारांना मोठ्या जोखमींचा सामना करावा लागतो. तरीही तुम्ही धैर्याने काम करता, हे तुमच्या समर्पणाचे प्रतीक आहे. 6. ज्ञानवृद्धी आणि समाजजागृती • लोकांना विविध विषयांवर माहिती देऊन त्यांना अधिक सुजाण नागरिक बनवण्याचे काम तुम्ही करता. 7. इतिहास घडवण्याचे साधन • पत्रकार हे इतिहासाचे पहिले साक्षीदार असतात. भविष्यातील पिढ्या तुम्ही मांडलेल्या घटनांवर विश्वास ठेवतील आणि त्यातून शिकतील. 8. प्रभावशाली व्यासपीठाचा भाग • लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारितेपेक्षा प्रभावी माध्यम क्वचितच आहे. तुम्ही तुमच्या कामातून जनमत घडवू शकता. 9. स्वातंत्र्य आणि जबाबदारीचे प्रतीक • पत्रकार म्हणून तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार आहात, ज्यामुळे लोकांच्या विचारांना आणि मतांना मार्गदर्शन होते. 10. मानवी हक्कांचे संरक्षण • मानवाधिकार उल्लंघन, अत्याचार, आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणे हे तुमचे कर्तव्य आहे, ज्यामुळे तुम्ही समाजात चांगले मूल्य निर्माण करता. पत्रकार असणे म्हणजे एक जबाबदारीपूर्ण आणि सन्माननीय भूमिका निभावणे. तुमच्या कार्यामुळे समाज अधिक जागरूक, न्यायप्रिय, आणि प्रगत होतो. यासाठी तुमचा अभिमान बाळगणे योग्यच आहे! भारतासाठी काही आकडेवारी : • मीडिया उद्योगाचा विस्तार: भारतीय मीडिया उद्योग वेगाने वाढत आहे. 2017 मध्ये, या उद्योगाने 13% वाढ नोंदवली, ज्यामुळे त्याचे मूल्य USD 22.54 अब्ज (INR 1.50 ट्रिलियन) झाले. 2020 पर्यंत, या उद्योगाचे मूल्य USD 30.6 अब्ज (INR 2 ट्रिलियन) पर्यंत वाढण्याची अपेक्षा होती, ज्यासाठी 11.6% वार्षिक वाढ दर (CAGR) आवश्यक होता. • प्रकाशनांची संख्या: भारतामध्ये 70,000 पेक्षा अधिक वृत्तपत्रे आणि 690 उपग्रह चॅनेल्स (ज्यापैकी 80 वृत्तवाहिन्या आहेत) कार्यरत आहेत. यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा वृत्तपत्र बाजार आहे. • पत्रकारितेची स्थिती: 2006 मध्ये, भारताचा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 105 होता, जो 2019 मध्ये 140 वर घसरला. 2022 मध्ये, 180 देशांच्या यादीत भारताची स्थिती आणखी घसरली आहे. जागतिक आकडेवारी : • पत्रकारांच्या सुरक्षिततेची स्थिती: 2022 मध्ये, जगभरात 57 पत्रकारांची हत्या झाली, म्हणजे दर पाचव्या दिवशी एका पत्रकाराचा मृत्यू झाला. • प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक: 2023 मध्ये, भारताचा जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 161 व्या स्थानावर घसरला आहे, ज्यामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. • पत्रकारांचे निर्वासन: 2024 मध्ये, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या अंदाजे 310 पत्रकारांना धमक्यांमुळे त्यांच्या देशातून पलायन करावे लागले, ज्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण होतात. संदीप काळे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया मुंबई, भारत. 9890098868

Thursday, December 26, 2024

ऐसा नेता होणे नाही

