इयता पहिली शिक्षण घेऊन शाळेची भीती मनात घर करून बसलेल्या सुनंदाताई भागवत यांनी
म
टा . वृत्तसेवा , संगमनेर - इयता पहिली शिक्षण घेऊन शाळेची भीती मनात घर
करून बसलेल्या सुनंदाताई भागवत यांनी पाचशेपेक्षा अधिक मुलींना शिक्षणाचे
कवाडे उघडी करून देत आपल्या जीवनाला व आयुष्याला वेगळा अर्थ निर्माण करून
देत आपला जीवन प्रवास अनाथांची माय म्हणून सर्व जगाला करून दिला नगर
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ या गावात सून म्हणून
आलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या बोरी शिरोली गावच्या
लेकीने आपले संस्कार सासरच्या मातीत रुजवत ओसाड माळरानावर, अंध अपंग , मूक
बधिर ,एड्स ग्रस्त, अनाथ , , शोषित , अबला अश्या शेकडो मुलींचे
आयुष्य "सुंदर , निरामय , साक्षर बनवत संस्काराची जोड देत आपल्या जीवनाला
आकार देतानाच आपल्या वसतिगृहात आलेल्या राज्यातील व राज्याबाहेरील
चिमण्यांच्या पंखाला बळ देऊन त्यांना सबला बनवून त्यांना सक्षम बनवत आपणही
समाजाचे काही तरी देणे लागतो हि संकल्पना त्यांच्या मनात खोलवर रुजवात एक
अभिनव उपक्रम राबवितानाच गावाचा चेहरा मोहराही बदलवून जिराईत शेती भाग
बागायती करून कृषी कन्या म्हणवून जगाच्या पटलावर प्रतिमा उंचविण्याऱ्या
सुनंदाताई भागवत या आजी , आई , मावशी अनाथांची माय , या समाजातील आदर्श
मातेला सलाम ....
सावीत्री
बाई फुलेनी १८४७ साली पुण्यात महीलांसाठी पहीली शाळा काढत स्रीयांना
शिक्षणाची दारे खुली करुन दिली त्या नंतरही महीलांना शिक्षणासाठी झटावे
लागत होते. अहमदनगर जिल्ह्यातल्या पठार भागातील सुनंदाताई भागवत यांनी ही
सावित्री बाईंचा वसा पुढे चालवण्याचा निर्धार करत या भागातील महीलां आणि
मुलीच्या आर्थिक आणि शैक्षणीक प्रगती साठी कार्य सुरु ठेवलय. सुनंदाताईंना
मुलगा नसल्याने मुलगा दत्तक घेण्या एवजी खेडयातील मुलींना शिक्षण मिळावे
या साठी वसतीगृहाची स्थापना करत आता पर्यंत पाचशे च्या वर मुलांना शिक्षण
देत त्यांच्या पायावर उभ केलय. आपली संपत्ती दत्तक मुलगा घेऊन त्याला
देण्यापेक्षा समाजातील गोरगरीब अत्याचारित मुलींच्या शिक्षणासाठी पालन
पोषणासाठी देण्याचा त्यांचा निर्धार असून त्यांनी तसे मृत्युपत्र तयार
करूनही ठेवले आहे . नांदूर खदरमाळ येथे १९७५ साली सुनंदा ताई आल्या
त्यावेळी गावात वीज , पाणी , रस्ते कोणत्याही सुविधा नव्हत्या त्यांनी
गावात पाणी योजना आणण्याचा निर्धार केला व थेट मुंबईला वर्ष बंगल्यावर
मुख्यमंत्री शरद पवार याना भेटल्या २ लाख ७० हजाराची नळयोजना होती मात्र २७
हजार रुपये भरण्यासाठी त्यांच्याकडे नव्हते मुख्यमंत्री पवार याना "साहेब आम्हाला
भाऊबीजेच्या साडी ऐवजी भाऊबीज भेट म्हणून २७ हजार नळ योजनेसाठी द्या अशी मागणी
केली त्यांच्या एका शब्दावर १०० टक्के अनुदानावर हि नळ योजना मंजूर केली .