मधुकरराव पिचड राजूरच्या एका शिक्षकाच्या घरात जन्मलेला एक मुलगा ज्याला स्वतःची जन्मतारीख सुद्धा माहीत नव्हती त्यामुळे ते 1 जून ही कॉमन जन्मतारीखच लावत असत त्या मधुकरराव पिचड यांचे आयुष्य हा एक खरेचच अचंबित करणारा प्रवास होता. एक साधारण आदिवासी मुलगा कुठल्याही पार्श्वभूमीविना केवळ स्वकर्तृत्वाने देशातील सर्वात महत्वाच्या आदिवासी नेत्यांपैकी एक बनतो, महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्य फळीतील नेता बनतो ही खरेच आश्चर्याची बाब आहे. पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण घेत असलेल्या मधुकरराव पिचड यांना तिथेच विद्यार्थी नेत्याच्या रूपाने राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यानंतर तालुक्यात आल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून घेतले. सत्तरच्या दशकात पंचायत समिती सदस्य व सभापती म्हणून सुरू झालेली त्यांची राजकिय कारकीर्द सलग सात वेळा म्हणजे जवळजवळ 35 वर्षे तालुक्याचा आमदार तसेच विविध महत्वाची कॅबिनेट मंत्रीपदे भूषविण्यात व्यतीत झाली. 1978 च्या पहील्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागून थेट चौथ्या स्थानी फेकले गेलेल्या मधुकरराव पिचड यांनी दोनच वर्षांनी 1980 मध्ये विधानसभा जिंकून त्यानंतर सलग 7 वेळा निवडून येत तब्बल 35 वर्षे एकहाती विधानसभेत अकोले तालुक्याचा व आदिवासी जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडला. राजूर येथे तालुक्यातील पहिले दूध संकलन केंद्र त्यांनीच सुरू केले. त्या केंद्रात पहील्या दिवशी केवळ 30 लिटर दुध जमा झाले होते. पण संथ सुरुवात असली तरी ही अकोले तालुक्याच्या जनतेसाठीची एका प्रमुख आर्थिक स्रोताची मजबूत पायाभरणी होती. तेव्हा 30 लिटरने सुरू झालेले दूध संकलन आज तालुक्यात रोजच्या एकूण 2 लाख लिटरपर्यंत येऊन पोचले आहे. पिचड साहेबांना महाराष्ट्राचे जलनायक म्हंटले जाते. अकोले तालुक्यात आज तब्बल 19 धरणे आहेत. केटी बंधाऱ्यांची तर गणतीच नाही. एक भंडारदरा सोडले तर बहुतेक ही सगळी धरणे पिचड साहेबांच्याच काळात बांधली गेली असावीत. निळवंडे धरण हा तर साहेबांच्या परफेक्ट धोरणांचा व दूरदृष्टीचा मानबिंदू आहे. निळवंडे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत पिचड साहेबांनी केलेले कार्य हे राज्यातच नाही तर देशात एक आदर्श कार्य म्हणून नावाजले जाते. कित्येक धरणे व वीजप्रकल्प बांधून पिचड साहेबांनी नुसता अकोले तालुकाच नाही तर सगळा नगर जिल्हा सुजलाम करण्यात प्रमुख वाटा उचलला आहे. धरणांच्या रूपाने पिचड साहेबांनी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला एक नवी संजीवनीच दिली आहे. सोबतीला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मिती बरोबरच आदिवासी भागातील कितीतरी पडीक जमीन ही पिकाखाली आणली व आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासास वेग मिळवून दिला. शेजारचा संगमनेर तालुका हा अकोले तालुक्यापेक्षा अतिशय समृद्ध आणि प्रगत व श्रीमंत तालुका समजला जातो. पण मी साधारण 1998 ते 2002 या काळात संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात फिरलो असता लक्षात आले की संगमनेर या तालुक्याच्या ठिकाणापासून अगदी 10-15 किमी इतकेच अंतर असलेल्या काही गावांत देखील बरे रस्ते नव्हते की एसटी सुद्धा जात नव्हती. त्याउलट त्याचवेळी अकोले तालुक्यातील पेठेची वाडी या अतिदुर्गम गावात सुद्धा कच्चा का होईना पण मोटारेबल रस्ता होता. पाचनई या दुर्गम गावात पिचड साहेबांच्या काळातच पक्का डांबरी रस्ता बनला होता व एसटी सुद्धा जात होती. अगदी प्रत्येक वाडीवस्तीवर जात नसली तरी अपवाद वगळता तालुक्यातील जवळजवळ प्रत्येक गावात एसटी जात होती. म्हणजे दूध संकलनातून आर्थिक मिळकत देऊन, शेतजमीनीला पाणी उपलब्ध करून देऊन ते थांबले नाहीत तर विकासासाठी आवश्यक असलेले दळणवळणासाठीचे रस्तेही त्यांनी अगदी अतिदुर्गम भागापर्यंत निर्माण करून घेतले. अकोले तालुक्याची कनेक्टिव्हिटी इतर अनेक तालुक्यांपेक्षा त्यांनी नक्कीच खूप उत्तम केली. अकोले तालुका हा मुखत्वे आदिवासी तालुका असल्याने व अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका असल्याने इथे साखर कारखाना चालू शकणार नाही या मतप्रवाहाला छेद देत पिचड साहेबांनी जिद्दीने अगस्ती सहकारी कारखाना स्थापन केला व अगदी यशस्वीपणे तो आजतागायत चालवूनही दाखवला. आज तालुक्याच्या आर्थिक समृद्धीत अगस्ती कारखान्याचाच सर्वात मोठा वाटा आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे हे ओळखून पिचड साहेबांनी शिक्षणाची गंगा खेडोपाड्यातील गरीब आदिवासी व दुर्बल घटकापर्यंत नेण्यासाठी आदिवासी उन्नती संस्थेची स्थापना करून तालुक्यात अनेक ठिकाणी शाळा व आश्रम शाळांचे जाळे उभे केले. आज अनेक शिक्षणसम्राटांनी शिक्षण क्षेत्रात भरमसाठ फी आकारून त्याला आर्थिक मिळकतीचे एक बाजारी साधन बनवून ठेवले आहे. पण उन्नतीच्या शाळांच्या माध्यमातून पिचड साहेबांनी विनामूल्य वा अगदी नाममात्र फी घेऊन आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गोरगरीब आदिवासी बांधवांच्या लेकरांना शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जनतेसाठी पिचड साहेबांचे योगदान अगदी अतुलनीय असेच आहे. आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट बनवण्याचे व मांडण्याचे काम संपूर्ण देशात सगळ्यात आधी पिचड साहेबांनीच केले. मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या सोबतीने त्यांनी स्वतंत्र आदिवासी मंत्रालय व आदिवासी बजेटची निर्मिती केली तसेच समाजकल्याण मंत्रालयातून वेगळा व स्वतंत्र असा आदिवासी विकास विभाग सुद्धा स्थापन केला. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनेक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उभारले जाऊन तसेच विविध कल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्राच्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली जात आहे. स्वतंत्र आदिवासी बजेट मांडण्याचे जे महत्वाचे काम देशात सर्वप्रथम पिचड साहेबांनी केले त्यांच्यानंतर देशातील इतरही अनेक राज्यांनी पिचड साहेबांचा कित्ता गिरवत स्वतंत्र आदिवासी बजेटचा स्वीकार केला. आदिवासी मंत्रालयाची स्थापना आणि पहिले मंत्रिपद