२ वर्षाची सीमा म्हतारबा कोठवळ अनाथ मुलगी संगमनेर , , ७ वर्षाची शितल
नामदेव वाळुंज पारनेर ,९ वर्षाची प्रियांका लक्ष्मण पवार , भिगवण , स्नेहल
लक्ष्मण पवार पूजा राहटे (औरंगाबाद)आरती रवी बंडरगल (कर्नाटक )पूजा
डोंगरे (पारनेर )तर नामदेव रामा भागवत यांचे ५ अनाथ मुले , वेड्या
महिलेसोबतच मुलींना पायल व पूजा राजेंद्र तुपे याना सांभाळून त्यांना
शिक्षण दिले तर दारिद्र्याने पीडित ५ कुटुंबाना आपल्या शेतावर रोजगार देऊन
त्यांची मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत , , सातारा सांगली ,
औरंगाबाद , पुणे जिल्ह्यातील मुलींसोबतच मध्यप्रदेश , कर्नाटक या
राज्यातूनही काही मुलींना आसरा देऊन त्यांचे पालन पोषण व शिक्षण देऊन
त्यांच्या पायावर त्यांना उभे करण्याचे काम या मातेने केले आहे .
सावीत्री
बाईं फुलेंच्या पुण्यातील शाळा सुरु करण्यच्या तब्बल शंभर वर्षा नंतर पुणे
जिल्ह्यातीलच जुन्नर तालुक्यातील बोरी शिरोली या गावात १९४८साली सुनंदाताईंचा जन्म झाला वडील नोकरी निम्मीत मुबईत असल्याने सुंनंदा ताईंच
लहानपण मुबईतच गेल. त्या नंतर त्यांनी पहीलीला प्रवेशही घेतला मात्र त्या
काळी त्याच्या शेजारी रहाणारी एक मुलगी गायब झाल्याने त्यांच्या बालमनावर
परीनाम झाला आणि आई वडीलांनाही भीती वाटल्याने त्यांच शिक्षण सुटल
सावित्री फूलेंने प्रमाणेच सुनंदा ताईंच
लग्न वयाच्या 12 वर्षी लग्न झाल त्या नतंर त्या संसारात रमल्या त्यांचे पती
संगमनेर जिल्ह्यातील नांदुर खंदरमाळ येथे राहत होते आणि नोकरी निम्मीती
मुबईतही राहत होते त्या नंतर सुनंदाताई सुट्टी
साठी नांदुर खंदरमाळला यायच्या हे गाव तस दुष्काळीच गाव त्या काळी
महीलाच्या डोक्यावर हंडा त्या नेहेमी बघत त्या नतंर त्यांनी १९७५ साली या
गावाला येवुन राहण्याच ठरवत गावातील १५० महीलांना एकत्र करत अहमदनगर
जिल्ह्यातील महीलांनी सुरु केलेली पहीली पाणी पुरवठा योजना सुरु केली होती.
त्या नंतर त्यांनी आपल जीवन गावाच्या कल्याना साठीच वाहुन घेतल.
सन १९८९साली गावातील मुला मुलींना शाळेसाठी लाबं जाव लागत असल्याने गावात
महीलांच्याच्या सहकार्याने पहीली शाळा सुरु केली होती. त्या नंतर ९० साली
मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या साठी वसतगृह सुर केल त्या साठी त्यांना
आपली एक एकर जमीनीह दान दिली आहे. सरकारचे अनुदान आले तर ठीक नाही आले तर
ठीक त्याची वाट न पाहता आपल्या शेतीतील उत्पन्नातून व आपल्या पतीच्या
पेन्शन मधून त्या वसतिगृह चालवतात . तर राज्यातील अनाथ मुलींना त्या
स्वीकारून त्यांचे पालनपोषण करून शिक्षण देतात त्या आधुनिक काळातील
सावित्रीबाई फुले आहेत असे ग्रामस्थ म्हणतात
कोट-सुंनदाताई भागवत. समाजीक कार्यकर्त्या--
माझी आई राधाबाई बालाजी शेटे ७वी शिकलेली ती मला "पठया "म्हणायची माझ्या
पठ्ठयाला मी श्रीमंताला नाही तर गरिबाला देईल ती गरीबाचा संसार चांगला करील