हे पिचड साहेबांनीच भूषविले. आदिवासींमधील बोगस आदिवासींची घुसखोरी थांबवण्यासाठी पिचड साहेबांनी खूप महत्वाचे प्रयत्न केले. गोविंदजी गारे आणि मधुकरराव पिचड यांनी या बाबतीत फार मोठे योगदान दिलेले आहे. आजही महाराष्ट्रातील बोगस आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू हे मधुकरराव पिचड आणि गोविंदजी गारे हेच आहेत. महाराष्ट्रात आदिवासी जमीन कायदा व वनहक्क कायदा यांच्या सुदृढीकरणात व अंमलबजावणीत त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिले. ते सक्रिय असतानाच्या काळात आदिवासींच्या विविध महत्वाच्या प्रश्नांवर चोख आणि नेमक्या मार्गाने प्रशासकीय व राजकीय पातळीवर नेटाने झुंज देणारे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही त्यांच्याइतके सामर्थ्यवान व प्रभावी नेतृत्व अन्य कोणतेही नव्हते असे म्हणता येईल. वैयक्तिकरित्या तर त्यांनी किती जणांची मदत केली व किती आयुष्ये घडवली याला गणती नाही. कित्येक जणांनी माझे आयुष्य हे केवळ त्यांच्यामुळेच घडले असे सांगितलेले व लिहिलेले मी ऐकले व वाचले आहे. पिचड साहेब हे बहुआयामी असे नेते होते. महाराष्ट्र राज्याची आदिवासी विकास, कृषी, रोहयो, पशुसंवर्धनवन व पर्यावरण मंत्री, दुग्ध विकास, मत्स्य विकास मंत्री, परिवहन व पूनर्वसन विकास मंत्री अशी विविध क्षेत्रातील मंत्रीपदे त्यांनी सक्षमपणे व कार्यक्षमरीत्या भूषविली आहेत. काही जिल्ह्यांचे पालकमंत्रीही ते राहीले आहेत. असे किती नेते आहेत या देशात ज्यांनी इतक्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे मंत्रीपदे भूषवली आहेत? फार पूर्वी एक प्रशासकीय अधिकारी मला म्हणाले होते की महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ सलगपणे लाल दिव्याची गाडी वापरणारा माणूस कोण असेल? मी म्हणालो शरद पवार, कारण तेच तेव्हा सर्वात मोठे नेते होते. पण ते अधिकारी म्हणाले शरद पवार नाहीत तर ते आहेत तुझ्याच तालुक्याचे आमदार म्हणजे मधुकरराव पिचड. तर असे होते की जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा काँग्रेस जाऊन युतीचे सरकार आले होते तेव्हाही पिचड साहेब हे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याला सुद्धा कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो आणि त्यामुळे लाल दिव्याची गाडी त्यांना त्या पाच वर्षांत सत्ता नसतानाही मिळाली होती. विरोधी बाकांवर बसल्यामुळे इतर कोणत्याही नेत्याला ही सुविधा व बहुमान मिळाला नाही. सलग ३० वर्षे त्यांना हा बहुमान मिळाला. अकोल्यात ऐंशीच्या दशकात पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे पिचड यांच्यावर खटले दाखल झाले होते. त्यामुळे १९८४ मध्ये नव्याने सरकार स्थापन करणाऱ्या वसंतदादा पाटील यांनी त्यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्यावर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. हे कळल्यावर केवळ मधुकरराव पिचड यांच्यावरील हे खटले रद्द करून त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता यावी म्हणून वसंतदादा पाटलांनी चक्क आपला शपथविधी चार तास थांबवून ठेवला होता. आजकालच्या शपथविधीचें ग्रँड सोहळे पाहता एका नव्याने व पहील्यांदाच आमदार झालेल्या व्यक्तीसाठी चक्क मुख्यमंत्र्यांनीच सगळा शपथविधी पुढे ढकलणे ही बाब ती व्यक्ती किती महत्वाचे नेतृत्व होते हेच अधोरेखित करते. व्यक्तिगतरित्या बोलायचे झाल्यास पिचड साहेब हे एक अगदी राजबिंडे आणि रुबाबदार असे व्यक्तिमत्व होते. मला तर त्यांच्या चेहऱ्यात राज कपूर यांचीच छटा दिसत असे, तसाच अतिशय गोरा वर्ण आणि तसेच नाक व चेहरा.! पिचड साहेब हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती तर होतेच पण त्यांची स्मरणशक्ती सुद्धा अत्यंत दांडगी होती. तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक लोकांना ते नुसते नावानेच नाही तर त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे या तपशिलांनिशी ओळखत असत. कुठे काय काम चालू आहे वा कोणते काम रखडले आहे याची त्यांना पूर्ण आणि अपडेटेड माहिती असे. कधी काय झाले होते व तेव्हा कोणता माणूस कसा वागला होता हे त्यांच्या कायमचे आठवणीत राहत असे. एवढेच नाही तर मूळचे हाडाचे काँग्रेसी असल्याने (शेवटी मुलाच्या आग्रहामुळे बीजेपीत गेले असले तरी) त्यांनी नेहमी अहिंसा आणि सहिष्णूतेचाच पुरस्कार केला. त्यांनी कधी कुणावर हिंसक डूख धरला नाही की कुणाचे बदल्याच्या भावनेतून नुकसान केले नाही. स्वतः आदिवासी समाजाचे असूनही त्यांनी कधीही बिगर आदिवासींसोबत भेदभावाची वा अलिप्ततेची भूमिका घेतली नाही. आणि उलटपक्षी अंदर की बात सांगायचीच झाली तर आजही त्यांच्या अगदी जवळच्या बहुतांश कार्यकर्त्यांना देखील वाटते की उलट त्यांनी बिगर आदिवासींनाच अंमळ जास्त फेवर दिला. आजच्या फक्त माझी जात आणि फक्त माझा धर्म हेच श्रेष्ठ या वैचारिक घाणीत लोळण्याच्या वातावरणात सगळ्यांना असे समानपणे सोबत घेऊन चालण्याची पिचड साहेबांची ही जीवन कारकीर्द म्हणजे खरेच एक सन्माननीय अपवादच म्हणावी लागेल. त्यांना राजकीय विरोधक व शत्रू खूप असतीलही पण ते सगळे त्यांच्या राजकीय भूमिकेचे विरोधक आहेत. एक व्यक्ती म्हणून पिचड साहेब हे नक्कीच अजातशत्रू होते. जे लोक त्यांना सोडून विरोधात गेले ते सुद्धा हे मान्य करतील की पिचड साहेबांनी कधीही कुणावर पातळी सोडून टीका केली नाही वा कुणाचे आयुष्य ते विरोधात गेले म्हणून सूडाने उध्वस्त केले नाही (हेही खूपच दुर्मिळ आहे). या माणसात सूड व हिंसक भावनाच नव्हती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशीच त्यांची वर्तणूक होती. उलट जे त्यांना सोडून गेले ते बहुतांश लोक हे स्वतःची वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षा जोपासण्यासाठी किंवा पिचड साहेबांपासून मिळणारा आर्थिक लाभ थांबल्यानेच गेले असे लक्षात येते. अर्थात पिचड साहेबांचेही काही राजकीय निर्णय चुकले असतील, काही चुका त्यांच्याकडून घडल्याही असतील, कारण शेवटी ते मनुष्यच होते. पण माझी जाण त्यांच्या चुका शोधण्याइतकी वा त्यांना दोष देण्याइतकी सक्षम नाही हे मी नम्रपणे नमूद करतो. मात्र त्याचवेळी पिचड साहेबांची एक मला वाटणारी सर्वात मोठी कमतरता अशी की त्यांनी तालुक्यात वा