त्याप्रमाणे मला गिरणी कामगाराला दिले मुंबईला माझे १२ वारशाची असताना
लग्न झाले माझे मन तिथे रमले नाही मग मी सासरी आले नांदूर खांदरमळ मध्ये
येऊन मी गावच्या प्रश्नात लक्ष्य घातले पाणी , वीज रस्ते हे प्रश्न सोडवतं
गावात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केली वसतिगृह सुरु करून अनाथ
मुलींना त्यात प्रवेश दिला . मुलींनी मोबाईल वापरू नये त्यामुळे मुली
बिघडतात असे माझे ठाम मत आहे . त्यामुळेच माझ्या ५०० मुली आजही आई म्हणून
माझे संस्कार अंगिकारतात . मुलगा दत्तक घेण्यापेक्षा या मुलींसाठी
आयुष्याचे शेवटचे दिवस काढायचे माझे सर्व काही या मुलींचे आहे मी असेल नसेल
माझ्या संपत्तीतूनच यापुढेही मुलींचे शिक्षण व पालनपोषण सुरु रावावे
म्हणून मी मृत्यू पत्र तयार करून ठेवले आहे . गावातील पंढरीनाथ सुपेकर ,
यमाजी मोरे भीक मोरे , नामदेव सुपेकर , लक्ष्मण भागवत , इंदिराबाई गर्भे ,
भीमाबाई घुले रंभाबाई भागवत व माझे पती यांनी मला साथ दिल्यामुळे मी हे काम
करू शकले
सुनंदाताईंनी गावातील मुलींना शिक्षण देत असतांनाच यशवंतराव चव्हान मुक्त विदयापीठा अंतर्गत वयाच्या ६४ व्या वर्षीबीए च शिक्षण पुर्ण केलय. सुनंदाताईंनी सुरु केलेल्या वसतीगृहाला शासनाचा तुटपुंज अनुदान मिळत त्या मुळ लोकांच्या मदतीनु वसतीगृहाचा इतर खर्च भागावला जातो सुनंदाताई केवळ
वसतीगृहच चालवत नाही तर त्या आणि त्यांचे ८० वर्षाचे पती याच वस्ती गृहात राहुन
मुलीच्या शिक्षणा साठी लक्ष देतात यात बऱ्याच निराधार मुलीही आहेत. या
संस्थेत शिकलेल्या अऩेक मुली पोलीस तलाठी ग्रामसेवक आणि , शेतकरी , आदर्श गृहिणी , शिक्षक ,
डाँक्टरही
झाल्या
आहेत. आजही या संस्थेत ३५ विद्यार्थीनी शिक्षण घेताय.
कोट - सुनंदा डोंगरे (
विद्यार्थीनी
)---
विद्यार्थीनीआकाशी कलरचा ड्रेस--- माझ्या आईऩे
वडीलांना सुपारी देवुन मारले मला नातेवाईनेही नाकारल त्यानंतर मला सुनंदा
आई भेटली तिने मला लेकीसारखे सांभाळले , मला कापड लत्ता , शिक्षण , माझा
आजार मला आई वडिलांची आठवण येऊ दिली नाही
सुनंदाताईंच्या
या कार्याची दखल घेऊन स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी घेऊन त्यांना जिल्हा
परिषदेवर निवडून देऊन त्या जिल्हापरीषद सदस्याही झाल्या होत्या त्या नंतर
आता
दोन वर्षा पासुन त्या गावातील पहील्या महीला सरपंच म्हणुन काम बघताय.
गावातील मुलींच्या शिक्षणा पुरतच मार्यादीत काम न ठेवता सुनंदा ताईंनी गावातील पाणलोट क्षेत्र विकाचही भरघोस काम केलय. त्य़ाच बरोबरीने सुनंदाताई ह्या उत्तम शेतीही करतात. ताईंच्या
या कार्याची दखल अऩेक संस्था आणि शासन दरबारी दखल ही घेतली गेली असु न
त्याना सावित्रीबाई फुले , कृषी रत्न , वीरांगना , जिजामाता कृषी भूषण महिला ,
अहिल्याबाई होळकर , राणी , लक्ष्मीबाई , शिक्षण तज्ञ् जे . पी . नाईक पुरस्कार पुरस्काराने सन्मानाती ही करण्यात
आले आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home