एकंदरच आदिवासी समाजात नेतृत्वाची पुढची खंबीर व त्यांच्यासारखीच अभ्यासू, कार्यशील, झुंजार व वैचारिक नवी पिढी निर्माण केली नाही. यशवंतराव भांगरे यांनी मधुकर पिचड यांच्यातील नेतृत्व घडवले पण मधुकरराव पिचड हे स्वतः मात्र दुसरे मधुकर पिचड घडवू शकले नाहीत. अर्थात हे देशात प्रत्येक नेतृत्वाच्या बाबतीत म्हणता येईल. लोक आपले स्थान अबाधित रहावे म्हणून नवे प्रतिभाशाली नेतृत्व घडवत नाहीत. पण या भूमिकेमुळे समाजाचे व देशाचेच नुकसान होते. इथे हेही विशेषत्वाने नमूद करावे लागेल की विधानसभेत ते विरोधी पक्षनेते असताना सोबतच्या आरआर पाटलांसारख्या अनेक नव्या नेत्यांना बोलण्याची व भूमिका मांडण्याची भरपूर संधी देऊन त्यांच्यातील नेतृत्व घडवण्यास मदत करत होते, आणि म्हणून ते महाराष्ट्राला लाभलेले सर्वात चांगले विरोधी पक्षनेते होते हे तर विधानसभेतच बोलले गेले आहे. पण हीच नवे नेतृत्व घडविण्याची भूमिका त्यांनी तालुक्यात किंबहुना आदिवासी समाजात सुद्धा घ्यायला हवी होती असे मला वाटते. आपण जसे खंबीरपणे लढलो तसेच किंवा त्याहून अधिक खंबीरपणे लढणारी नवी फळी तयार झाली पाहीजे ही भूमिका फक्त राजकीयच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व संस्थेतील नेतृत्वाची असली पाहिजे. पण असे एकही उदाहरण आज संपूर्ण देशात आढळत नाही आणि दुर्दैवाने पिचड साहेबही त्याला अपवाद नव्हते असेच म्हणावे लागेल. खरेतर सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन त्यांनी दहा वर्षांपूर्वीच जी एकप्रकारची निवृत्ती घेतली होती तेव्हाच महाराष्ट्राच्या व आदिवासी समाजाच्या विकासात एक पोकळी निर्माण झाली होती. नेत्याच्या भूमिकेतून ते केव्हाच रिटायर झाले होते आता फक्त ते शरीराने जगातून निघून गेले आहेत. पण जरी राजकीय दृष्ट्या सक्रिय नसले तरी महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांचा ते एक मोठा आधारस्तंभ होते हे नक्की. सक्रिय व सत्तेत नसले तरी त्यांचे नुसते असणे हा सुद्धा आदिवासी समाजाला एक मोठा आधार होता. त्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी एक दिशा देणारा एक मार्गदर्शकच आहे. मात्र त्यांचे कार्य जरी अमर राहणार असले तरी व्यक्तिरूपातली त्यांची प्रेरणा व त्यांचा समाजाला वाटणारा दृढ आधार हे मात्र आता कायमस्वरूपी हरवून गेले आहेत. समाजाच्या कित्येक जबाबदाऱ्या एकनिष्ठपणे व एकट्याने आपल्या खंबीर खांद्यावर पेलून धरणारे पिचड साहेब हे जाताना आदिवासी समाजासाठी, अकोले तालुक्यासाठी व महाराष्ट्रासाठी सुद्धा एक अत्यंत मोठी व कदाचित कधीही भरू शकणार नाही अशी पोकळी निर्माण करून गेले आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा एक अत्यंत प्रभावी व प्रतिभाशाली नेता आपण गमावला आहे. राजूर गावाने, अकोले तालुक्याने, आदिवासी समाजाने व महाराष्ट्राने एक अत्यंत मौल्यवान असे व्यक्तिरत्न गमावले आहे. पण जोपर्यंत या जगात पीडितांना, वंचितांना, दुर्बलांना, गोरगरीब आदिवासींना संघर्ष आणि झुंज देत राहावी लागेल तोपर्यंत पिचड साहेबांचे आयुष्य व त्यांचे कार्य हे एखाद्या अजरामर दीपस्तंभासारखे समाजाला दिशा व ऊर्जा देण्याचे काम करत राहील हे मात्र नक्की. पिचड साहेबांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली मृत्यू दि. 6 डिसेंबर 2024. शब्दांकन - श्री. राहुल भांगरे

Sunday, December 22, 2024

प्रेरणा’दायी गुरु प्रा.एस.झेड.देशमुख – सर - मुरारी देशपांडे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन (२२.१२.२०२४

    ‘प्रेरणा’दायी गुरु प्रा.एस.झेड.देशमुख – सर - मुरारी देशपांडे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन (२२.१२.२०२४
) ^^^^^^^^^^^^^^^^^ …........’लाथ मारीन तिथे पाणी काढीन’हा वाक्प्रचार उच्चारणे फार सोपे आहे.तसे करून दाखवणे भलते कठीण.आयुष्यभर हा वाक्प्रचार आपल्या कणखर वागण्याने खरा करून दाखविला तो आमचे गुरु आदरणीय एस.झेड.देशमुख सरांनी.असंख्य तरुणांच्या आयुष्याला आकार देणारा हा शिल्पकार आज ऐशीच्या उंबरठ्यावर सुद्धा अथकपणे युवाशक्तीची शिल्पे साकारण्यात मग्न आहे.’एस झेड’या आद्याक्षरांना हजारो युवकांच्या जीवनात ‘प्रेरणा’मंत्राचे स्थान आहे.या नावात इतकं पावित्र्य आणि इतकं सामर्थ्य सामावलं ते सरांच्या निरपेक्ष पण तितक्याच बाणेदार स्वभावामुळे.      त्या उंचखडकच्या मातीतच काहीतरी रसायन असलं पाहिजे. 75 वर्षांपूर्वीचा अकोले तालुका.प्रगतीचा प्रकाश कसा असतो ते तोपर्यंत तालुक्याने पाहिलंही नव्हतं.आणि अशा तालुक्यातील एक लहानसं खेडं उंचखडक! अंगातील धमक आणि बुद्धिमत्तेची चमक कधीच लपत नाही म्हणतात.त्या लहानशा गावांत जन्मलेल्या देशमुख सरांनी आपल्या कर्तृत्वाने प्रचंड उंची गाठली.अडचणींचे अभेद्य खडक निश्चयाने फोडून काढले.परिस्थिती अनुकूल नसेल तर जगण्यात काही अर्थ नाही असं म्हणत हताश न होता सर अर्थशास्त्रात निष्णात झाले.उच्च शिक्षणाचे वारे नसलेल्या भागातून अकोले तालुक्यातील पहिले सी ए होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला.अर्थशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला अर्थ देण्यासाठी केला.संस्कार,शिक्षण,राजकारण,समाजकारण,प्रबोधन अशी पंचारती सरांनी समाजाला आजवर समर्पित केली.ठामपणे यशाची एकेक पायरी चढत कीर्तीचा’सोपान’ त्यांनी सहज गाठला.       अकोल्याच्या मॉडर्न हायस्कूल मध्ये शिकत असताना किशोरावस्थेतील सरांचे गुण स्वर्गीय फडके सर आणि प्राचार्य अनंतराव देशपांडे यांनी हेरले.त्यांनी या विद्यार्थ्याकडे खास लक्ष पुरविले.त्यातून महाराष्ट्राला मिळाला एक अभ्यासू,ओजस्वी वक्ता.ज्या वक्त्याने गेली चाळीस वर्षे महाराष्ट्र पिंजून काढला.युवकांच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लींग चेतविले.अन्यायावर कठोर प्रहार करायला प्रवृत्त केले.शिवचरित्रावरील त्यांची व्याख्याने युवकांना झपाटून टाकणारी ठरली.स्वतः ची पदरमोड करून राज्याचा कानाकोपरा त्यांनी शिवमय करून टाकला.स्वातंत्र्यवीर सावरकर,स्वामी विवेकानंद,चन्द्रशेखर आझाद,हुतात्मा वीर चाफेकर बंधू,समर्थ रामदास स्वामी,भगवद्गीता,रामायण,महाभारत,अटलबिहारी वाजपेयी,शामाप्रसाद मुखर्जी,पंडित दीनदयाल उपाध्याय,या विषयांवर बोलताना श्रोत्यांना त्या त्या काळात घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे.जे जे उन्नत उदात्त सुंदर महन्मधुर ते ते त्यांच्या व्याख्यानात असते.व्याख्यानानंतर एखाद्या युवकाच्या झोपडीत जाऊन हक्काने भाकरी अन ठेचा आनंदाने खाणारे सर अनेकांनी पहिले आहेत.           आपल्या श्रद्धास्थानांसाठी जगणारा हा माणूस प्रचंड लोकसंग्रह करणारा एक स्वयंभू प्रवाह बनला.स्फटिका सारखा साफ नितळ निर्मळ प्रवाह.या प्रवाहात स्नानाचे सौभाग्य ज्यांना लाभलं ते अंतर्बाह्य उजळले.         ज्या काळात ‘जय भवानी’जय शिवाजी’अशी घोषणा दिली तरी पोलीस गुन्हे दाखल करीत त्या काळात त्यांनी पतित पावन संघटनेच्या माध्यमातून हिंदुत्ववादी युवकांना संघटीत केले.सरकारी अन्यायाच्या विरोधात पुण्यात शनिवारवाड्यासमोर घेतलेल्या हजारोंच्या सभांनी महाराष्ट्र ढवळून निघाला. किती खटल्यांना ते धीरोदात्तपणे सामोरे गेले हा तर स्वतंत्र ग्रंथाचा विषय ठरेल. सरांचा आजवरचा जीवन प्रवास पाहून या ओळी आज प्रकर्षाने आठवल्या. मिळविण्यास न्याय हा लढेन मी लढेन मी छातीवर जुलुमाच्या पुन्हा पुन्हा चढेन मी शिवबाचा होय भक्त धमन्यातुनी तेच रक्त वर्तनातुन दृढनिश्चयी सावरकर होय व्यक्त मी शाहीर क्रांतीचा कडकडतो माझा डफ जोवरी कुडीत प्राण तोवरी हे माझे तप स्वतः साठी कधीच काही न मागणारे सर समाजासाठी लढताना मात्र आजही थकत नाहीत.तरुणाच्या उत्साहाने चौफेर वावरणारे सर सतत माणसांच्या गराड्यात असतात.मोठा नावलौकिक मिळवूनही या माणूसवेड्या माणसाने आपले साधे माणूसपण टिकवून ठेवले आहे.औपचारिकतेच्या चौकटीत बंदिस्त न झालेला हा चैतन्याचा झरा असाच खळाळत निरंतर वाहात राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना ....🌹🕉️🙏🚩

Wednesday, December 18, 2024

फोफासंडी

फोफसंडी : महाराष्ट्रातील सर्वात कमी सुर्यप्रकाश मिळणारे म्हणजेच सर्वात उशीरा सुर्योदय आणि सर्वात आधी सुर्यास्त होणारे गाव. सूर्योदय दोन-अडीच तास उशिरा व सूर्यास्त दोन-अडीच तास लवकर होतो. म्हणजे दिवस हा फक्त सहा ते सात तासांचाच असतो. कुंजीरगडाच्या पायथ्याशी असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम छोटे खेडेगाव. हे गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. नाशिक पासून साधारणपणे ११० किमी अंतरावर असलेले हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात येते. मांडवी नदीचे उगम या गावाच्या हद्दीत होतो. इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नांवावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुफान पाऊस पडतो. निसर्ग सौंदर्याची या गावावर मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. फोफसंडी गावाला हे नाव मिळण्याचा इतिहास देखील खूपच रंजक आहे. पॉप नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी (संडे) सुट्टी च्या दिवशी विश्रांती साठी या गावात जात असे. त्यावरूनच या गावाचे नाव फॉपसंडे पडले. पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रूढ झाले. त्या ब्रिटिश अधिकारी राहत असलेल्या गेस्ट हाऊस चे अवशेष अजून शिल्लक आहेत. (मजकूर सौजन्य : अशोक दारके)